NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

पूरग्रस्तांना नवी मुंबई पालिकेने 1 कोटींंची मदत करावी

आमदार मंदा म्हात्रे यांची आयुक्तांकडे मागणी

नवी मुंबई : अतिवृष्टीमुळे कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रात पुरस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात जिवित आणि वित्त हानी झाली आहे. राज्यात ओढावलेल्या पूरग्रस्तांना 1 कोटी रुपयांची मदत तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा अशी मागणी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. 

बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी विविध विषयांसंदर्भात नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांची मंगळवारी भेट घेतली. यावेळी रायगड, महाड, चिपळुन, कोल्हापुर, सातारा येथे अतिवृष्टीमुळे न भरुन येणारे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्त हानी झाली आहे. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. राज्यभरातून पुरग्रस्तांसाठी मदतकार्य सुरु आहे. नवी मुंबई महापालिकाही नेहमीच मदतकार्यासाठी पुढाकार घेते. या पूरग्रस्तांनाही नवी मुंबई महापालिकेमार्फत 1 कोटी मदत देण्याची मागणी म्हात्रे यांनी केली. नवी मुंबई महानगरपालिका ही श्रीमंत महानगरपालिका म्हणून गणली जात असताना अशा संकटातून त्यांना सावरणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. महापालिकेमार्फत 1 कोटी रुपयांचा निधी तसेच अन्न-धान्य, कपडे, औषधे अशा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केल्यास या संकटातून बाहेर येण्यास त्यांना मदत होईल. तसेच पूरग्रस्त कोकणवासियांना खर्‍या अर्थाने दिलासा मिळेल. महापालिका आयुक्त यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लवकरच पूरग्रस्तांना ही मदत पोहचणार असल्याचे त्यांनी सूचित केले. मी माझे 1 महिन्याचे वेतनही पूरग्रस्तांना देणार आहे. त्यामुळे सर्वांनीच पूरग्रस्तांना मदत म्हणून हातभार लावावा, असे आवाहन आमदार मंदा म्हात्रे यांनी केले आहे. 

  • उपोषणाचा इशारा
    वाशीतील ईटीसी केंद्राऐवजी तेथे शाळाच झाली पाहिजे.  सिडकोने हा भुखंड शाळेसाठी दिलेला असल्याने तेथे शाळाच हवी. येथील दिव्यांग विद्यार्थ्यांना नवी मुंबई महापालिकेच्या इतर शाळांप्रमाणे सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे,   नाहीतर उपोषण करण्याचा इशारा आ. म्हात्रे यांनी आयुक्तांना दिला.
  • इतर मागण्या
    सीवूड्स से-50 येथे शासकीय हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज उभारणेकरिता भूखंड हस्तांतरित करणे, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाचे नामकरण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असे करणे, मोडकळीस आलेल्या इमारती आणि डोंगराळ भागातील रहिवाशांच्या घरांची व्यवस्था करणे, आमदार निधीतून शुटींग रेंज प्रशिक्षण केंद्र, कुस्ती आखाडा उभारण्याबाबतही चर्चा करण्यात आली. 

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट