मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

1 ऑगस्ट रोजी वाशी न्यायालयात ई-लोक अदालत

नवी मुंबई ः राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार महाराष्ट्रातील सर्व न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. 1 ऑगस्ट रोजी वाशी न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळेस ई-लोक अदालतीचे देखील आयोजन करण्यात आले आहे व त्याद्वारे दुरचित्रसंवाद प्रणालीच्या माध्यमातून प्रकरणे तडजोड करून मिटविण्याची मुभा देण्यात आली आहे. तरी इच्छुक पक्षकारांनी लवकर न्यायालयात विनंती अर्ज सादर करावा, असे आवाहन न्यायाधीश तृप्ती देशमुख नाईक यांनी केले.

1 ऑगस्ट 2021 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. सदर लोक न्यायालयात जे पक्षकार हजर राहू शकत नाहीत, त्यांच्याकरिता ऑनलाईन पद्धतीचा वापर करून लोकन्यायालयामध्ये दिवाणी स्वरुपाची तडजोडीस पात्र फौजदारी स्वरुपाची, वैवाहिक स्वरुपाची, 138 एन.आय.अ‍ॅक्ट चेक संबंधीची दाखल झालेली प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे, मोटार अपघात नुकसानभरपाई प्रकरणे, बँकवसुली प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे इत्यादी प्रकरणे जास्तीत जास्त ठेवून 1 ऑगस्ट 2021 रोजी लोकन्यायालयात सामंजस्य आणि तडजोडीने प्रकरणे निकाली काढण्याकरिता सर्वांनी सहभाग नोंदवावा याकरिता सर्व पक्षकार, विधीज्ञ यांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यासाठी आपला मोबाईल क्रमांक तसेच इमेल आयडी विधीज्ञांमार्फत अथवा स्वतः उपस्थित करून द्यावा, असेही आवाहन करण्यात येत आहे. याचा लाभ सर्वांनी घेतल्यास त्यांचा वेळ, पैसा, श्रम वाचेल. तसेच 26 ते 31 पर्यंत पक्षकार व विधीज्ञ हे ऑनलाईन आपल्या प्रकरणातील समस्यांवर न्यायालयासमोर चर्चा करुन सामोपचाराने प्रकरण मिटवू शकतात. म्हणजेच त्यांना केवळ 01 ऑगस्ट 2021 रोजीच्या दिवशी नव्हे तर त्यादिवसापर्यंत चर्चेला वेळ मिळू शकेल. त्याचप्रमाणे ज्या आरोपींचे गुन्हे तडजोडीपात्र आहेत अथवा किरकोळ स्वरुपाचे आहेत ते आरोपी गुन्हा कबुली देऊ शकतात व फिर्यादी ऑनलाईन पद्धतीने त्याची फिर्याद मागवून प्रकरण संपवू शकतात.

वादपूर्व प्रकरणांचा बँक, पतसंस्था, वीजमंडळ, इंटरनेट, फोन आणि मोबाईल संस्था लाभ घेऊन त्याच्या ग्राहकांसोबत होणारे वाद संपुष्टात आणू शकतील. त्यांना त्यासाठी कोणतेही न्यायालयीन किंवा इतर शुल्क देण्याची आवश्यकता नाही. तसेच ग्राहक देखील त्यांची बाजू सांगून बिले नियमित करून घेऊ शकतात. तरी सर्वांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन टी. एम. देशमुख-नाईक, अध्यक्षा, तालुका विधी सेवा समिती, वाशी यांनी केले आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट