मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

गाड्या भाड्याने लावण्याच्या बहाण्याने विक्रि

दोन अटकेत, एक फरार तर एकाने केेली आत्महत्या

पनवेल ः महागड्या गाड्या वेगवेगळ्या कंपनीत भाड्याने लावतो असे सांगून लोकांकडून बहाण्याने त्यांचा विश्‍वास संपादन करून सदर गाड्या परस्पर विकणार्‍या टोळीपैकी दोघाजणांना पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे. तर यातील तिसर्‍या आरोपीने आत्महत्या केली असून चौथ्या आरोपीचा शोध पनवेल तालुका पोलीस करीत आहेत.

पनवेल परिसरातील तसेच मुंबई येथील डी.बी.मार्ग पोलीस ठाणे हद्दीतील विविध लोकांना तुमच्या नवीन गाड्या आम्ही वेगवेगळ्या नामांकित कंपनीमध्ये भाड्याने लावतो व त्याबद्दल तुम्हाला दरमहा 18 हजार रुपये देवू, असे सांगून रितसर करार करून सुरूवातीचे काही महिने ठरलेले भाडे देवून त्यानंतर भाडे देण्यास टाळाटाळ करून लोकांकडून घेतलेल्या गाड्या परस्पर विकून टाकण्याचा प्रकार या टोळीमार्फत करण्यात आला होता. त्याचप्रमाणे मुंबई येथील एका संगणक व्यावसायिकाला 1 करोड 08 लाख 11 हजार रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार सुद्धा या टोळीविरुद्ध दाखल करण्यात आली होती. या संदर्भात पोलिस  पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांच्या नुसार सदर आरोपींचा शोध घेतला असता यातील आरोपी राजशेखर गौडा (50) याने आपण पकडले जावू या भितीने आत्महत्या केली आहे. तर या गुन्ह्यातील दुसरा आरोपी सुरज पाटील व करण उर्फ जगदीश चौधरी यांना महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणावरुन पकडून त्यांच्याकडून जवळपास 41,68,000 रुपये किंमतीची दहा वाहने गुन्ह्यात वापरलेला मोबाईल असा ऐेवज हस्तगत करण्यात आला आहे. तर एक आरोपी फरार आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट