गुटखा विक्रि टोळीचा मुख्य सूत्रधार अटकेत
नवी मुंबई : गेल्या आठवड्यात गुजरात मधून विक्रीसाठी नवी मुंबईत आलेला 35 लाखाचा गुटखा गुन्हे शाखेने रबाळे एमआयडीसी येथून जप्त केला आहे. या गुटखा प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. यात टोळीचा मुख्य सूत्रधार प्रमोद दास ऊर्फ कल्लू याचाही समावेश आहे.
बेकायदा गुटखा विक्री करणारी मोठी टोळी पोलिसांच्या रडारवर होती. 8 ओक्टोबर रोजी रबाळे एमआयडीसी भागात केलेल्या कारवाई जितेंद्र दास, अखया खंडा, प्रियव्रत दास आणि मुन्ना यादव या चौघांना अटक केली होती. त्यांच्याकडून 35 लाख 53 हजार 312 रुपयांचा विमल कंपनीचा गुटखा आढळून आला होता. यातील सूत्रधार व इतर आरोपी मात्र पसार होते. त्यातील दोघांना शुक्रवारी अटक करण्यात आली. त्यानंतर आता सूत्रधार प्रमोद दास यालाही अटक करण्यात आली आहे.
गुजरात येथे गुटखा बंदी नसल्याने मोठया प्रमाणावर प्रमोद दास हाच गुजरातहून गुटखा नवी मुंबईत आणत असे व येथून राज्यभरात पाठवत असे. तो अन्यत्र पळून जाण्याच्या मार्गावर आहे अशी खबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्या पथकाला मिळाली होती. बुधवंत यांनी माहितीच्या आधारावर विमानतळावर पोलीस पथक साध्या वेशात रवाना केले. शनिवारी रात्रीपासूनच पोलीस पथक सापळा रचून होते. पहाटे अडीच-तीनच्या सुमारास आरोपी विमानतळावर आला. पोलिसांनी खात्री होताच त्याला अटक केली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya