NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

प्रश्न उपस्थित करून गैरहजर राहणाऱ्या सदस्यांना आता चाप…

प्रश्न उपस्थित करून गैरहजर राहणाऱ्या सदस्यांना आता चाप…

मुंबई – विधानसभेत प्रश्न उपस्थित करून गैरहजर राहणाऱ्या सदस्यांचे प्रश्न यापुढे प्राधान्याने घेण्यास निर्बंध घालण्याची शिफारस आपण संबंधित निर्णय समितीकडे करू असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे. आज पेण अर्बन बँकेच्या संबंधितचा प्रश्न सभागृहात चर्चेला आला त्यावेळी तो उपस्थित करणारे पराग शाह आणि इतर सदस्य उपस्थित नव्हते त्यावेळी अध्यक्षांनी हे जाहीर केलं.

या बँकेत असणाऱ्या ठेवीदारांच्या ठेवी नेमक्या कधी परत देणार असे प्रश्न संजय केळकर, प्रकाश सोळंके, नारायण कुचे, प्रशांत ठाकूर, अतुल भातखळकर यांनी वारंवार उपस्थित केला, अध्यक्षांनी ही यावर मंत्र्यांनी स्पष्ट उत्तर देण्यास सांगितलं. आधी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आणि नंतर राज्यमंत्री पंकज भोयर यांनी संबंधित बाब न्यायप्रविष्ट असल्याचं सांगत होते. बँकेच्या १४३ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत त्यासंबंधी न्यायालयात याचिका दाखल आहे, त्यावर निर्णय आल्यावरच ठेवी परत करण्यात येतील असं मंत्री पाटील यांनी सांगितलं.

नादुरुस्त शाळांसाठी तरतूद अपुरी

राज्यात एकूण साठ हजार ३४४ सरकारी शाळा असून त्यातील २३, २७३ शाळांना दुरुस्तीची आवश्यकता आहे, तर बावीस हजाराहून अधिक शाळा धोकादायक आहे, यावर्षी त्यासाठी १६० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र हा निधी अपुरा असल्याची कबुली शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली. शाळांची ही अवस्था वर्षानुवर्षे आहे, आधीच्या सरकारांच्या काळात त्याकडे हवे तसे लक्ष न दिल्याने ही अवस्था झाली अशी माहिती राज्यमंत्री भोयर यांनी दिली. याबाबतचा मूळ प्रश्न कैलास पाटील यांनी उपस्थित केला होता, त्यावर श्रीजया चव्हाण, अमित देशमुख, अभिमन्यू पवार यांनी उपप्रश्न विचारले होते.


रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट