NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

दगड, माती आणि वाळू उत्खननाचे आभाळ फाटले , महसूलमंत्र्यांची कबुली

दगड, माती आणि वाळू उत्खननाचे आभाळ फाटले , महसूलमंत्र्यांची कबुली

मुंबई -राज्यात सुरू असलेल्या असंख्य विकास कामांसाठी दगड , माती आणि वाळू यासाठी अनेक ठिकाणी बेकायदा उत्खनन करण्यात आल्याचं निदर्शनास आलं असून काही ठिकाणी तर आभाळ फाटल्याची स्थिती आहे, यासाठी संपूर्ण राज्याचे द्रोण सर्वेक्षण करून उत्खनन किती झालं याची माहिती घेऊन त्यासाठीचे स्वामित्व धन दंडासह वसूल करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात केली.

यासंदर्भातील मूळ प्रश्न प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केला होता, त्यावर जयंत पाटील, रणजीत सावरकर, अस्लम शेख , राजकुमार बडोले यांनी उपप्रश्न विचारले. यापुढे विकासकामे आणि प्रकल्पाची कामं सुरू करताना त्यात स्वामित्व धनाचा समावेश केला जाईल , ती संबंधित कंत्राटदाराच्या देयकातूनच वसूल करण्यात येईल अशी माहिती देखील त्यांनी दिली.

राज्यात नवीन वाळू धोरण आणून दगडापासून वाळू बनविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान शंभर क्रशरना परवानगी दिली जाईल , त्यासाठी सिंगल विंडो पद्धतीने तीन दिवसांत परवानगी देण्यात येईल असं ही मंत्री बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केलं. या धोरणानुसार ज्या गावातून स्वामित्व काढलं जाईल त्या गावाला त्या स्वामित्व धनाचा फायदा देण्यात येईल असं ही मंत्री म्हणाले.


रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट