मतदार यादीत नाव न सापडल्यास BMC च्या या हेल्पलाईनवर कॉल करा प्रचारतोफा थंडावल्या, उमेदवारांना घरोघरी प्रचारास मुभा राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका 5 फेब्रुवारीला Blinkit, Zepto, Swiggy, Zomato ची 10 मिनिटांची डिलिव्हरी सर्व्हीस बंद नालासोपार्‍यात १० लाखांची रोकड जप्त यामिनी जाधव यांचा मुंबई पालिका निवडणुकीसाठी प्रचाराला वेग राजुलच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे भांडुप मध्ये वेदांता समूहाचे अध्यक्ष दान करणार ७५ टक्के संपत्ती नाना आंबोले यांना शिवडीकरांचा वाढता प्रतिसाद ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा टीझर प्रसिद्ध क्रांतिज्योती विद्यालय ‘ सुपरहीट, पहिल्याच आठवड्यात ३.९१ कोटी कमाई राज्यभरात प्रचारसभांचा धुरळा, फडणवीस ठाणेकरांशी संवाद ... मुंबईत धावणार 18 डब्ब्यांची लोकल राज्यातील २७ लाख वाहनांना अद्यापही HSRP नाही, लवकरच तपासणी होणार बिनविरोध निवडीला मनसेचा हायकोर्टात आव्हान माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचं दीर्घ आजारानं निधन वचन ठाकरेंचं! मुंबईकरांसाठी राज-उद्धव ठाकरेंकडून शिवशक्तीचा वचननामा जाहीर आज होणार फैसला! कर्णधार वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका राजुल संजय पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज संरक्षण क्षेत्रासाठी 79 हजार कोटींच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी ३३ वर्षांनंतर पुन्हा उघडणार जेजे हत्याकांडाची केस प्रशिक्षकपदावरून गौतम गंभीरला बीसीसीआयकडून मिळणार डच्चू? अखेर BCCI ने सोडलं मौन, पुण्यात भाजप, राष्ट्रवादीविरोधात लढणार, मविआचा फॉर्म्युला ठरला; 50-50-50 मनसेलाही सोबत घेणार शिवसेनेची लवकरच पहिली यादी; एकनाथ शिंदेंकडून 60 माजी नगरसेवकांना संधी, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी विशेष टोलमाफी पास पर्यूषण पर्वात दोन दिवस कत्तलखाने राहणार बंद २९ टक्के कोसळला या गेमिंग कंपनीचा शेअर Asia Cup मध्ये भारत-पाक आमने सामने- सरकारने दिली परवानगी 12 आणि 28 टक्क्यांचा GST स्लॅब होणार रद्द, सर्वसामान्यांना फायदा अमेरिकेत छत्रपती शिवरायांच्या कीर्तीरथाची भव्यदिव्य मिरवणूक कानात ईअर फोन असल्याने युवकाचा मृत्यू पोस्ट झाले अत्याधुनिक – अ‍ॅडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म सुरु BSNL ची मान्सून ऑफर – 1 महिना मोफत इंटरनेट गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक सलोख्यासाठी हजरत महंमद पैगंबर जयंती ८ सप्टेंबर रोजी होणार .. आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रवासाला तब्बल बारा तास, मग टोल का द्यावा, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल उपमुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर केले ‘लाडकी सून’ अभियान मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी… कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ… उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच झाले सुरू मतदार यादीबाबतचे आरोप शपथपत्रासह करा अन्यथा माफी मागा… शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल १८ ऑगस्टला जालन्यात मुसळधार पावसाने नदी नाले तुडुंब… मुंबईत पागडीधारकांना आदित्य ठाकरेंकडून पुनर्वसनाची हमी कॅडबरी डेअरी मिल्कच्या रॅपरवर खास मराठीत शब्द पहिल्याच दिवशी FASTag वार्षिक पासला भरभरुन प्रतिसाद, १.४ लाखांहून अधिक नोंदणी राज्यात १६ ते २१ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राचे उद्घाटन लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत सर्व घटकांना सोबत घेऊन विकास करणार ! नारळी पौर्णिमेला वरळीत हुल्लडबाजी करणाऱ्या उबाठा गटावर कारवाई करा BSF मध्ये 1121 जागांसाठी भरती; 10वी-12वी व ITI करु शकतात अर्ज 15 ऑगस्टपासून सुरू होणार FASTag Pass गणेशोत्सव काळात मुंबईत ‘डीजे’ला बंदी दादरमध्ये इमारतीच्या छतावर कबुतरखाना सुरू आधार कार्ड, व्होटर कार्ड,रेशन कार्ड हे नागरिकत्त्वाचे पुरावे नाहीत 15 ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवलीत मांसाहार बंदी इथेनॉल पुरवठ्यात उ.प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसर्‍या स्थानी हेपेटायटीस D पासून कर्करोगाचा धोका असल्याचा WHO चा निर्वाळा दहिहंडी सराव करताना 11 वर्षीय बालकाने गमावला जीव अमेरिकेच्या टॅरिफमुळे दोन अब्ज डॉलरची कोळंबी निर्यात धोक्यात सिंचन तलाव धोक्यात; भिंत खचली, २०० एकर शेतीला धोका…. हुतात्मा स्मारकाच ऐतिहासिक महत्त्व टिकले पाहिजे - आमदार सचिन अहिर रेल्वेकडून इतर प्रवाशांसह मुंबईकरांसाठी सुरक्षेच्या नव्या उपाययोजना राजकीय पक्षाचा चेहरा राहिलेली व्यक्ति न्यायालयाचा चेहरा असणे योग्य आहे का ? सरकारने लोकसभेत सादर केलेले आयकर विधेयक घेतले मागे अमेरिकेच्या टॅरिफचा भारतीय वस्त्रोद्योगाला मोठा फटका ठाणे जिल्ह्यातील या शहरात लवकरच सुरु होणार ‘पॉड टॅक्सी’ सेवा माथेरानची हातरिक्षा बंद करा – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कबुतरांना अन्न-पाणी देण्यावर उच्च न्यायालयाची बंदी कायम एक पडदा सिनेमागृहाबाबत संयुक्त समिती कोल्हापूरकर जिंकले, महादेवी हत्तीण पुन्हा येणार नांदणी मठात उत्तराखंडला गेलेले महाराष्ट्रातील सर्व पर्यटक सुखरूप ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती उत्तरकाशीमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार, ४ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता भाजपाचे पदाधिकारी बनले न्यायाधीश, न्यायपालिकेचा निष्पक्षपणा धोक्यात? सेंचुरी मिलचा भूखंड कोणाच्या घशात घालणार? कामगार नेते गोविंदराव मोहिते‌ भायखळ्यात आमदार चषक 2025 ही भव्य हॉलीबॉल स्पर्धा संपन्न शिवसेना प्रभाग 205 च्या वतीने लाडू वाटप नृत्येश्वर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तैवानमध्ये भारतीय लोकनृत्यांची केली बहारदार सादरीकरण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानकाच्या नामकरणाविरोधात शिवसेनेचे आंदोलन एसटी आता करणार रिटेल (किरकोळ ) इंधन विक्री कबुतरांना खाद्य देणार्‍याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजपामध्ये प्रवेश ‘$1 ट्रिलियन’ अर्थव्यवस्थेकडे महाराष्ट्राची वेगवान वाटचाल! निवडणूक पारदर्शक होण्यासाठी मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडा राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम हाती… स्वामीनाथन यांचा जन्मदिन “शाश्वत शेती दिन” म्हणून साजरा राज्य सरकारने जाहीर केले नवे सोशल मीडिया नियम राज ठाकरे आल्यानं कित्येक पटीनं आनंद- उद्धव ठाकरे खडसेंचा जावई पुण्यात रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडला गेला लाडकी बहीण योजनेसाठी 26.34 लाख महिला अपात्र जन्मतःच या बालकाच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 10 उत्तीर्ण उमेदवारांसाठी IB मध्ये नोकरीची मोठी संधी शाळा, कॉलेज आणि कोचिंग संस्थांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून 15 निर्देश जारी मुंबई रेल्वे साखळी स्फोट प्रकरण : हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी ससून डॉकमधील मच्छीमारांच्या पुनर्वसनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे.. ; राज ठाकरे निशिकांत दुबेवर कडाडले सीमाभागातील निपाणी शहरात कन्नड भाषेची सक्ती महायुती सरकारला सत्तेचा माज -माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई महाराष्ट्राचीच , मुंबईत मराठी माणसाचाच आवाज बुलंद …. ‘जय गुजरात’ म्हणणारे एकनाथ शिंदे गुजरात व अमित शाहांचे गुलाम म्हाडा लॉटरीचा धडाका; ठाण्यात 2000 घरांसाठी सोडत, वाचा कधी येणार जाहिरात पावसाळ्यात केस का गळतात? अशी घरगुती उपाय करून थांबवा केस गळती NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

तीस वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम देण्यासाठी बदलाची हाक : प्रभाग २०५ मधून वर्षा गणेश शिंदे यांच्या उमेदवारीकडे जनतेचे लक्ष


मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २०५ मधील अभ्युदयनगर, जिजामातानगर व परिसरात गेली तीन दशके रखडलेल्या पुनर्विकास, गृहनिर्माण, पाणीपुरवठा, गटार व्यवस्था, रस्ते तसेच मूलभूत नागरी सुविधांच्या प्रश्नांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः ठप्प झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप–शिवसेना–आरपीआय महायुतीच्या उमेदवार वर्षा गणेश शिंदे यांच्या प्रचारादरम्यान या भागातील वास्तव परिस्थिती पुन्हा एकदा ठळकपणे समोर आली आहे.


जिजामातानगरमध्ये अनेक कुटुंबे तब्बल तीस वर्षांपासून झोपडपट्टीत वास्तव्यास असून आज तिसरी पिढीही त्याच असुरक्षित व अनिश्चित परिस्थितीत जीवन जगत आहे. हक्काचे घर, स्वच्छ पिण्याचे पाणी, सुरक्षित गटार व्यवस्था, सुलभ रस्ते आणि मूलभूत नागरी सुविधा यांपासून नागरिक वंचित आहेत. याचा थेट परिणाम सामाजिक जीवनावर होत असून मुलींची लग्ने रखडत आहेत, युवकांचे भविष्य अंधारात आहे आणि अनेक कुटुंबे मानसिक व सामाजिक कोंडीत सापडली आहेत. लोकप्रतिनिधी मराठी माणसाच्या भावनांशी खेळतात; मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल घडत नाही, अशी तीव्र भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


प्रचारादरम्यान विविध वस्त्यांमध्ये फिरताना उघडी गटारे, तुंबलेले नाले, अपुरी स्वच्छता व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि मोडकळीस आलेली घरे हे वास्तव स्पष्टपणे दिसून आले. आजूबाजूला उंच इमारती उभ्या राहत असताना या भागातील नागरिकांना मात्र अद्याप मूलभूत सुविधाही मिळालेल्या नाहीत, ही बाब प्रकर्षाने जाणवते. ज्यांना कधीच पाणी, रस्ता, घर किंवा गटाराचा प्रश्न भेडसावत नाही, तेच लोक वर्षानुवर्षे निवडून येतात, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली.


या पार्श्वभूमीवर अभ्युदयनगर पुनर्विकासाचा प्रश्न, २०८ घरांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव, ६४१ चौरस फुटांचा कार्पेट एरिया असलेली २ बीएचके घरे, पार्किंग सुविधा तसेच संपूर्ण नागरी पायाभूत विकास याबाबत ठोस व कालबद्ध निर्णय होणे अत्यावश्यक असल्याचे मत प्रचारादरम्यान मांडले जात आहे. राज्य सरकारकडून आवश्यक कॉर्पस फंड उपलब्ध करून देऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली.


महायुतीच्या उमेदवार वर्षा गणेश शिंदे या स्वतः अभ्युदयनगरच्या रहिवासी असून या परिसरातील समस्या त्यांना केवळ ऐकून नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभवातून माहीत असल्याचे प्रचारादरम्यान स्पष्ट झाले. युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कष्टकरी वर्गासाठी रोजगारनिर्मिती, कौशल्यविकास, महिला सक्षमीकरण तसेच नागरी सुविधा सुधारण्याचा संकल्प त्यांच्या प्रचारातून मांडण्यात आला आहे. दहावी नापास युवकांपासून ते पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या तरुणांपर्यंत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध उद्योग व योजनांच्या माध्यमातून प्रयत्न केल्याचा उल्लेखही यावेळी करण्यात आला.


राज्यात व केंद्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘विकासपुरुष’ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राला विकासाच्या बाबतीत अग्रस्थानी नेण्याचा त्यांचा प्रयत्न असून मुंबईकरांना दर्जेदार नागरी सुविधा देण्याचा सरकारचा दृष्टिकोन असल्याचे प्रचारात नमूद करण्यात आले. विकासासाठी केवळ इच्छाशक्ती नव्हे, तर राजकीय बळही आवश्यक असल्याचे सांगत, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीला संधी देण्याचे आवाहन करण्यात आले.


हार–जीत हा निवडणुकीचा भाग असला, तरी चुकीचा निर्णय घेतल्यास त्याचा फटका पुढील पिढीला बसतो, अशी भूमिका मांडत भावनिक आवाहनांना बळी न पडता गेल्या तीस वर्षांचा वस्तुनिष्ठ लेखाजोखा तपासण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले. बदल हवा असेल, तर सक्षम आणि काम करणाऱ्या नेतृत्वाला संधी देणे आवश्यक असल्याचेही प्रचारातून अधोरेखित करण्यात आले.


१५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा हक्क बजावून लोकशाही अधिक मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अभ्युदयनगर, जिजामातानगर व परिसरातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि कष्टकरी वर्गाच्या भवितव्यासाठी विकासाचा मार्ग निवडण्याचा संदेश प्रचारातून दिला जात असून, मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २०५ मधून भाजप–शिवसेना युतीच्या उमेदवार वर्षा गणेश शिंदे यांच्या उमेदवारीकडे नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे.

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट