NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, या मराठी साहित्यिकांचा होणार सन्मान

साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, या मराठी साहित्यिकांचा होणार सन्मान

नवी दिल्ली - साहित्य अकादमीचे 23 भारतीय भाषांमधील पुरस्कार आज जाहीर झाले. त्यात मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत आणि तरुण लेखक प्रदीप कोकरे यांना पुरस्कार जाहीर झाला. डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ कवितासंग्रहाला बालवाड्.मय पुरस्कार झाला आहे तर प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ कादंबरीला युवा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रदीप कोकरे यांनी मुंबईच्या गिरणी कामगार संपाच्या नंतरचे जीवन, वाढती बेकारी आणि ग्रामीण भागातून नागर जीवनात येऊन स्थिर होऊ पाहणाऱ्या युवकांचे जग आपल्या कादंबरीमध्ये टिपलेले आहे.

डॉ. सुरेश सावंत यांनी कथा, कविता, कादंबरी, चरित्र, बालसाहित्य अशा साऱ्या कलाकृतींच्या क्षेत्रात मुशाफिरी केली आहे. त्यांच्या बालकवितेवर विद्यार्थ्यांनी एम. फिल.चे प्रबंध लिहिलेत. डॉ. सावंत यांचा राष्ट्रपती पुरस्कारासह महाराष्ट्र राज्य शासनाच्या उत्कृष्ट साहित्यनिर्मिती पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. साहित्य अकादमीच्या बालसाहित्य पुरस्कारात विचारार्थ अंतिम यादीमध्ये पाच पुस्तके होती. त्यात कैलास दौंड यांचे आई मी पुस्तक होईन (कवितासंग्रह), सुरेश वांदिले यांचे आम्ही स्मार्ट मुले (कादंबरी), सुरेश सावंत यांचे आभाळमाया (कवितासंग्रह), प्रशांत असनारे यांचे मोराच्या गावाला जाऊया (कवितासंग्रह) आणि वर्षा गर्जेंद्रगडकर यांचा सृष्टीची निर्मिती आणि इतर कथा हा कथासंग्रह होता. यातून निवड समितीच्या सदस्यांनी बहुमताने सुरेश सावंत यांच्या आभाळमाया या कवितासंग्रहाची निवड केली. बाल पुरस्कार निवड समितीचे सदस्य म्हणून एकनाथ आव्हाड, सुषमा नवंगुल आणि लक्ष्मण कडू यांनी काम पाहिले.

साहित्य अकादमीच्या युवा पुरस्काराच्या अंतिम यादीमध्ये 7 पुस्तके होती. त्यात आदित्य दवणे यांचे युद्धानंतर (कवितासंग्रह), चिन्मय किरण मोघे यांचे तथागत (कादंबरी), पूजा भडांगे यांचे ऐहिकाच्या मृगजळात (कवितासंग्रह), प्रदीप कोकरे यांचे खोल खोल दुष्काळ डोळे (कादंबरी), प्रवीण रतिलाल पवार यांचे ऑनलाइन प्रेमाची ऑफलाइन कहाणी (कादंबरी), सागर संजय जाधव यांचे माती मागतेय पेनकिलर आणि सुमेध कुमार इंगळे यांची महामाया निळावंती ही कादंबरी होती.युवा पुरस्कार निवड समितीमध्ये सदस्य म्हणून प्रा. अविनाश कोल्हे, प्रा. इंद्रजीत भालेराव आणि डॉ. रणधीर शिंदे यांनी काम पाहिले. त्यांनी बहुमताने प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीची निवड केली.


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट