NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

लोह खाणींसाठी गडचिरोलीत होणार लाखो झाडांची कत्तल

लोह खाणींसाठी गडचिरोलीत होणार लाखो झाडांची कत्तल

गडचिरोली,दि. १० : गडचिरोलीच्या सूरजागड लोह खाणीतील उत्खनन क्षमतेच्या वाढीला पर्यावरण विभागाने मंजुरी दिली आहे. याकरिता खाण परिसरातील ९०० हेक्टर जंगलावरील तब्बल १ लाख झाडे तोडण्याला देखील वन्यजीव संरक्षणाच्या अटीसह परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे ९३७ हेक्टर वनजमीन खाणकामासाठी वापरण्यात येणार असून या अंतर्गत येणाऱ्या १.२३ लाख झाडांची कत्तल होणार आहे. त्याचबरोबर या भागातील टायगर कॉरिडोर देखील धोक्यात येईल, असे पर्यावरणवाद्यांचे मत आहे.

दोन महिन्यांपूर्वी लॉयड मेटल्स कंपनीची उत्खनन क्षमता १० दशलक्षवरून २६ दशलक्ष टन इतकी करण्यासाठी पर्यावरण विषयक जन सुनावणी प्रशासनाकडून घेतली होती. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या कोळसा विरहित खाण प्रकल्पांवरील तज्ञ मूल्यांकन समितीने (ईएसी) लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडला गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड खाणीतील लोहखनिज उत्पादन अधिक करण्यासाठी पर्यावरणीय मंजुरीची शिफारस केली होती. त्यानंतर काही आठवड्यांतच पर्यावरण मंत्रालयाने या कंपनीच्या अयस्क-वॉशिंग प्लांटसाठी ९०० हेक्टर जंगल परिसरातील लाखाहून अधिक झाडे तोडण्याला परवानगी दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दरम्यान, या लोह खाणीतील उत्खनन क्षमतेच्या विस्ताराविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिकांवर सुनावणी सुरु असतानाच ईएसीने खाण विस्ताराला मान्यता दिली. लॉयडस् कंपनीला २००७ मध्ये खाण भाडेपट्टा मिळाला असला तरी खाणकाम २०१६ ला सुरु झाले. मात्र, नक्षलवाद्यांनी विरोध केल्याने ते थांबवावे लागले होते. वन हक्कांच्या मुद्द्यांमुळे आदिवासी समाजाकडून लोहखनिज उत्खननाला अजूनही विरोध सुरु आहे. या प्रकल्पामुळे ३० ते ४० गावांमध्ये ५० हजारांपेक्षा जास्त लोक विस्थापित होण्याची भीती आहे.


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट