मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

परिस्थिती अनुकूल असल्यास जरांगे निवडणुकीच्या मैदानात

परिस्थिती अनुकूल असल्यास जरांगे निवडणुकीच्या मैदानात

जालना - आम्हाला समाजाच्या हिताचा निर्णय घ्यायचा आहे, सगळ्यांची भावना आहे उमेदवार उभा केला पाहिजे, मात्र एका जातीवर उमेदवार उभा करणं आहे निवडून आणणं हे सोपं नाही. मराठा जातीत पडायची ताकद आहे त्यामुळे आपण मधला मार्ग काढला , परिस्थिती अनुकूल असल्यास निवडणुकीच्या मैदानात उताण्याचे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी जाहीर केले आहे.

आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळेस आमचं म्हणणं आहे की आपण निवडून आणून दाखवावं. मी समाजाचा चौफेर विचार केला, जिथे उमेदवार निवडून येतील तिथे उमेदवार उभे करायचे. एस.सी. आणि एस. टी च्या ज्या जागा आहे, त्या ठिकाणी जो उमेदवार लिहून देईल की आम्ही मराठ्यांच्या मागण्यांशी सहमत आहे, त्याला निवडून आणणार असे जरांगे म्हणाले.

जिथे उमेदवार उभे करायचे नाही तिथे समोरच्या (महायुती/ महाविकास आघाडीच्या) उमेदवाराने 500 रुपयांच्या बाँड वर लिहून द्यायचं की आम्ही मराठ्यांच्या मागण्यांशी सहमत आहे. सगळ्या उमेदवारांनी आता फॉर्म भरा, नंतर ज्याला सांगितलं जाईल त्याने त्याचा फॉर्म काढून घ्यायचा आहे. किती मतदार संघात उमेदवार द्यायचे या बाबतचा निर्णय 3/4 दिवसात सांगणार आहोत असे ते म्हणाले.

जिथे आपण उमेदवार देणार तिथे आम्ही एस.सी, एस. टी, मुस्लिम ज्या समाजाचा उमेदवार येईल त्याचा आम्ही विचार करून त्या ठिकाणी तो उमेदवार दिला जाईल. मला लांबून सगळंच दिवसत नाही.

या मतदार संघात आपलं सीट निघत हे मला समाज बांधवांनी येऊन सांगा तिथे आपण आपला उमेदवार देऊ. मुंबईत मराठ्यांचे मोठं मतदान आहे, तिथे आपण 17 जागा पाडू शकतो. मी लिस्ट काढणार आहे, कुठे आपण उमेदवार उभे करू शकतो आणि कुठे उमेदवार उभे करता येत नाही.

मतदान बूथ कोणाला capture करू द्यायचं नाही. ओबीसी आणि मराठा हा वाद फक्त दिसतोय तसं काहीही नाही. गावोगावी मुस्लिम, दलीत, ओबीसी एकच आहेत असेही जरांगे यावेळी म्हणाले.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट