मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना वंदन

       भारत देशाच्या संविधानाचे जनक, बोधिसत्व, कायदेपंडित, पत्रकार, अर्थतज्ञ, समाजसुधारक डो बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६५ वा महापरीनिर्वाण दिवस, १४ एप्रिल १८९१ मध्ये जन्माला आलेल्या भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच डॉ बाबसाहेब आंबेडकरांनी त्यांच्या बालपणातच अनेक स्वप्ने बघितली होती. समस्त भारत देशाचे स्वातंत्र्य आणि दलितांचा उद्धार फक्त एवढेच न्हवे तर बाबासाहेबांना एक असा भारत देश घडवायचा होता जिथे समता, बंधुता आणि एकता या धोरणाचे अवलंबन होईल. आणि यासाठी अगदी शेवट पर्यंत बाबासाहेब आणि त्यांचे अनुयायी झटत राहिले. आज बाबासाहेबांच्य ६५ व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त जाणून घेऊया बाबासाहेबांची काही खास गोष्ठी 

१ - ज्ञानाचा अथांग सागर असणारे डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी एकूण ३२ पदव्या घेतल्या होत्या. ज्यामध्ये बीए, एमए, पीएचडी (अर्थशास्त्र), एमएससी (Provincial Decentralization of Imperial Finance in British India), बॅरिस्टर इन लॉ, डीएससी (The Problem of the Rupee – Its origin and its solution), एलएलडी (HIS achievements, Leadership and authoring the constitution of India), डी.लिट. या काही महत्वाच्या पदव्या आहेत.

२ - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केलेली वर्तमानपत्रे : मूकनायक (१९२०), बहिष्कृत भारत (१९२७), समता (१९२८), जनता (१९३०), प्रबुद्ध भारत (१९५६, जनताचे नामांतर).

३ - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या गाजलेल्या घोषणा : ‘मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो, ते माझ्या हाती नव्हते. हिंदू म्हणून मी जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही’. ‘जे आपला इतिहास विसरतात ते कधीही इतिहास घडवू शकत नाहीत’. ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’. .स्वातंत्र, समता, बंधुता शिकवणाराच धर्म मला प्रिय वाटतो’. ‘जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असायला हवे’. 

४ - महत्वाचे सत्याग्रह / आंदोलने : महाडचे चवदार तळे सत्याग्रह, (२० मार्च १९२७), मनुस्मृती दहन (२५ डिसेंबर १९२७), शेतकऱ्यांची चळवळ (१९२८), पर्वती देवालय प्रवेश (१९२९), काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह (१९३१), पुणे करार (१९३२), येवला परिषद (१९३५), बौद्ध धर्मात प्रवेश (१४ ऑक्टोबर १९५६), बावीस प्रतिज्ञा.

फक्त दलित समाजासाठी नाही तर समस्त भारत देशासाठी झटणाऱ्या महामानवास, महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन 


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट