NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

संसद व विधी मंडळ सदस्यांच्या शाही मेजवानीवरुन वाद

संसद व विधी मंडळ सदस्यांच्या शाही मेजवानीवरुन वाद

नवी दिल्ली - शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायला पैसे नाहीत, लाडक्या बहिणींना देण्यासाठी २१०० रुपये पैसे नाहीत, अशी ओरड महायुती सरकारकडून सुरू आहे. मात्र दुसरीकडे संसद व विधी मंडळ सदस्यांना जेवणासाठी चांदीचे ताट तेही ५५० रुपये भाड्याने, जेवणाच्या एका ताटाची किंमत ४,५०० रुपये खर्च झाल्याने संसद व विधी मंडळ सदस्यांचा हा शाही पाहुणचार आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आगामी पावसाळी अधिवेशनात चांदीचे ताट, शाही पाहुणचार यावर विरोधक महायुती सरकारला जाब विचारणार असल्याचे मविआच्या नेत्यांनी सांगितले.

संसद व विधिमंडळ अंदाज समितीतील सदस्यांनी ४५०० रुपयांचे शाही भोजन तेही ५५० रुपये भाड्याच्या चांदीच्या ताटात असा पाहुणचार घेतला. एका ताटासाठी ४,५०० रुपये खर्च हा पैसा धुळे विश्रामगृहातील खोली क्रमांक १०२ मध्ये सापडलेल्या अंदाज समितीच्या पैशातून होता का, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला.

शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला, लाडक्या बहिणीला २१०० रुपये देण्यास पैसे नाहीत आणि मेजवानी झोडण्यासाठी मात्र पैसे आहेत, अशी टीका सपकाळ यांनी केली. राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असून शेतकरी आत्महत्या करत आहेत, बेरोजगारी वाढत आहे. शासनाच्या अनेक योजना ठप्प आहेत. पण या सगळ्या संकटात सत्ताधाऱ्यांनी चांदीच्या ताटात पाच हजार रुपयांच्या थाळीचा ‘शाही ‘ अनुभव घेतला. या आर्थिक कंगालीतसुद्धा सरकारला फक्त दिखावा करायचा आहे. गरिबांच्या वाट्याचे अन्न बाजूला ठेऊन, स्वतः मात्र शाही थाटात जगायचे आहे. हे गरीब आणि सामान्य जनतेच्या जखमांवर तिखट मीठ चोळणे आहे, अशी टीका विधी मंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

असा केला शाही पाहुणचारावर खर्च

-चांदीच्या भाड्याच्या ताटासाठी ५५० रुपये

-एका जेवणाच्या ताटासाठी ४,५०० रुपये


रिपोर्टर

संबंधित पोस्ट