NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

चंद्रपुरात उन्हाच्या तडाख्याने बदलविले शाळामहाविद्यालयाचे वेळापत्रक

 चंद्रपुरात उन्हाच्या तडाख्याने बदलविले शाळामहाविद्यालयाचे वेळापत्रक

   चंद्रपूर - उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसू लागल्याने जिल्हाभरातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळा आणि महाविद्यालयांनी वेळांत बदल करून सकाळी १० वाजेपर्यंतच वर्ग सुरू ठेवावे, अशा सूचना जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत. परीक्षा सकाळच्या सत्रात घ्यावात. उष्णता लाटेच्या स्थितीनुसार विद्यार्थ्यांना सुट्टी द्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे. दरम्यान, मंगळवारी चंद्रपूरचे तापमान 0.2 अंशांनी वाढून देशातून सर्वाधिक 45.8, तर ब्रह्मपुरीत 45.2 अंश

सेल्सिअस एवढी नोंद झाली. उन्हाच्या तडाख्याने नागरिकांनी दुपारच्या सुमारास घरांतच राहणे पसंत केल्याचे दिसून आले.

प्रादेशिक परिवहन कार्यालयानेही वेळापत्रकात बदल केले. योग्यता प्रमाणपत्रासाठी बाबूपेठ-बल्लारपूर बायपास रोड येथील होणारी तपासणी आणि कार्यालयातील पक्की अनुज्ञप्ती चाचणी आजपासून सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत तसेच दुपारी 4 ते 6:30 वाजेपर्यंत करण्यात येईल. ज्यांनी वाहन 4.0 या वाहन प्रणालीवर वेळा घेतल्या त्यांनाही हीच वेळ लागू असणार आहे.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट