NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

महाविकास आघाडीतला गोंधळ संपता संपेना…

महाविकास आघाडीतला गोंधळ संपता संपेना…

मुंबई -राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची उद्याची अंतिम तारीख असताना ही महा विकास आघाडीतला गोंधळ संपायचे नाव घेत नाही, उमेदवार याद्यांमध्ये घोळ घातला असतानाच आता प्रत्येकी नव्वद जागांचा प्रस्ताव ठरलेलाच नाही अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली आहे. महायुतीच्या जागांचे वाटप ही अद्याप अंतिम नाही, रात्री उशिरा पर्यंत आणखी काही जागा दोन्ही बाजूने जाहीर करण्यात येतील अशी अपेक्षा आहे.गेल्या आठवड्यात आघाडीने पत्रकार परिषद घेऊन आमच्या प्रत्येकी ८५ जागांवर एकमत झाल्याचे सांगितले आणि एकूण २७० जागा अंतिम झाल्याचेही स्पष्ट केले होते. त्याचवेळी हे अंकगणित चुकल्याची जाणीव माध्यमांनी करून दिल्यावर दुसऱ्या दिवशी बाळासाहेब थोरात यांनी आमच्या प्रत्येकी नव्वद जागांचे ठरल्याचे माध्यमांना सांगितले होते, आज पटोले यांनी थेट नव्वद जागांचा फॉर्म्युला आला कुठून असा सवाल मध्यमांनाच केला , यातून त्यांच्यात किती गोंधळ आहे ते चव्हाट्यावर आले आहे.दुसरीकडे काँग्रेसने आपले दोन उमेदवार बदलले, एक अंधेरी प मधून सचिन सावंत ऐवजी अशोक जाधव तर औरंगाबाद पूर्व मधून लहू शेवाळे यांना मधुकर देशमुख यांच्या जागी उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने काटोल मधून अनिल देशमुख यांच्या ऐवजी त्यांचा मुलगा सलील देशमुख यांना उमेदवारी दिली तर शिवसेनाउबाठा पक्षाने चोपडा मतदारसंघात राजू तडवी ऐवजी प्रताप सोनावणे यांना बदलून दिले आहे. यामुळे त्यांच्यात नेमके काय चालले आहे ते समजत नाही.महाविकास आघाडीत असा घोळ सुरूच आहे, सोलापूर दक्षिण आणि दिग्रस मधून काँग्रेस आणि शिवसेना उबाठा या दोनहीं पक्षांनी तर परांडा मधून शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने आपले स्वतंत्र उमेदवार दिले आहेत.दुसरीकडे महायुतीत असा गोंधळ नसला तरी त्यांचे ही अजून उमेदवार अंतिम होत नाहीत , भाजपची १४६ जणांची , शिवसेनेची ६५ जणांची तर राष्ट्रवादी काँग्रेस ची ४९ जणांची यादी जाहीर करण्यात आली आहे, यामुळे महायुतीच्या २६० तर महा विकास आघाडीच्या २६६ जागा जाहीर करण्यात आल्या आहेत, दोन्ही बाजूने बंडखोरांची आणि नाराज नेत्यांची रांग लागली असून त्याचा फटका नेमका कोणाला बसतो हे पाहायचे.


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट