NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

हॉकीत भारताने इतिहास रचला, चीनचा धुव्वा उडवत पाचव्यांदा जिंकली चॅम्पियन्स ट्रॉफी

हॉकीत भारताने इतिहास रचला, चीनचा धुव्वा उडवत पाचव्यांदा जिंकली चॅम्पियन्स ट्रॉफी

क्रीडा     

मुंबई - यजमान चीनचा पराभव करून भारतीय हॉकी संघाने पाचव्यांदा एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. या सामन्यात टीम इंडियाने चौथ्या क्वार्टरमध्ये भारताच्या जुगराज सिंहने गोल केला त्यामुळे भारताने हा अतितटीचा सामना 1-0 ने जिंकला. यासह भारताने सलग दुसऱ्यांदा एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले आहे.भारत आतापर्यंत या टूर्नामेंटमधील सर्वश्रेष्ठ टीम ठरली, भारतीय खेळाडूंनी यंदा एकूण 26 गोल केले आहेत.

भारताने सेमी फायनलमध्ये कोरियाला 4-1 हरवून फायनलमध्ये धडक दिली. टीम इंडियाने यंदाच्या स्पर्धेतील सर्व सामने जिंकले यासह पॉईंट टेबलमध्ये सुद्धा भारत नंबर 1 वर होता. गतविजेते आणि पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या टीम इंडिया समोर एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफी 2024 च्या फायनलमध्ये चीनच्या टीमचे आव्हान होते. पहिल्या तीनही क्वार्टरमध्ये टीम इंडियाला चीनच्या बचावावर मात करून गोल करता आला नाही. अखेर जुगराज सिंगने 51 व्या मिनिटाला अप्रतिम गोल करून संघाला विजय मिळवून दिला.

टीम इंडियाने आतापर्यंत पाचव्यांदा एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकली आहे. पुरुष हॉकी एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफीचा पहिला सीजन 2011 मध्ये खेळवला गेला होता. तेव्हा भारताने पाकिस्तानला फायनलमध्ये हरवले होते. यानंतर 2013, 2018 आणि 2023 मध्ये सुद्धा विजेतेपद जिंकले होते. 2018 मध्ये विजेतेपद हे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना विभागून देण्यात आले होते. भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंह याने यंदाच्या स्पर्धेत एकूण 7 गोल केले.


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट