पोस्टाची प्रीमियम सेवा – २४ तासांत पोहोचणार पार्सल भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह देण्यासाठी कॅनडा सरकारने मागितले 35 लाख मुंबईतील पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग, मुख्य रस्ते व रहदारीचे रस्‍ते समतल करावेत, उप महापौर श्री. संजय घाडी 10 वी भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिकांचा संच चोरीला 10 वी भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिकांचा संच चोरीला 2026 चे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, या मराठी लेखकाचा सन्मान सेवानिवृत्त एस.टी. कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास सिंधू सेवा दलातर्फे शुक्रवारी (ता. २०) ‘चेटीचंड’ महोत्सव सक्तीने धर्मांतर विरोधी विधेयकावर विरोधी पक्षांमध्ये फूट बेकायदेशीर धर्मांतरणाच्या विरोधातील विधेयक सर्व धर्मियांसाठी समान…. Fastag वार्षिक पास १ एप्रिलपासून महागणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेला स्थगिती आणि मनाई आदेश देण्याची मागणी आखाती देशातील युद्धामुळे टरबुज उत्पादक शेतकऱ्यांना फटका… राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर भारतीय चित्रपटांसाठी आता सबटायटल्स आणि ऑडिओ वर्णन अनिवार्य भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना व्हिसा मुदतवाढ LPG गॅसला पर्याय सापडल्याचा पुण्यातील शास्त्रज्ञांचा दावा गॅस पुरवठ्याच्या प्राधान्यक्रमाची नियमावली जारी अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांमुळे पादचारी हैराण पंधरादिवसांत राज्यातील मद्यनिर्मिती बंद करावी लागणार WhatsApp, FB आणि Messenger वर फसवणूक टाळण्यासाठी Meta चे नवे फिचर्स मुंबई मनपाच्या शाळांमध्ये मध्यान्ह भोजनाऐवजी फळे वाटप सक्तीच्या धर्मांतरासाठी ७ वर्षांची कैद, ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानसभेत सादर जागतिक महिला दिन मनाला स्पर्श करणारा उपक्रम ठरला LPG टंचाईमुळे इन्डक्शनच्या मागणीत मोठी वाढ ग्रामीण भागात 45 दिवसांनंतरच बुक होणार LPG सिलेंडर प्रवासी सेवा देणाऱ्या वाहनांना ‘QR कोड’ अनिवार्य देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था महाराष्ट्राचीच…. जप्तीची कारवाई सुरू होताच २ हजार ८८८ मालमत्ताधारकांनी भरला कर महाराष्ट्र केसरी २०२५-२६’ कुस्ती स्पर्धेच्या बोधचिन्हाचे झाले अनावरण मुंबईतल्या घरासाठी गिरणी कामगार एकवटला! मुरबे बंदर प्रकल्पाच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह बहुचर्चित ‘ लाडकी बहीण ‘ योजनेवर येतोय चित्रपट प्रसिद्ध रॅपर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मुंबई येथे आगमन ‘हॉवर्थ इंडिया’तर्फे महिला दिनी कर्तृत्त्ववान महिलांसह प्रमुख शहरांमध्ये ‘गिव्ह टू गेन’ मालिकेचे आयोजन माणिकडोह मधील २० बिबट्यांचे वनतारा केंद्रात स्थलांतर अंबरनाथ शिवमंदिर परिसरात 32 घरांवर बुलडोझर हवामान विभागाकडून उष्णतेचा अलर्ट जारी ६० रुपयांनी वाढले घरगुती Gas सिलिंडरचे दर या शहरांत सुरू होणार BSNL 5G सेवा एकल मातांना पूर्ण पालकत्वाचा अधिकार – न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुंभदूत ॲपचे अनावरण बृहन्‍मुंबई महानगरपालिका स्‍थायी समिती अध्यक्षपदी श्री. प्रभाकर शिंदे यांची बिनविरोध निवड PCM ग्रुप घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मिळेल मेडिकलला प्रवेश शेअर बाजारात भीषण भूकंप! इराण-अमेरिका युद्धाच्या सावटाखाली बाजार ‘रक्तबंबाळ पंतप्रधानांच्या मेन्यूला अस्सल मराठी तडका ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे पोस्टर आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी झाले रिलीज! DGCA कडून विमान प्रवासातील गैरवर्तनाबाबत; ‘झीरो टॉलरन्स पॉलिसी’ लागू अभिनेता प्रसाद ओकच्या कामगिरीचा विश्वविक्रम राज्यसभेच्या ३७ जागांसाठी १६ मार्चला निवडणूक नाशिकमधील द्राक्ष उत्पादक संकटात विमानात एवढं फ्यूएल घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय? जन गण मन आधी ‘वंदे मातरम्’ गाण्याला दल खालसाचा विरोध राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पद भरतीस मान्यता काळाचौकी येथे खोदकामामुळे अपघातात वाढ हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ पुस्तकातून मार्गदर्शन आणि उपाय मस्क यांची AI कंपनी चंद्रावर उभारणार फॅक्टरी भोईवाडा परिसरात वाहतूक विभागाची धडक संयुक्त कारवाई; नगरसेविका श्रद्धा जाधव सोडवणार क्यू आर कोडने नागरी समस्या महाशिवरात्रीसाठी भीमाशंकर मंदिर राहणार बंद भारत लवकरच या देशात UPI लाँन्च करणार RSS च्या कार्यक्रमाला सलमान खानची उपस्थिती लाडक्या बहिणींच्या e-KYC ला मुदतवाढ १२ जिल्हापरिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान देशभर ओला, उबर आणि रॅपिडो चा संप इस्लामाबादमध्ये मशिदीवर आत्मघातकी हल्ला 31 जण मृत्यूमुखी, 169 जखमी भारतातील पहिला AI IPO करी रोड पदपथांवरील हायड्रेलमुळे पादचारी हैराण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना मिळणार Z+ दर्जाची सुरक्षा चेक बाऊन्स प्रकरणी अभिनेता राजपाल यादव विरोधात अटक वॉरंट शक्तिपीठ महामार्गाच्या खर्चात तब्बल १५ हजार कोटींची वाढ अजितदादा पवार यांचे संगमवाडी येथे भव्य स्मारक उभारण्याची मागणी युमनाम खेमचंद सिंह झाले मणिपूरचे 13 वे मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाची शपथ भायखळा येथे दिवंगत कै.शरद (आप्पा) पवार उद्यानाचे झाले लोकार्पण आज निर्मला सीतारमण नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार, मतदार यादीत नाव न सापडल्यास BMC च्या या हेल्पलाईनवर कॉल करा प्रचारतोफा थंडावल्या, उमेदवारांना घरोघरी प्रचारास मुभा राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका 5 फेब्रुवारीला Blinkit, Zepto, Swiggy, Zomato ची 10 मिनिटांची डिलिव्हरी सर्व्हीस बंद नालासोपार्‍यात १० लाखांची रोकड जप्त यामिनी जाधव यांचा मुंबई पालिका निवडणुकीसाठी प्रचाराला वेग राजुलच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे भांडुप मध्ये वेदांता समूहाचे अध्यक्ष दान करणार ७५ टक्के संपत्ती नाना आंबोले यांना शिवडीकरांचा वाढता प्रतिसाद ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा टीझर प्रसिद्ध क्रांतिज्योती विद्यालय ‘ सुपरहीट, पहिल्याच आठवड्यात ३.९१ कोटी कमाई राज्यभरात प्रचारसभांचा धुरळा, फडणवीस ठाणेकरांशी संवाद ... मुंबईत धावणार 18 डब्ब्यांची लोकल राज्यातील २७ लाख वाहनांना अद्यापही HSRP नाही, लवकरच तपासणी होणार बिनविरोध निवडीला मनसेचा हायकोर्टात आव्हान माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचं दीर्घ आजारानं निधन वचन ठाकरेंचं! मुंबईकरांसाठी राज-उद्धव ठाकरेंकडून शिवशक्तीचा वचननामा जाहीर आज होणार फैसला! कर्णधार वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका राजुल संजय पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज संरक्षण क्षेत्रासाठी 79 हजार कोटींच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी ३३ वर्षांनंतर पुन्हा उघडणार जेजे हत्याकांडाची केस प्रशिक्षकपदावरून गौतम गंभीरला बीसीसीआयकडून मिळणार डच्चू? अखेर BCCI ने सोडलं मौन, पुण्यात भाजप, राष्ट्रवादीविरोधात लढणार, मविआचा फॉर्म्युला ठरला; 50-50-50 मनसेलाही सोबत घेणार शिवसेनेची लवकरच पहिली यादी; एकनाथ शिंदेंकडून 60 माजी नगरसेवकांना संधी, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी विशेष टोलमाफी पास पर्यूषण पर्वात दोन दिवस कत्तलखाने राहणार बंद २९ टक्के कोसळला या गेमिंग कंपनीचा शेअर Asia Cup मध्ये भारत-पाक आमने सामने- सरकारने दिली परवानगी 12 आणि 28 टक्क्यांचा GST स्लॅब होणार रद्द, सर्वसामान्यांना फायदा अमेरिकेत छत्रपती शिवरायांच्या कीर्तीरथाची भव्यदिव्य मिरवणूक कानात ईअर फोन असल्याने युवकाचा मृत्यू पोस्ट झाले अत्याधुनिक – अ‍ॅडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म सुरु BSNL ची मान्सून ऑफर – 1 महिना मोफत इंटरनेट गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक सलोख्यासाठी हजरत महंमद पैगंबर जयंती ८ सप्टेंबर रोजी होणार .. आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रवासाला तब्बल बारा तास, मग टोल का द्यावा, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल उपमुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर केले ‘लाडकी सून’ अभियान मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी… कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ… उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच झाले सुरू मतदार यादीबाबतचे आरोप शपथपत्रासह करा अन्यथा माफी मागा… शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल १८ ऑगस्टला जालन्यात मुसळधार पावसाने नदी नाले तुडुंब… मुंबईत पागडीधारकांना आदित्य ठाकरेंकडून पुनर्वसनाची हमी कॅडबरी डेअरी मिल्कच्या रॅपरवर खास मराठीत शब्द पहिल्याच दिवशी FASTag वार्षिक पासला भरभरुन प्रतिसाद, १.४ लाखांहून अधिक नोंदणी राज्यात १६ ते २१ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राचे उद्घाटन लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत सर्व घटकांना सोबत घेऊन विकास करणार ! नारळी पौर्णिमेला वरळीत हुल्लडबाजी करणाऱ्या उबाठा गटावर कारवाई करा BSF मध्ये 1121 जागांसाठी भरती; 10वी-12वी व ITI करु शकतात अर्ज 15 ऑगस्टपासून सुरू होणार FASTag Pass गणेशोत्सव काळात मुंबईत ‘डीजे’ला बंदी दादरमध्ये इमारतीच्या छतावर कबुतरखाना सुरू आधार कार्ड, व्होटर कार्ड,रेशन कार्ड हे नागरिकत्त्वाचे पुरावे नाहीत 15 ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवलीत मांसाहार बंदी इथेनॉल पुरवठ्यात उ.प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसर्‍या स्थानी हेपेटायटीस D पासून कर्करोगाचा धोका असल्याचा WHO चा निर्वाळा दहिहंडी सराव करताना 11 वर्षीय बालकाने गमावला जीव अमेरिकेच्या टॅरिफमुळे दोन अब्ज डॉलरची कोळंबी निर्यात धोक्यात सिंचन तलाव धोक्यात; भिंत खचली, २०० एकर शेतीला धोका…. हुतात्मा स्मारकाच ऐतिहासिक महत्त्व टिकले पाहिजे - आमदार सचिन अहिर रेल्वेकडून इतर प्रवाशांसह मुंबईकरांसाठी सुरक्षेच्या नव्या उपाययोजना राजकीय पक्षाचा चेहरा राहिलेली व्यक्ति न्यायालयाचा चेहरा असणे योग्य आहे का ? सरकारने लोकसभेत सादर केलेले आयकर विधेयक घेतले मागे अमेरिकेच्या टॅरिफचा भारतीय वस्त्रोद्योगाला मोठा फटका ठाणे जिल्ह्यातील या शहरात लवकरच सुरु होणार ‘पॉड टॅक्सी’ सेवा माथेरानची हातरिक्षा बंद करा – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कबुतरांना अन्न-पाणी देण्यावर उच्च न्यायालयाची बंदी कायम एक पडदा सिनेमागृहाबाबत संयुक्त समिती कोल्हापूरकर जिंकले, महादेवी हत्तीण पुन्हा येणार नांदणी मठात उत्तराखंडला गेलेले महाराष्ट्रातील सर्व पर्यटक सुखरूप ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती उत्तरकाशीमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार, ४ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता भाजपाचे पदाधिकारी बनले न्यायाधीश, न्यायपालिकेचा निष्पक्षपणा धोक्यात? सेंचुरी मिलचा भूखंड कोणाच्या घशात घालणार? कामगार नेते गोविंदराव मोहिते‌ भायखळ्यात आमदार चषक 2025 ही भव्य हॉलीबॉल स्पर्धा संपन्न शिवसेना प्रभाग 205 च्या वतीने लाडू वाटप नृत्येश्वर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तैवानमध्ये भारतीय लोकनृत्यांची केली बहारदार सादरीकरण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानकाच्या नामकरणाविरोधात शिवसेनेचे आंदोलन एसटी आता करणार रिटेल (किरकोळ ) इंधन विक्री कबुतरांना खाद्य देणार्‍याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजपामध्ये प्रवेश ‘$1 ट्रिलियन’ अर्थव्यवस्थेकडे महाराष्ट्राची वेगवान वाटचाल! निवडणूक पारदर्शक होण्यासाठी मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडा राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम हाती… स्वामीनाथन यांचा जन्मदिन “शाश्वत शेती दिन” म्हणून साजरा राज्य सरकारने जाहीर केले नवे सोशल मीडिया नियम राज ठाकरे आल्यानं कित्येक पटीनं आनंद- उद्धव ठाकरे खडसेंचा जावई पुण्यात रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडला गेला लाडकी बहीण योजनेसाठी 26.34 लाख महिला अपात्र जन्मतःच या बालकाच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 10 उत्तीर्ण उमेदवारांसाठी IB मध्ये नोकरीची मोठी संधी शाळा, कॉलेज आणि कोचिंग संस्थांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून 15 निर्देश जारी मुंबई रेल्वे साखळी स्फोट प्रकरण : हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी ससून डॉकमधील मच्छीमारांच्या पुनर्वसनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे.. ; राज ठाकरे निशिकांत दुबेवर कडाडले सीमाभागातील निपाणी शहरात कन्नड भाषेची सक्ती महायुती सरकारला सत्तेचा माज -माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई महाराष्ट्राचीच , मुंबईत मराठी माणसाचाच आवाज बुलंद …. ‘जय गुजरात’ म्हणणारे एकनाथ शिंदे गुजरात व अमित शाहांचे गुलाम म्हाडा लॉटरीचा धडाका; ठाण्यात 2000 घरांसाठी सोडत, वाचा कधी येणार जाहिरात पावसाळ्यात केस का गळतात? अशी घरगुती उपाय करून थांबवा केस गळती NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

मोदीशाहीचा एककल्ली कारभार

मोदीशाहीचा एककल्ली कारभार

                         लोकसभा निवडणुक झाल्यानंतर निकाल भाजपच्या बाजुने लागला आणि एनडीएचे सरकार केंद्रात सत्तेवर आले आहे. या लोकसभा निवडणुकीत अनेक क्लृप्त्या लढवत भाजपाने केंद्रात सत्ता प्राप्त केली. भाजपाने लोकसभा निवडणुकीत मोदींसह बड्या नेत्यांच्या सभा आयोजित केल्या होत्या. प्रत्येक सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इंडिया आघाडी व काँग्रेस वर टीका करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेला अनेक आश्वासने देतात, परंतु त्यांनी गेल्या दहा वर्षांत किती आश्वासने पाळली हा चर्चेचा विषय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत  काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका कएली होती. परंतु स्वतः दिलेल्या आश्वासनांबद्दल ते काहीच बोलत नसल्याचे दिसून येते. फक्त भाजपाला मत द्या, आम्ही अल्पसंख्यांक विरोधात आरक्षणाची भूमिका घेणार नाही असे महणत होते. परंतु दुसऱ्या बाजूला त्यांनी असे म्हटले की, मी धर्माच्या आधारे कोणत्याही समाजाला आरक्षण देणार नाही. याचा अर्थ असा होतो की, कोणत्याही जातीच्या आधारे आरक्षण द्यायला भाजपचा विरोध आहे. नरेंद्र मोदी यांनी देशात गेल्या दहा वर्षांत जे वातावरण पसरवले आहे, त्याचा परिणाम इतका गंभीर आहे की अनेक प्रादेशिक पक्ष फुटले आहेत, नेते सैरभर झाले आहेत. अशा परिस्थितीत सत्ताधारी राजकीय पक्ष भाजपा समाजकारण कसे करणार हा प्रश्न निर्माण होत आहे.

                  गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता पसरलेली दिसून येते. याचे कारण म्हणजे दोन प्रादेशिक पक्षांमधील नेत्यांनी बंडखोरी करून त्या पक्षावर ताबा मिळवला आहे. याला कारण महाराष्ट्रातील भाजपा हेच आहे. महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता निर्माण करून भाजपाला काही साध्य करायचे आहे, हे नरेंद्र मोदीच जाणोत. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशांमध्ये विरोधकांवर राष्ट्रीय तपास यंत्रणांची कारवाई सुरू केली आहे. तसेच अनेक राजकीय पक्षांमध्ये ढवळाढवळ केले आहे. त्यामुळे एकूणच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदललेले दिसते. अशा परिस्थितीत ज्या जनतेने नेत्यांना निवडून दिले, तेच नेते तडजोडी करून संकुचित विचारांच्या राजकीय पक्षांशी संधान साधत असल्याचे दिसते. त्यामुळे जनतेच्या मतांना कोणी जुमानत नसल्याचे दिसून येते. सद्यस्थितीत जनतेच्या मताला काहीच किंमत राहिलेली नाही. अशा परिस्थितीत लोकसभा निवडणूक झाली. तडजोडी करीत भाजपाने सत्ता आली, पण मतदार नाराज आहेत. 

                  लोकसभा निवडणुकीत निवडणुकीत मतांची टक्केवारी २०१९च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा १० ते ११ टक्क्यांनी कमी झाली. त्यामुळे मतदार लोकसभा निवडणूक २०२४ साठी उत्सुक नसलेला दिसतो. जेव्हा मतदार कमी संख्येने मतदान करतो त्यावेळेस मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो. कमी टक्क्यांमध्ये निवडून आलेला उमेदवार ग्राह्य कसा धरायचा हा प्रश्न येतो. भारत निवडणूक आयोगाने मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. परंतु मतदार मत देण्यासाठी राजी दिसले नाहीत. त्यामुळे लोकशाहीच्या संकेतांचा भंग झाला असल्याचे दिसते. या घटनेमागे अनेक कारणे आहेत. एक तर राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी मतदारांना दिलेल्या आश्वासनांचा भंग केला आहे. किंवा मतदारांना राजकीय पक्षांच्या तडजोडी मान्य नसल्याचे दिसते. कारण मतदारच या निवडणुकीत गोंधळलेला दिसतो आणि ही परिस्थिती केंद्रातील भाजपने लोकांवर लादलेली दिसते.

                  केंद्र सरकारने गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तत्कालीन मुख्यमंत्री असताना ज्या आरोपींनी एका अल्पसंख्याक महिलेवर अत्याचार, बलात्कार केला होता, त्याच आरोपींना विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इशाऱ्यावर सोडण्यात आले होते. त्यामुळे हे आरोपी तुरुंगाबाहेर येतात, त्यांचे सत्कार समारंभ करण्यात होतात, ही परिस्थिती नक्कीच सकारात्मक नाही. आणि या घटनेचे परिणाम खुद्द गुजरातमध्ये होणार असल्याचे दिसते. कारण गंभीर आरोपी असलेल्या लोकांचे सत्कार करणे ही बाब भवितव्यात भाजपाला महाग पडू शकते. त्यामुळे बेटी बचाव बेटी पढाव या अभियानाचे नेमके काय झाले, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट करण्याची गरज आहे. अल्पसंख्यांकावर अत्याचाराने करणे ही भाजपाची संस्कृती आहे काय याचाही विचार होणे आवश्यक आहे. तसेच देशांमध्ये विरोधकांवर राष्ट्रीय तपास यंत्रणांची कारवाई होत असल्याचे दिसते. ही कारवाई करून काही विरोधकांना केंद्र सरकारने तुरुंगात टाकले आहे. उदाहरणार्थ, दिल्लीतील आम आदमी पक्ष पक्षाचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांना केंद्र सरकारने राष्ट्रीय तपास यंत्रणेची कारवाई करत तुरुंगात ठेवले. त्यामुळे दिल्लीतील जनमत भाजपाविरोधात होते. तरीही आप प्रमुखांच्या अनुपस्थित भाजपाने दिल्लीतील ८ जागा जिंकल्या हे विशेष आहे. विरोधी राजकीय पक्षांना तपास यंत्रणांची भीती घालत आपल्या बाजूला वळवणे ही भाजपाची खेळी आहे. या खेळीला अनेक नेते बळी पडले आहेत. काही नेते खासगीमध्ये असे मान्य करत आहेत की, आमच्यावर केंद्रातून दबाव आला होता. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. परंतु ज्यांच्यावर दबाव आला ते नेते जनतेला कसे सुखी ठेवतील हा एक प्रश्न आहे. परंतु भारतात गेल्या दहा वर्षांत जे काही सुरू झाले आहे ते आश्चर्यकारक आहे असे दिसते. देशातील विरोधकांनी काही महिन्यांपासून ईव्हीएमच्या विरोधात आवाज उठवला होता, तो आवाजही केंद्र सरकारने दाबून टाकला. त्यामुळे केंद्र सरकारची देशात हुकूमशाही सुरू आहे याला पुष्टी मिळते. अशा परिस्थितीत जनता नेमके कुणाला मतदान करणार हे पहावे लागणार आहे.

                   देशात महागाई, बेरोजगारी आणि गरिबी दिवसेंदिवस वाढत आहे. याचे कारण म्हणजे केंद्रातील भाजपाचा उलटा कारभार होय. कारण केंद्र सरकारने देशात रस्ते, मंदिर आणि काँग्रेसच्या जुन्या योजना नव्याने केल्या. परंतु केंद्र सरकारकडे सर्वसामान्यांचा विकास करणारी कोणतीही योजना दिसत नाही. त्यामुळे देशातील अनेक नागरिक व सुशिक्षित बेरोजगार यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. देशातील बेरोजगारी व महागाई आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत. परंतु केंद्र सरकार जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर त्यांनी असे जाहीर केले होते की, भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर होऊ शकते. परंतु भारत भारताची अर्थव्यवस्था सद्यस्थितीत तीन ट्रिलियन डॉलरही नाही असे दिसते. मग नेमका विकास कोणाचा झाला हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण दिलेल्या आश्वासनांचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभेत बोलताना नेहमी म्हणतात की, मोदी सरकारने जनतेचा विकास केला. तसेच अनेक जाहिरातीमध्ये असे दिसते की, मोदी सरकारने हे केले, मोदी सरकारने ते केले. त्यामुळे केंद्र सरकारला मोदी सरकार हे नाव हेतू पुरस्सर देण्यात आले आहे. यावरून भाजपाचा एककल्ली व हुकूमशाहीचा स्वभाव दिसून येतो. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. परंतु जनतेला ते विकासाचा मार्ग केव्हा दाखवणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे असे वाटते.

रिपोर्टर

  • BIPIN ADHANGLE
    BIPIN ADHANGLE

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    BIPIN ADHANGLE

संबंधित पोस्ट