किवींवर, भारताची बाजी
भारत वि न्यूझीलंड मालिकेमध्ये, भारताने उडवला धुव्वा
मुंबई वानखेडे वर पार पडलेल्या कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यांमध्ये भराटाने न्यूझीलंडवर विजय मिळवला आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने न्यूझीलंडला दुसऱ्या डावात १६७ धावांत गुंडाळले आणि कसोटीतील सर्वात मोठा विजय नावावर केला. राहुल द्रविड यांच्या मार्गदशना खाली विराट कोहलीचा हा पहिला विजय आहे. न्यूझीलंडला पहिल्या डावात ६२ धावांमध्ये धुंडाळल्या नंतर भारताने ७ बाद २७६ धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला. त्यानंतर भारताने न्यूझीलंडसमोर ५४० धावांचे लक्ष्य दिले, पण किवींना मात्र हे आव्हान पेलले नाही आणि १४० धावांमध्ये न्यूझीलंडचा निम्मा संघ परत त्यांच्या तंबू मध्ये पाठवला. पहिल्या डावात शतक ठोकलेल्या मयंकने दुसऱ्या डावातही चांगली फलंदाजी करत अर्धशतक ठोकले, तर चेतेश्वर पुजारा त्याच्या अर्धशतकाच्या जवळ पोहोचला.
राहुल द्रविड यांच्या नेतृत्व खाली पार पडलेल्या या कसोटी सामन्याला अधिक महत्व आले आणि याचमुळे कि काय भारताने हि मालिका अगदी सहजपणे जिंकली. न्यूझीलंडचा गोलंदाज एजाज पटेलने भरातचे १० विकेट घेतल्यांनंतर, भारताने प्रतिउत्तर म्हणून न्यूझीलंडला तोडीस तोड उत्तर दिले. या विजयासह भारताने ही मालिका १-० अशी जिंकली सोबतच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत १२ गुणांची कई केली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant