NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

NEET UG 2025 चा निकाल जाहीर

NEET UG 2025 चा निकाल जाहीर

नवी दिल्ली, दि. १४ : राष्ट्रीय चाचणी संस्थाने (NTA) आज नीट-यूजी २०२५ (NEET UG 2025) परीक्षेचा निकाल जाहीर केला. या परीक्षेत राजस्थानच्या हनुमानगड येथील महेश कुमार याने देशात पहिला क्रमांक पटकावला. त्याला ७२० पैकी ६८६ गुण मिळाले आहेत. मध्य प्रदेशच्या इंदूर येथील उत्कर्ष अवधिया याने दुसरा, तर महाराष्ट्राच्या कृषांग जोशी याने तिसरा क्रमांक मिळवला आहे. यंदा पहिल्या १० यशस्वी उमेदवारांमध्ये केवळ एकच मुलगी आहे. दिल्लीच्या अविका अग्रवाल हिने मुलींच्या गटात अव्वल क्रमांक मिळवला आहे.

नीट-यूजी २०२५ परीक्षा ४ मे रोजी देशभरात घेण्यात आली होती. यामध्ये तब्बल २०.०८ लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यापैकी ११.२३ लाख विद्यार्थ्यांनी पात्रता मिळवली आहे. यावर्षीचा पेपर तुलनेने अधिक कठीण असल्याने सर्व श्रेणींसाठी पात्रता कट-ऑफमध्ये घट झाली आहे.

इंदूरच्या काही केंद्रांवर परीक्षा दरम्यान वीजपुरवठा खंडित होऊन वादळामुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे ७५ विद्यार्थ्यांनी आपल्याला पेपर नीट न सोडवता आल्याची तक्रार करत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. ९ जून रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने या ७५ विद्यार्थ्यांचा निकाल तात्पुरता राखीव ठेवत, उर्वरित सर्वांचे निकाल जाहीर करण्यास परवानगी दिली. या विद्यार्थ्यांचा निकाल नंतर जाहीर केला जाणार असून त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादीची घोषणा करण्यात येईल.

इंदूर केंद्रांवर नीट यूजी परीक्षेला बसलेल्या ७५ उमेदवारांनी ४ मे रोजी वादळ आणि वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे त्यांचा पेपर खराब झाल्याची तक्रार केली होती. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकांवर ९ जून रोजी सुनावणी झाली. न्यायालयाने म्हटले आहे की एनटीए या ७५ उमेदवारांव्यतिरिक्त सर्वांचे निकाल जाहीर करू शकते.

या ७५ विद्यार्थ्यांचा निकाल नंतर जाहीर केला जाईल. त्यानंतर नीट यूजी २०२५ ची अंतिम गुणवत्ता निश्चित केली जाईल.


रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट