NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

राज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली खेड तालुक्यात भव्य पक्षप्रवेश

राज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली खेड तालुक्यात भव्य पक्षप्रवेश

रत्नागिरी :– खेड तालुक्यातील विविध गावांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ३ मे २०२५ रोजी भरणे नाका, खेड येथे आयोजित कार्यक्रमात शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेश रामदास कदम आणि शिवसेना उपनेते संजयराव कदम प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमात शिवसेनेची संघटनात्मक भूमिका, कार्यपद्धती आणि स्थानिक विकासाची दिशा यावर सविस्तर चर्चा झाली.

या प्रसंगी राज्यमंत्री योगेश कदम यांनी जनतेशी थेट संवाद साधताना सांगितले “गावागावांत ठोस विकासकामे व्हायलाच हवीत. रामदास भाई आमदार असताना संपूर्ण तालुका शिवसेनेच्या नेतृत्वाखाली होता—ग्रामपंचायती, नगरसेवक, जिल्हा परिषद सर्वत्र आपलेच लोक होते. तोच आत्मविश्वास, तोच जोश पुन्हा निर्माण करायचा आहे. मी मंत्री झालोय, पण त्या आधी तुमच्यामुळे आमदार झालो. आजही तुमच्या विश्वासावरच उभा आहे. माझ्या मतदारसंघातील कोणत्याही गावाला मी कधीच वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्ही मला साथ दिली, तर ही साथ मी कधीच सोडणार नाही.”

खेड तालुक्यातील चाटव, आंबवली, वाडी बीड, नांदवली, किंजळे, हुंबरी वरची व खालची वाडी, मालेद या गावांतील विविध उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये विश्वासराव कदम (विभागप्रमुख), संजय यादव गुरुजी (विभाग संघटक), राजू शेठ पाटणे (विभाग संपर्कप्रमुख), सखाराम कदम – चाटव (शाखाप्रमुख), चंद्रकांत भाऊ कदम (माजी विभागप्रमुख), काशिनाथ खोत कदम – वाडी बीड (शाखाप्रमुख), श्रीपत चव्हाण व दिनेश चव्हाण – माळदे (उपशाखाप्रमुख), मनोहर खोत कदम – हुंबरी (उपसरपंच), अनंत यादव – आंबवली (शाखाप्रमुख), सुरेशराव मोरे – किंजळे (शाखाप्रमुख), दिलीपराव कदम – हुंबरी (उपशाखाप्रमुख), सौ. सुषमा कदम – हुंबरी (माजी पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्य), सौ. सुजाता कदम (ग्रामपंचायत सदस्य) आणि शामसुंदर रघुनाथ कदम – तिसंगी (शिवाजीनगर शाखाप्रमुख) यांचा समावेश होता.

या पक्षप्रवेशामुळे खेड तालुक्यातील राजकीय वातावरणात नवऊर्जा निर्माण झाली असून, स्थानिक विकासकामांना नवी गती मिळेल, अशी भावना ग्रामपातळीवर व्यक्त होत आहे.


रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट