मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते “उत्कृष्ट संसदपटू” पुरस्कारांचे वितरण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते “उत्कृष्ट संसदपटू” पुरस्कारांचे वितरण

मुंबई - महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्याच्या हस्ते सोमवार, दिनांक २९ जुलै, २०२४ रोजी “वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व” या ग्रंथाचे प्रकाशन मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे करण्यात येणार आहे. दुपारी ३.३० ते ५.०० यावेळेत हा समारंभ आयोजित करण्यात आला असून यावेळी विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहातील निवड केलेल्या सन्माननीय सदस्यांना “उत्कृष्ट संसदपटू” आणि “उत्कृष्ट भाषण” पुरस्काराने राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते सन्मानीत करण्यात येणार आहे, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज विधान भवन, मुंबई येथे आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत दिली.

या समारंभास राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विजय वडेट्टीवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत दादा पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती असेल.

सन १९२१ ते २०२१ हा महाराष्ट्र विधानपरिषदेचा शतक महोत्सवी वाटचालीचा कालखंड असून त्यानिमित्त कार्यवृत्तामधून महत्वाच्या संदर्भांची निवड करत –

१) वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व

२) विधानपरिषदेने संमत केलेली महत्त्वपूर्ण विधेयके, ठराव आणि धोरणे

३) विधानपरिषदेतील विविध विषयांवरील महत्त्वपूर्ण चर्चा

४) शंभर वर्षे, शंभर भाषणे…

अशा प्रकारे चार विविधांगी विषयांवरील संदर्भसमृद्ध ग्रंथसंपदा वाचकांच्या भेटीस आम्ही देत आहोत. ग्रंथ निर्मितीसाठी विधिमंडळ वार्तांकनाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या ज्येष्ठ पत्रकारांची नियुक्ती करण्यात आली असून या मालिकेतील पहिल्या ग्रंथाचे प्रकाशन २९ जुलै रोजीच्या या कार्यक्रमात होत आहे. अन्य तीन ग्रंथांचे काम देखील प्रगतीपथावर आहे. या ग्रंथ संकलन समिती सदस्यपदी ज्येष्ठ पत्रकार विलास मुकादम, योगेश त्रिवेदी, दिनेश गुणे, संजय जोग, उदय तानपाठक, किशोर आपटे आणि शीतल करदेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

२९ जुलै रोजी प्रकाशित होत असणाऱ्या ग्रंथाचे संकलन आणि संपादन किशोर आपटे आणि शीतल करदेकर यांनी केले आहे. वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि विधानमंडळातील ग्रंथालय यांच्या माध्यमातून ग्रंथ निर्मितीचे कार्य सुरू आहे.

माँटेग्यू-चेम्सफर्ड आयोगाच्या शिफारशीनुसार भारत सरकार अधिनियम १९१९ अन्वये “Bombay Legislative Council” ची प्रारंभिक बैठक

१९ फेब्रुवारी, १९२१ रोजी टाऊन हॉल मुंबई येथे संपन्न झाली. त्यावेळी नारायण गणेश चंदावरकर यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी झालेली नियुक्ती ही एक ऐतिहासिक घटना आहे. सन १८६२ ते सन १९२० पर्यंत Governor of Bombay यांच्या अध्यक्षतेखाली Council चे कामकाज चालत होते. सन १९२१ मध्ये नारायण चंदावरकर यांच्या रूपाने पहिल्यांदा भारतीय व्यक्तीची सभापती म्हणून नियुक्ती झाली. त्यानुसार सन १९२१ ते २०२१ हा महाराष्ट्र विधानपरिषद शतकपूर्तीचा कालखंड मानावा लागेल.

तथापी, सन २०१९ मध्ये कोविड-१९ च्या महामारीमुळे त्यावेळी आपण हा “शताब्दी महोत्सव” समारंभ साजरा करू शकलो नाही, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष नार्वेकर आणि डॉ.नीलम गोऱ्हे यांनी यावेळी दिली.

या प्रसंगी राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखा, विधान भवन, मुंबई यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या “उत्कृष्ट संसदपटू” आणि “उत्कृष्ट भाषण” या पुरस्कारांचे वितरणही या कार्यक्रमात केले जाणार आहे. दोन्ही सभागृहांचे सन्माननीय सदस्य आणि विधानपरिषदेचे माजी सदस्य यांना मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे निमंत्रित करण्यात आले आहे.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट