मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

लाच प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह हवालदार गजाआड

      नवी मुंबई : लाच प्रकरणी नवी मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह पोलीस हवालदाराला एसीबीच्या पथकाने गजाआड केलं आहे. पान मसाला विक्रीचा व्यवसाय सुरु ठेवण्याकरिता 32 हजार 500 रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) नवी मुंबई मालमत्ता आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रामदास छापरिया आणि पोलीस हवालदार इकबाल बशीर शेख या दोघांना रंगेहात पकडले.

छापरिया यांच्यासाठी 25 हजार आणि स्वतः साठी 7 हजार 500 रुपयांची मागणी शेख याने केली होती. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी नवी मुंबईत करण्यात आल्याची माहिती ठाणे एसीबीने दिली. अटक केलेल्या दोघांनी तक्रारदारांकडे 40 हजारांची मागणी केली होती. त्यातच, तडजोडी अंती 32 हजार 500 रुपये देण्याचे ठरले. बुधवारी याप्रकरणी तक्रारदारांनी ठाणे एसीबी विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार, गुरुवारी याप्रकरणी पडताळणीही करण्यात आली. तसेच, लाचेची मागणी करत ती स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

लाचेची ही रक्कम एसीबीने हस्तगत केली असून त्या दोघांविरोधात नवी मुंबईतील एनआरआय पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्या दोघांना अटक केल्याची माहिती ठाणे एसीबीच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. 

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट