पोस्टाची प्रीमियम सेवा – २४ तासांत पोहोचणार पार्सल भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह देण्यासाठी कॅनडा सरकारने मागितले 35 लाख मुंबईतील पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग, मुख्य रस्ते व रहदारीचे रस्‍ते समतल करावेत, उप महापौर श्री. संजय घाडी 10 वी भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिकांचा संच चोरीला 10 वी भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिकांचा संच चोरीला 2026 चे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, या मराठी लेखकाचा सन्मान सेवानिवृत्त एस.टी. कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास सिंधू सेवा दलातर्फे शुक्रवारी (ता. २०) ‘चेटीचंड’ महोत्सव सक्तीने धर्मांतर विरोधी विधेयकावर विरोधी पक्षांमध्ये फूट बेकायदेशीर धर्मांतरणाच्या विरोधातील विधेयक सर्व धर्मियांसाठी समान…. Fastag वार्षिक पास १ एप्रिलपासून महागणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेला स्थगिती आणि मनाई आदेश देण्याची मागणी आखाती देशातील युद्धामुळे टरबुज उत्पादक शेतकऱ्यांना फटका… राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर भारतीय चित्रपटांसाठी आता सबटायटल्स आणि ऑडिओ वर्णन अनिवार्य भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना व्हिसा मुदतवाढ LPG गॅसला पर्याय सापडल्याचा पुण्यातील शास्त्रज्ञांचा दावा गॅस पुरवठ्याच्या प्राधान्यक्रमाची नियमावली जारी अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांमुळे पादचारी हैराण पंधरादिवसांत राज्यातील मद्यनिर्मिती बंद करावी लागणार WhatsApp, FB आणि Messenger वर फसवणूक टाळण्यासाठी Meta चे नवे फिचर्स मुंबई मनपाच्या शाळांमध्ये मध्यान्ह भोजनाऐवजी फळे वाटप सक्तीच्या धर्मांतरासाठी ७ वर्षांची कैद, ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानसभेत सादर जागतिक महिला दिन मनाला स्पर्श करणारा उपक्रम ठरला LPG टंचाईमुळे इन्डक्शनच्या मागणीत मोठी वाढ ग्रामीण भागात 45 दिवसांनंतरच बुक होणार LPG सिलेंडर प्रवासी सेवा देणाऱ्या वाहनांना ‘QR कोड’ अनिवार्य देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था महाराष्ट्राचीच…. जप्तीची कारवाई सुरू होताच २ हजार ८८८ मालमत्ताधारकांनी भरला कर महाराष्ट्र केसरी २०२५-२६’ कुस्ती स्पर्धेच्या बोधचिन्हाचे झाले अनावरण मुंबईतल्या घरासाठी गिरणी कामगार एकवटला! मुरबे बंदर प्रकल्पाच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह बहुचर्चित ‘ लाडकी बहीण ‘ योजनेवर येतोय चित्रपट प्रसिद्ध रॅपर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मुंबई येथे आगमन ‘हॉवर्थ इंडिया’तर्फे महिला दिनी कर्तृत्त्ववान महिलांसह प्रमुख शहरांमध्ये ‘गिव्ह टू गेन’ मालिकेचे आयोजन माणिकडोह मधील २० बिबट्यांचे वनतारा केंद्रात स्थलांतर अंबरनाथ शिवमंदिर परिसरात 32 घरांवर बुलडोझर हवामान विभागाकडून उष्णतेचा अलर्ट जारी ६० रुपयांनी वाढले घरगुती Gas सिलिंडरचे दर या शहरांत सुरू होणार BSNL 5G सेवा एकल मातांना पूर्ण पालकत्वाचा अधिकार – न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुंभदूत ॲपचे अनावरण बृहन्‍मुंबई महानगरपालिका स्‍थायी समिती अध्यक्षपदी श्री. प्रभाकर शिंदे यांची बिनविरोध निवड PCM ग्रुप घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मिळेल मेडिकलला प्रवेश शेअर बाजारात भीषण भूकंप! इराण-अमेरिका युद्धाच्या सावटाखाली बाजार ‘रक्तबंबाळ पंतप्रधानांच्या मेन्यूला अस्सल मराठी तडका ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे पोस्टर आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी झाले रिलीज! DGCA कडून विमान प्रवासातील गैरवर्तनाबाबत; ‘झीरो टॉलरन्स पॉलिसी’ लागू अभिनेता प्रसाद ओकच्या कामगिरीचा विश्वविक्रम राज्यसभेच्या ३७ जागांसाठी १६ मार्चला निवडणूक नाशिकमधील द्राक्ष उत्पादक संकटात विमानात एवढं फ्यूएल घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय? जन गण मन आधी ‘वंदे मातरम्’ गाण्याला दल खालसाचा विरोध राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पद भरतीस मान्यता काळाचौकी येथे खोदकामामुळे अपघातात वाढ हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ पुस्तकातून मार्गदर्शन आणि उपाय मस्क यांची AI कंपनी चंद्रावर उभारणार फॅक्टरी भोईवाडा परिसरात वाहतूक विभागाची धडक संयुक्त कारवाई; नगरसेविका श्रद्धा जाधव सोडवणार क्यू आर कोडने नागरी समस्या महाशिवरात्रीसाठी भीमाशंकर मंदिर राहणार बंद भारत लवकरच या देशात UPI लाँन्च करणार RSS च्या कार्यक्रमाला सलमान खानची उपस्थिती लाडक्या बहिणींच्या e-KYC ला मुदतवाढ १२ जिल्हापरिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान देशभर ओला, उबर आणि रॅपिडो चा संप इस्लामाबादमध्ये मशिदीवर आत्मघातकी हल्ला 31 जण मृत्यूमुखी, 169 जखमी भारतातील पहिला AI IPO करी रोड पदपथांवरील हायड्रेलमुळे पादचारी हैराण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना मिळणार Z+ दर्जाची सुरक्षा चेक बाऊन्स प्रकरणी अभिनेता राजपाल यादव विरोधात अटक वॉरंट शक्तिपीठ महामार्गाच्या खर्चात तब्बल १५ हजार कोटींची वाढ अजितदादा पवार यांचे संगमवाडी येथे भव्य स्मारक उभारण्याची मागणी युमनाम खेमचंद सिंह झाले मणिपूरचे 13 वे मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाची शपथ भायखळा येथे दिवंगत कै.शरद (आप्पा) पवार उद्यानाचे झाले लोकार्पण आज निर्मला सीतारमण नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार, मतदार यादीत नाव न सापडल्यास BMC च्या या हेल्पलाईनवर कॉल करा प्रचारतोफा थंडावल्या, उमेदवारांना घरोघरी प्रचारास मुभा राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका 5 फेब्रुवारीला Blinkit, Zepto, Swiggy, Zomato ची 10 मिनिटांची डिलिव्हरी सर्व्हीस बंद नालासोपार्‍यात १० लाखांची रोकड जप्त यामिनी जाधव यांचा मुंबई पालिका निवडणुकीसाठी प्रचाराला वेग राजुलच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे भांडुप मध्ये वेदांता समूहाचे अध्यक्ष दान करणार ७५ टक्के संपत्ती नाना आंबोले यांना शिवडीकरांचा वाढता प्रतिसाद ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा टीझर प्रसिद्ध क्रांतिज्योती विद्यालय ‘ सुपरहीट, पहिल्याच आठवड्यात ३.९१ कोटी कमाई राज्यभरात प्रचारसभांचा धुरळा, फडणवीस ठाणेकरांशी संवाद ... मुंबईत धावणार 18 डब्ब्यांची लोकल राज्यातील २७ लाख वाहनांना अद्यापही HSRP नाही, लवकरच तपासणी होणार बिनविरोध निवडीला मनसेचा हायकोर्टात आव्हान माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचं दीर्घ आजारानं निधन वचन ठाकरेंचं! मुंबईकरांसाठी राज-उद्धव ठाकरेंकडून शिवशक्तीचा वचननामा जाहीर आज होणार फैसला! कर्णधार वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका राजुल संजय पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज संरक्षण क्षेत्रासाठी 79 हजार कोटींच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी ३३ वर्षांनंतर पुन्हा उघडणार जेजे हत्याकांडाची केस प्रशिक्षकपदावरून गौतम गंभीरला बीसीसीआयकडून मिळणार डच्चू? अखेर BCCI ने सोडलं मौन, पुण्यात भाजप, राष्ट्रवादीविरोधात लढणार, मविआचा फॉर्म्युला ठरला; 50-50-50 मनसेलाही सोबत घेणार शिवसेनेची लवकरच पहिली यादी; एकनाथ शिंदेंकडून 60 माजी नगरसेवकांना संधी, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी विशेष टोलमाफी पास पर्यूषण पर्वात दोन दिवस कत्तलखाने राहणार बंद २९ टक्के कोसळला या गेमिंग कंपनीचा शेअर Asia Cup मध्ये भारत-पाक आमने सामने- सरकारने दिली परवानगी 12 आणि 28 टक्क्यांचा GST स्लॅब होणार रद्द, सर्वसामान्यांना फायदा अमेरिकेत छत्रपती शिवरायांच्या कीर्तीरथाची भव्यदिव्य मिरवणूक कानात ईअर फोन असल्याने युवकाचा मृत्यू पोस्ट झाले अत्याधुनिक – अ‍ॅडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म सुरु BSNL ची मान्सून ऑफर – 1 महिना मोफत इंटरनेट गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक सलोख्यासाठी हजरत महंमद पैगंबर जयंती ८ सप्टेंबर रोजी होणार .. आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रवासाला तब्बल बारा तास, मग टोल का द्यावा, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल उपमुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर केले ‘लाडकी सून’ अभियान मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी… कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ… उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच झाले सुरू मतदार यादीबाबतचे आरोप शपथपत्रासह करा अन्यथा माफी मागा… शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल १८ ऑगस्टला जालन्यात मुसळधार पावसाने नदी नाले तुडुंब… मुंबईत पागडीधारकांना आदित्य ठाकरेंकडून पुनर्वसनाची हमी कॅडबरी डेअरी मिल्कच्या रॅपरवर खास मराठीत शब्द पहिल्याच दिवशी FASTag वार्षिक पासला भरभरुन प्रतिसाद, १.४ लाखांहून अधिक नोंदणी राज्यात १६ ते २१ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राचे उद्घाटन लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत सर्व घटकांना सोबत घेऊन विकास करणार ! नारळी पौर्णिमेला वरळीत हुल्लडबाजी करणाऱ्या उबाठा गटावर कारवाई करा BSF मध्ये 1121 जागांसाठी भरती; 10वी-12वी व ITI करु शकतात अर्ज 15 ऑगस्टपासून सुरू होणार FASTag Pass गणेशोत्सव काळात मुंबईत ‘डीजे’ला बंदी दादरमध्ये इमारतीच्या छतावर कबुतरखाना सुरू आधार कार्ड, व्होटर कार्ड,रेशन कार्ड हे नागरिकत्त्वाचे पुरावे नाहीत 15 ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवलीत मांसाहार बंदी इथेनॉल पुरवठ्यात उ.प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसर्‍या स्थानी हेपेटायटीस D पासून कर्करोगाचा धोका असल्याचा WHO चा निर्वाळा दहिहंडी सराव करताना 11 वर्षीय बालकाने गमावला जीव अमेरिकेच्या टॅरिफमुळे दोन अब्ज डॉलरची कोळंबी निर्यात धोक्यात सिंचन तलाव धोक्यात; भिंत खचली, २०० एकर शेतीला धोका…. हुतात्मा स्मारकाच ऐतिहासिक महत्त्व टिकले पाहिजे - आमदार सचिन अहिर रेल्वेकडून इतर प्रवाशांसह मुंबईकरांसाठी सुरक्षेच्या नव्या उपाययोजना राजकीय पक्षाचा चेहरा राहिलेली व्यक्ति न्यायालयाचा चेहरा असणे योग्य आहे का ? सरकारने लोकसभेत सादर केलेले आयकर विधेयक घेतले मागे अमेरिकेच्या टॅरिफचा भारतीय वस्त्रोद्योगाला मोठा फटका ठाणे जिल्ह्यातील या शहरात लवकरच सुरु होणार ‘पॉड टॅक्सी’ सेवा माथेरानची हातरिक्षा बंद करा – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कबुतरांना अन्न-पाणी देण्यावर उच्च न्यायालयाची बंदी कायम एक पडदा सिनेमागृहाबाबत संयुक्त समिती कोल्हापूरकर जिंकले, महादेवी हत्तीण पुन्हा येणार नांदणी मठात उत्तराखंडला गेलेले महाराष्ट्रातील सर्व पर्यटक सुखरूप ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती उत्तरकाशीमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार, ४ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता भाजपाचे पदाधिकारी बनले न्यायाधीश, न्यायपालिकेचा निष्पक्षपणा धोक्यात? सेंचुरी मिलचा भूखंड कोणाच्या घशात घालणार? कामगार नेते गोविंदराव मोहिते‌ भायखळ्यात आमदार चषक 2025 ही भव्य हॉलीबॉल स्पर्धा संपन्न शिवसेना प्रभाग 205 च्या वतीने लाडू वाटप नृत्येश्वर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तैवानमध्ये भारतीय लोकनृत्यांची केली बहारदार सादरीकरण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानकाच्या नामकरणाविरोधात शिवसेनेचे आंदोलन एसटी आता करणार रिटेल (किरकोळ ) इंधन विक्री कबुतरांना खाद्य देणार्‍याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजपामध्ये प्रवेश ‘$1 ट्रिलियन’ अर्थव्यवस्थेकडे महाराष्ट्राची वेगवान वाटचाल! निवडणूक पारदर्शक होण्यासाठी मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडा राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम हाती… स्वामीनाथन यांचा जन्मदिन “शाश्वत शेती दिन” म्हणून साजरा राज्य सरकारने जाहीर केले नवे सोशल मीडिया नियम राज ठाकरे आल्यानं कित्येक पटीनं आनंद- उद्धव ठाकरे खडसेंचा जावई पुण्यात रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडला गेला लाडकी बहीण योजनेसाठी 26.34 लाख महिला अपात्र जन्मतःच या बालकाच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 10 उत्तीर्ण उमेदवारांसाठी IB मध्ये नोकरीची मोठी संधी शाळा, कॉलेज आणि कोचिंग संस्थांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून 15 निर्देश जारी मुंबई रेल्वे साखळी स्फोट प्रकरण : हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी ससून डॉकमधील मच्छीमारांच्या पुनर्वसनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे.. ; राज ठाकरे निशिकांत दुबेवर कडाडले सीमाभागातील निपाणी शहरात कन्नड भाषेची सक्ती महायुती सरकारला सत्तेचा माज -माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई महाराष्ट्राचीच , मुंबईत मराठी माणसाचाच आवाज बुलंद …. ‘जय गुजरात’ म्हणणारे एकनाथ शिंदे गुजरात व अमित शाहांचे गुलाम म्हाडा लॉटरीचा धडाका; ठाण्यात 2000 घरांसाठी सोडत, वाचा कधी येणार जाहिरात पावसाळ्यात केस का गळतात? अशी घरगुती उपाय करून थांबवा केस गळती NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

लबाडा घरचे आवतान...

राज्यात सध्या कोरोना विषाणू नागरिकांवर कहर ढाळत असून सुमारे पन्नास हजार नागरिक विषाणूने संक्रमित झाले आहेत. महाराष्ट्र सरकार आहे त्या सर्व साधनांनिशी व मनुष्य बळानिशी कोरोनाशी दोन हात करत असून मोठ्या प्रमाणावर राज्याला नागरिकानं कोरोनाच्या प्रादुर्भावातून बाहेर काढण्यास यश येत आहे. सध्या राज्यात साडे चार लाख ऍक्टिव्ह रुग्ण जरी असले तरी दररोज बरे होणार्‍या रुग्णांची संख्याही तेवढीच मोठी आहे. सध्या कोरोनाच्या उपायांचा प्रोटोकॉल निश्‍चित झाल्याने सर्व रुग्णांना गृहविलगीकरणाच्या माध्यमातून बरे केले जात आहे. त्यामुळे सध्या रुग्णांचे प्रमाण वाढत असले तरी परिस्थितीने अजून गंभीर रूप धारण केलेले नाही. त्यातच महाराष्ट्राने लसीकरणाचा वेगही वाढवल्याने येत्या काही महिन्यात आपण कोरोनाला निश्‍चितच मात देऊ, परंतु कोरोनाच्या नावाखाली भाजपच्या नेत्यांनी जो उच्छाद राज्यात मांडला आहे. त्याचेही लसीकरण होणे तेवढेच गरजेचे आहे. लबाडांच्या या आवतानाला राज्यातील जनतेने भुलू नये एव्हढेच सांगावेसे वाटते.

कोरोनाने राज्यात पुन्हा डोके वर काढले असून जवळजवळ आज राज्यातील प्रत्येक घरात कोरोनाचा विषाणू दस्तक देत आहे. मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला म्हणून सुस्तावलेलीं आरोग्य व्यवस्था आता पुन्हा कामाला लागली असून युद्ध पातळीवर पुन्हा कोरोनाशी दोन हात करण्यास राज्याचे प्रशासन तयार झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारच्या पाठीमागे सर्व पक्षांनी एकजुटीने उभे राहणे गरजेचे असताना विरोधी पक्ष मात्र मोदींच्या सल्ल्यानुसार अपदामे अवसर शोधण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक ठिकाणी आरोग्य साधन सुविधा कशा कमी आहेत, सरकार कसे नाकाम आहे याबाबत रोज पत्रकार परिषद घेऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार करत आहेत. खरंतर मोदीजींनी अशा आपल्या पक्षातील लबाडांना वेळीच रोखून अशा आणीबाणीच्या प्रसंगी खंबीरपणे सरकारच्या पाठीमागे उभे राहण्यास सांगितले असते तर  त्यांची वेगळीच छबी देशाला दिसली असती, परंतु या कोरोना महामारीच्या काळात ज्या पद्धतीने ते स्वतः आणि अमित शहा वर्तन करत आहेत ते पाहिले कि असे म्हणावेसे वाटते कि जे आडातच नाही ते पोहर्‍यात कसे येणार. आजही महाराष्ट्र कोरोना संक्रमणाच्या उपायांच्या बाबतीत देशात अव्वल असून त्याचे कौतुक राष्ट्रीय स्तरावर होत असताना राज्यातील विरोधी पक्ष मात्र आपल्या नेतृत्वातील खुजेपण दिवसेंदिवस उघडे पडत आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावाची साखळी तोडण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचा घेतलेला निर्णय हा राज्यातील जनतेच्या काळजी पोटी आहे. त्यालाही ज्या पद्धतीने फडणवीस विरोध करून व्यापारी वर्गाला उकसवत आहेत ते पाहिले कि वाटते विरोधकांना कोरोना रुग्णांच्या मृत्यू शय्येवरून आपले राजकीय इस्पित साधायचे आहे. राज्यसरकारने प्रत्येक गरीबाच्या खात्यावर पाच हजार रुपये टाकावे म्हणून बेंबीच्या देठापासून ओरडत फिरत आहेत. गरिबांना मदत करणे शासनकर्त्यांची जबाबदारी आहे, पण केंद्रसरकार याबाबत मुग गिळून गप्प असून, स्वतः आणि आपल्या पक्षातील आमदारांचा निधी पीएम केअर मध्ये दान करून मुख्यमंत्र्यांना मात्र दातृत्वाचे धडे देत फिरत आहेत. अशा लबाड आणि पाखंडी संधीसाधू राजकारणास महाराष्ट्रातील जनतेनेच धडा शिकवणे गरजेचे आहे. मोदींनी वीस लाख कोटींचे पॅकेज दिले आता जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे असे सांगत महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधत आहेत. खरतर मोदींनी पहिल्या टर्म मध्ये गरीब जनतेला वाटलेले पंधरा लाख अजून लोकांच्या खात्यात शिल्लक असताना पुन्हा मोदींकडे पैसे मागणे हा जनतेचा कृतघ्नपणा ठरेल, अशा वेळी जनतेनेच मोदींकडून मिळालेल्या 15 लाखांतून भविष्याची वाटचाल करत आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे आणि त्यांच्या या उपकाराची परतफेड कृतज्ञपणे मतपेटीतून व्यक्त करणे हेच त्यांचे प्राक्तन आहे.  

सध्या राज्यातील सत्ताधार्‍यांना  ‘लेटर बॉम्ब’च्या  नवीन विषाणूने ग्रासले आहे. एका लेटर बॉम्ब चा धमाका हवेत विरतो न विरतो तोच दुसरा लेटर बॉम्ब सत्ताधार्‍यांवर फेकला जात आहे. आता कोणत्या मंत्र्यांचा बळी जाणार हे फडणवीस बॉम्ब फुटण्याआधीच सांगत असल्याने हे बॉम्ब फडणवीस यांच्या कारखान्यात तर तयार होत नाही ना अशी शंका आता येऊ लागली आहे. आतापर्यंत  ‘मी पुन्हा येईन’ च्या तारखा चुकल्याने सध्या लेटर बॉम्बच्या माध्यमातून आरोपांचा धुराळा उडवून द्यायचा हे सध्याचे धोरण भाजपचे दिसत आहे. या लेटर बॉम्बचा आधार घेऊन कोणीतरी न्यायालयात याचिका दाखल करायची आणि न्यायालयाने चौकशीचा आदेश दिल्यावर आंदोलन करत संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा हि पद्धत सध्या राज्यात रूढ झालेली आहे. अशाच प्रकारचे आरोप सध्या राफेल विमान खरेदी बाबत होत असताना त्याविषयी मात्र सर्व जण गप्प आहेत. गेली 70 वर्ष देशात राज्य करणार्‍या काँग्रेसला याबाबत ठोस भूमिका घेता येऊ नये याचे आश्चर्य वाटते. न्यायालयेही अशा राजकीय याचिकांवर आदेश देऊन वेगळा पायंडा तर पाडत नाही ना याबाबतही विचार होणे गरजेचे आहे. 

पुन्हा एकदा लसीकरणावरून राज्य आणि केंद्र सरकार आमने सामने आल्याचे चित्र देशासमोर निर्माण झाले आहे. महाराष्ट्राला लसींचा पुरवठा कमी होत असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितल्यावर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी टोपे यांना खोटे ठरवत राज्याला व्यवस्थीत पुरवठा होत असल्याचे सांगितले. राज्यातील वाढत्या कोरोना संक्रमणावरून लोकांचे लक्ष वळवण्यासाठी हा आरोप केला जात असल्याचा प्रति आरोप हर्षवर्धन यांनी केला. परंतु आकडे मात्र वेगळेच चित्र सांगत आहेत. त्यानंतर जावडेकर यांनी केलेले वक्तव्य तर विचित्रच होते. शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस बरोबर सत्ता स्थापन केल्याचे त्यांनी या प्रसंगी पत्रकार परिषदेत सांगितले. वास्तविक पाहता लसीकरणाच्या मागणी आणि पुरवठ्याचा राज्याच्या राजकारणाशी काहीही संबंध नव्हता. परंतु जावडेकरांनी आपल्या दुःखाला  वाट मोकळी करून दिली. देशाच्या आर्थिक उत्पन्नाच्या 32% आर्थिक उत्पन्न असलेले राज्य हातातून गेल्याचे दुःख फडणवीस आणि केंद्र सरकारचे असून भाजपच्या प्रत्येक नेत्याच्या तोंडून ते व्यक्त होत असल्याने महाराष्ट्रास सापत्न वागणूक मिळत तर नाही ना ? अशी शंका घ्यायला वाव आहे. महाराष्ट्रावर नामधारी बाहुला मुख्यमंत्री बसवून महाराष्ट्राचे अहित करण्याचा डाव उद्धव ठाकरे यांनी उधळला याचे मोठे शल्य महाराष्ट्रद्वेषी मोदी-शहा यांना आहे.   

सकारात्मक राजकारण करून सत्ता मिळवता येते याचे भान फडणवीसांना नाही, कारण कोणतीही मेहनत न करता लागलेली मुख्यमंत्रीपदाची लॉटरी. त्यामुळे सत्ता गेल्यावर त्यांनी सत्तेसाठी वायफळ आरोपांच्या मांडलेल्या बाजारावरून ते रोज महाराष्ट्राचे बदनामीचे धिंडवडे देशभर काढत सुटले आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ट्रेन सुरु करा, मंदिर सुरु करा, शाळा सुरु करा अशी दररोज बोंबाबोंब करून कोरोना वाढीस खतपाणीच घालत होते. आता कोरोनाची दुसरी लाट येत असतानाही येनकेन प्रकारे सरकारला काम करणे अवघड करून ठेवलं आहे, आणि त्याला ते मुसेद्दीगिरी समजत आहेत. जेव्हा कोल्हापूरला पुराच्या पाण्याने विळखा घातला तेव्हा ते विरोधकांना राजकारण न करण्याची विनंती करत होते, पण आज ते स्वतः काय करत आहेत याचे भान त्यांना नाही. राजकारण करायला आयुष्य पडले आहे, पण या कठीण काळात सकारात्मक राजकारण करून आपले वेगळेपण सिद्ध करण्याची त्यांना संधी होती ती त्यांनी गमावली आहे. दररोज पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीका करण्याच्या नादात आपण महाराष्ट्राची नाहक बदनामी करत आहोत याचा विसर त्यांना पडल्याने सर्वसामान्यांमध्ये त्यांच्या विरुद्ध चीड निर्माण झाली आहे. स्वतःच्या नागपूर शहराची काय अवस्था आहे त्याकडे लक्ष देऊन एक चांगले मॉडेल कोरोना विरुद्ध लढण्याचे देशाला देऊ शकले असते. ‘आयजीच्या जीवावर बायजी’ होऊनच जगण्यात धन्यता मानणार्‍यांना त्याची किंमत नसते. राज्यात कोरोना वाढीचा ग्राफ सध्या मोठा असून सरकारला आरोग्यव्यवस्था सांभाळता येत नसल्याची बोंब पुन्हा सुरु केली आहे. कोरोना संक्रमणाबद्दल देशभर महाराष्ट्राची बदनामी करून राष्ट्रपती राजवट लावण्याची संधी ते शोधत तर नाही अशीही शंका त्यामुळे येते. परंतु, महाराष्ट्राचे नशीब बलवत्तर म्हणून अशा संक्रमण काळात सुसंस्कृत नेतृत्व राज्याला लाभले आणि खंबीरपणे कोणताही बडेजाव न करता ते राज्याला पुढे नेत आहेत. त्यामुळे भविष्यात ‘लबाडाच्या घरचे आवतान’ स्वीकारायचे कि नाही ते महाराष्ट्रातील जनतेनेच ठरवणे गरजेचे आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट