पोस्टाची प्रीमियम सेवा – २४ तासांत पोहोचणार पार्सल भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह देण्यासाठी कॅनडा सरकारने मागितले 35 लाख मुंबईतील पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग, मुख्य रस्ते व रहदारीचे रस्‍ते समतल करावेत, उप महापौर श्री. संजय घाडी 10 वी भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिकांचा संच चोरीला 10 वी भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिकांचा संच चोरीला 2026 चे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, या मराठी लेखकाचा सन्मान सेवानिवृत्त एस.टी. कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास सिंधू सेवा दलातर्फे शुक्रवारी (ता. २०) ‘चेटीचंड’ महोत्सव सक्तीने धर्मांतर विरोधी विधेयकावर विरोधी पक्षांमध्ये फूट बेकायदेशीर धर्मांतरणाच्या विरोधातील विधेयक सर्व धर्मियांसाठी समान…. Fastag वार्षिक पास १ एप्रिलपासून महागणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेला स्थगिती आणि मनाई आदेश देण्याची मागणी आखाती देशातील युद्धामुळे टरबुज उत्पादक शेतकऱ्यांना फटका… राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर भारतीय चित्रपटांसाठी आता सबटायटल्स आणि ऑडिओ वर्णन अनिवार्य भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना व्हिसा मुदतवाढ LPG गॅसला पर्याय सापडल्याचा पुण्यातील शास्त्रज्ञांचा दावा गॅस पुरवठ्याच्या प्राधान्यक्रमाची नियमावली जारी अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांमुळे पादचारी हैराण पंधरादिवसांत राज्यातील मद्यनिर्मिती बंद करावी लागणार WhatsApp, FB आणि Messenger वर फसवणूक टाळण्यासाठी Meta चे नवे फिचर्स मुंबई मनपाच्या शाळांमध्ये मध्यान्ह भोजनाऐवजी फळे वाटप सक्तीच्या धर्मांतरासाठी ७ वर्षांची कैद, ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानसभेत सादर जागतिक महिला दिन मनाला स्पर्श करणारा उपक्रम ठरला LPG टंचाईमुळे इन्डक्शनच्या मागणीत मोठी वाढ ग्रामीण भागात 45 दिवसांनंतरच बुक होणार LPG सिलेंडर प्रवासी सेवा देणाऱ्या वाहनांना ‘QR कोड’ अनिवार्य देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था महाराष्ट्राचीच…. जप्तीची कारवाई सुरू होताच २ हजार ८८८ मालमत्ताधारकांनी भरला कर महाराष्ट्र केसरी २०२५-२६’ कुस्ती स्पर्धेच्या बोधचिन्हाचे झाले अनावरण मुंबईतल्या घरासाठी गिरणी कामगार एकवटला! मुरबे बंदर प्रकल्पाच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह बहुचर्चित ‘ लाडकी बहीण ‘ योजनेवर येतोय चित्रपट प्रसिद्ध रॅपर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मुंबई येथे आगमन ‘हॉवर्थ इंडिया’तर्फे महिला दिनी कर्तृत्त्ववान महिलांसह प्रमुख शहरांमध्ये ‘गिव्ह टू गेन’ मालिकेचे आयोजन माणिकडोह मधील २० बिबट्यांचे वनतारा केंद्रात स्थलांतर अंबरनाथ शिवमंदिर परिसरात 32 घरांवर बुलडोझर हवामान विभागाकडून उष्णतेचा अलर्ट जारी ६० रुपयांनी वाढले घरगुती Gas सिलिंडरचे दर या शहरांत सुरू होणार BSNL 5G सेवा एकल मातांना पूर्ण पालकत्वाचा अधिकार – न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुंभदूत ॲपचे अनावरण बृहन्‍मुंबई महानगरपालिका स्‍थायी समिती अध्यक्षपदी श्री. प्रभाकर शिंदे यांची बिनविरोध निवड PCM ग्रुप घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मिळेल मेडिकलला प्रवेश शेअर बाजारात भीषण भूकंप! इराण-अमेरिका युद्धाच्या सावटाखाली बाजार ‘रक्तबंबाळ पंतप्रधानांच्या मेन्यूला अस्सल मराठी तडका ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे पोस्टर आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी झाले रिलीज! DGCA कडून विमान प्रवासातील गैरवर्तनाबाबत; ‘झीरो टॉलरन्स पॉलिसी’ लागू अभिनेता प्रसाद ओकच्या कामगिरीचा विश्वविक्रम राज्यसभेच्या ३७ जागांसाठी १६ मार्चला निवडणूक नाशिकमधील द्राक्ष उत्पादक संकटात विमानात एवढं फ्यूएल घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय? जन गण मन आधी ‘वंदे मातरम्’ गाण्याला दल खालसाचा विरोध राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पद भरतीस मान्यता काळाचौकी येथे खोदकामामुळे अपघातात वाढ हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ पुस्तकातून मार्गदर्शन आणि उपाय मस्क यांची AI कंपनी चंद्रावर उभारणार फॅक्टरी भोईवाडा परिसरात वाहतूक विभागाची धडक संयुक्त कारवाई; नगरसेविका श्रद्धा जाधव सोडवणार क्यू आर कोडने नागरी समस्या महाशिवरात्रीसाठी भीमाशंकर मंदिर राहणार बंद भारत लवकरच या देशात UPI लाँन्च करणार RSS च्या कार्यक्रमाला सलमान खानची उपस्थिती लाडक्या बहिणींच्या e-KYC ला मुदतवाढ १२ जिल्हापरिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान देशभर ओला, उबर आणि रॅपिडो चा संप इस्लामाबादमध्ये मशिदीवर आत्मघातकी हल्ला 31 जण मृत्यूमुखी, 169 जखमी भारतातील पहिला AI IPO करी रोड पदपथांवरील हायड्रेलमुळे पादचारी हैराण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना मिळणार Z+ दर्जाची सुरक्षा चेक बाऊन्स प्रकरणी अभिनेता राजपाल यादव विरोधात अटक वॉरंट शक्तिपीठ महामार्गाच्या खर्चात तब्बल १५ हजार कोटींची वाढ अजितदादा पवार यांचे संगमवाडी येथे भव्य स्मारक उभारण्याची मागणी युमनाम खेमचंद सिंह झाले मणिपूरचे 13 वे मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाची शपथ भायखळा येथे दिवंगत कै.शरद (आप्पा) पवार उद्यानाचे झाले लोकार्पण आज निर्मला सीतारमण नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार, मतदार यादीत नाव न सापडल्यास BMC च्या या हेल्पलाईनवर कॉल करा प्रचारतोफा थंडावल्या, उमेदवारांना घरोघरी प्रचारास मुभा राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका 5 फेब्रुवारीला Blinkit, Zepto, Swiggy, Zomato ची 10 मिनिटांची डिलिव्हरी सर्व्हीस बंद नालासोपार्‍यात १० लाखांची रोकड जप्त यामिनी जाधव यांचा मुंबई पालिका निवडणुकीसाठी प्रचाराला वेग राजुलच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे भांडुप मध्ये वेदांता समूहाचे अध्यक्ष दान करणार ७५ टक्के संपत्ती नाना आंबोले यांना शिवडीकरांचा वाढता प्रतिसाद ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा टीझर प्रसिद्ध क्रांतिज्योती विद्यालय ‘ सुपरहीट, पहिल्याच आठवड्यात ३.९१ कोटी कमाई राज्यभरात प्रचारसभांचा धुरळा, फडणवीस ठाणेकरांशी संवाद ... मुंबईत धावणार 18 डब्ब्यांची लोकल राज्यातील २७ लाख वाहनांना अद्यापही HSRP नाही, लवकरच तपासणी होणार बिनविरोध निवडीला मनसेचा हायकोर्टात आव्हान माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचं दीर्घ आजारानं निधन वचन ठाकरेंचं! मुंबईकरांसाठी राज-उद्धव ठाकरेंकडून शिवशक्तीचा वचननामा जाहीर आज होणार फैसला! कर्णधार वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका राजुल संजय पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज संरक्षण क्षेत्रासाठी 79 हजार कोटींच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी ३३ वर्षांनंतर पुन्हा उघडणार जेजे हत्याकांडाची केस प्रशिक्षकपदावरून गौतम गंभीरला बीसीसीआयकडून मिळणार डच्चू? अखेर BCCI ने सोडलं मौन, पुण्यात भाजप, राष्ट्रवादीविरोधात लढणार, मविआचा फॉर्म्युला ठरला; 50-50-50 मनसेलाही सोबत घेणार शिवसेनेची लवकरच पहिली यादी; एकनाथ शिंदेंकडून 60 माजी नगरसेवकांना संधी, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी विशेष टोलमाफी पास पर्यूषण पर्वात दोन दिवस कत्तलखाने राहणार बंद २९ टक्के कोसळला या गेमिंग कंपनीचा शेअर Asia Cup मध्ये भारत-पाक आमने सामने- सरकारने दिली परवानगी 12 आणि 28 टक्क्यांचा GST स्लॅब होणार रद्द, सर्वसामान्यांना फायदा अमेरिकेत छत्रपती शिवरायांच्या कीर्तीरथाची भव्यदिव्य मिरवणूक कानात ईअर फोन असल्याने युवकाचा मृत्यू पोस्ट झाले अत्याधुनिक – अ‍ॅडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म सुरु BSNL ची मान्सून ऑफर – 1 महिना मोफत इंटरनेट गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक सलोख्यासाठी हजरत महंमद पैगंबर जयंती ८ सप्टेंबर रोजी होणार .. आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रवासाला तब्बल बारा तास, मग टोल का द्यावा, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल उपमुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर केले ‘लाडकी सून’ अभियान मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी… कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ… उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच झाले सुरू मतदार यादीबाबतचे आरोप शपथपत्रासह करा अन्यथा माफी मागा… शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल १८ ऑगस्टला जालन्यात मुसळधार पावसाने नदी नाले तुडुंब… मुंबईत पागडीधारकांना आदित्य ठाकरेंकडून पुनर्वसनाची हमी कॅडबरी डेअरी मिल्कच्या रॅपरवर खास मराठीत शब्द पहिल्याच दिवशी FASTag वार्षिक पासला भरभरुन प्रतिसाद, १.४ लाखांहून अधिक नोंदणी राज्यात १६ ते २१ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राचे उद्घाटन लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत सर्व घटकांना सोबत घेऊन विकास करणार ! नारळी पौर्णिमेला वरळीत हुल्लडबाजी करणाऱ्या उबाठा गटावर कारवाई करा BSF मध्ये 1121 जागांसाठी भरती; 10वी-12वी व ITI करु शकतात अर्ज 15 ऑगस्टपासून सुरू होणार FASTag Pass गणेशोत्सव काळात मुंबईत ‘डीजे’ला बंदी दादरमध्ये इमारतीच्या छतावर कबुतरखाना सुरू आधार कार्ड, व्होटर कार्ड,रेशन कार्ड हे नागरिकत्त्वाचे पुरावे नाहीत 15 ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवलीत मांसाहार बंदी इथेनॉल पुरवठ्यात उ.प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसर्‍या स्थानी हेपेटायटीस D पासून कर्करोगाचा धोका असल्याचा WHO चा निर्वाळा दहिहंडी सराव करताना 11 वर्षीय बालकाने गमावला जीव अमेरिकेच्या टॅरिफमुळे दोन अब्ज डॉलरची कोळंबी निर्यात धोक्यात सिंचन तलाव धोक्यात; भिंत खचली, २०० एकर शेतीला धोका…. हुतात्मा स्मारकाच ऐतिहासिक महत्त्व टिकले पाहिजे - आमदार सचिन अहिर रेल्वेकडून इतर प्रवाशांसह मुंबईकरांसाठी सुरक्षेच्या नव्या उपाययोजना राजकीय पक्षाचा चेहरा राहिलेली व्यक्ति न्यायालयाचा चेहरा असणे योग्य आहे का ? सरकारने लोकसभेत सादर केलेले आयकर विधेयक घेतले मागे अमेरिकेच्या टॅरिफचा भारतीय वस्त्रोद्योगाला मोठा फटका ठाणे जिल्ह्यातील या शहरात लवकरच सुरु होणार ‘पॉड टॅक्सी’ सेवा माथेरानची हातरिक्षा बंद करा – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कबुतरांना अन्न-पाणी देण्यावर उच्च न्यायालयाची बंदी कायम एक पडदा सिनेमागृहाबाबत संयुक्त समिती कोल्हापूरकर जिंकले, महादेवी हत्तीण पुन्हा येणार नांदणी मठात उत्तराखंडला गेलेले महाराष्ट्रातील सर्व पर्यटक सुखरूप ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती उत्तरकाशीमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार, ४ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता भाजपाचे पदाधिकारी बनले न्यायाधीश, न्यायपालिकेचा निष्पक्षपणा धोक्यात? सेंचुरी मिलचा भूखंड कोणाच्या घशात घालणार? कामगार नेते गोविंदराव मोहिते‌ भायखळ्यात आमदार चषक 2025 ही भव्य हॉलीबॉल स्पर्धा संपन्न शिवसेना प्रभाग 205 च्या वतीने लाडू वाटप नृत्येश्वर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तैवानमध्ये भारतीय लोकनृत्यांची केली बहारदार सादरीकरण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानकाच्या नामकरणाविरोधात शिवसेनेचे आंदोलन एसटी आता करणार रिटेल (किरकोळ ) इंधन विक्री कबुतरांना खाद्य देणार्‍याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजपामध्ये प्रवेश ‘$1 ट्रिलियन’ अर्थव्यवस्थेकडे महाराष्ट्राची वेगवान वाटचाल! निवडणूक पारदर्शक होण्यासाठी मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडा राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम हाती… स्वामीनाथन यांचा जन्मदिन “शाश्वत शेती दिन” म्हणून साजरा राज्य सरकारने जाहीर केले नवे सोशल मीडिया नियम राज ठाकरे आल्यानं कित्येक पटीनं आनंद- उद्धव ठाकरे खडसेंचा जावई पुण्यात रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडला गेला लाडकी बहीण योजनेसाठी 26.34 लाख महिला अपात्र जन्मतःच या बालकाच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 10 उत्तीर्ण उमेदवारांसाठी IB मध्ये नोकरीची मोठी संधी शाळा, कॉलेज आणि कोचिंग संस्थांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून 15 निर्देश जारी मुंबई रेल्वे साखळी स्फोट प्रकरण : हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी ससून डॉकमधील मच्छीमारांच्या पुनर्वसनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे.. ; राज ठाकरे निशिकांत दुबेवर कडाडले सीमाभागातील निपाणी शहरात कन्नड भाषेची सक्ती महायुती सरकारला सत्तेचा माज -माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई महाराष्ट्राचीच , मुंबईत मराठी माणसाचाच आवाज बुलंद …. ‘जय गुजरात’ म्हणणारे एकनाथ शिंदे गुजरात व अमित शाहांचे गुलाम म्हाडा लॉटरीचा धडाका; ठाण्यात 2000 घरांसाठी सोडत, वाचा कधी येणार जाहिरात पावसाळ्यात केस का गळतात? अशी घरगुती उपाय करून थांबवा केस गळती NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

नंदिग्रामातील संग्राम...

देशात पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून बंगालच्या निवडणुकीने  संपूर्ण भारताचे लक्ष वेधले आहे. पश्चिम बंगाल आणि रणसंग्राम हे तसे जुनेच समीकरण. ज्या इंग्रजांच्या साम्राज्याचा सुर्योदय बंगाल मधील प्लासीच्या लढाईने झाला, त्याच बंगालने ब्रिटिश साम्राज्याचा सूर्यास्तही हिंदीमहासागरात केला.  बंगालच्या मुशीतून तयार झालेल्या अनेक क्रांतिवीरांच्या बलिदानाने या देशाचा इतिहास व्यापून टाकला आहे. सुभाषचंद्र बोस, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, खुदिराम बोस, चंद्रशेखर आझाद, देशबंधू सारख्या अनेकांनी स्वातंत्र्य संग्रामात प्राणाची आहुती देऊन बंगालचे नाव भारताच्या इतिहासात अजरामर केले. स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर अशाच प्रकारचा घनघोर सत्तासंग्राम पुन्हा पश्चिम बंगाल अनुभवत असून यावेळी हा लढा स्वातंत्र्य संग्रामासाठी नसून बंगालसह संपुर्ण भारतवर्ष पुन्हा विशिष्ट विचारधारेच्या पारतंत्र्यात जाऊ नये यासाठी आहे. देशातील कोणत्याही लढ्याची किंवा परिवर्तनाची सुरुवात प्रथम महाराष्ट्र आणि बंगाल मधून होते, महाराष्ट्राने महाविकास आघाडी स्थापन करुन 2019 सालीच याविरुद्ध शड्डू ठोकला आहे. आता बंगालची जनता कोणता निर्णय घेते यावरच या लढ्याचे भवितव्य अवलंबून आहे. 

सबका साथ आणि सबका विकास म्हणून मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेला भाजप विशिष्ट धोरण  आणि  विचाराने देशाचा कारभार चालवत असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. पहिल्या टर्ममध्ये मोदींनी केलेला कारभार आणि दुसर्‍या टर्मचा कारभार यात जमीन आस्मानाची तफावत जाणवू लागली आहे. पहिल्या वेळी थोडीफार संवेदना सरकारकडे आहे असे वाटत होते, परंतु दुसर्‍या टर्ममध्ये त्याबाबत कोणतीही अपेक्षा भांडवलदारी प्रवृत्तीच्या मोदींकडून आपण ठेवू शकत नाही. ज्या पद्धतीने मोदी सरकारची घोडदौड सुरु आहे आणि ज्या प्रकारे सरकारी यंत्रणांचा वापर विरोधातील आवाज दडपण्यासाठी सुरु आहे ते पाहिले कि जाणवते या देशाची वाटचाल अघोषित एकाधिकारशाहीकडे सुरु आहे. एकाही राज्यात विरोधकांची सत्ता स्थापन होऊ न देण्याचा चंगच मोदी-शहा यांनी बांधला आहे. जर निवडणुकीतून लोकांचा कौल मिळाला नाही तर साम, दाम आणि दंडाचा वापर करून त्या राज्यातील सत्ता मिळवणे एवढेच लक्ष मोदी-शहांकडे आहे. गोवा, मध्यप्रदेश, आसाम सारख्या राज्यात ज्या पद्धतीने भाजपने सत्ता स्थापन केली त्यावरून भारतीयांना याचा अनुभव आला आहे.

देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत बंगालची निवडणूक मोदी-शहांनी प्रतिष्ठेची केली आहे. 2019 मधील लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचे 18 खासदार बंगालमधून निवडून आले आहेत. या 18 खासदारांच्या मतदारसंघात 128 बंगाल विधानसभेच्या जागा येत असल्याने फक्त अजून 24 जागांची गरज तेथे सत्ता स्थापन करण्यासाठी बीजेपीला लागणार आहे. हे गणित मांडून भाजपने बंगाल काबीज करण्यासाठी मोठ्या फौजफाट्यासह विजय नड्डा यांच्या नेतृत्वाखाली बंगालला कूच केले आहे. त्यांच्या मदतीला विजय वर्गी, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस सारखे मात्तब्बर सरदारही मोहिमेवर असून दस्तरखुद्द सरसेनानी अमित शहा अधून मधून रोडशोच्या माध्यमातून आपली उपस्थिती दर्शवित असतात. पंतप्रधान मोदीही आपल्या नवीन वेशभूषेत बंगालच्या जनतेला मतदानासाठी साद घालत असून यावेळी ममता दीदीला नेस्तनाबुत करण्याचा त्यांनी पण केला आहे. गेल्या सहा महिन्यात हिंदुत्वाची मोठी लाट बंगाल मध्ये निर्माण करून तृणमूल काँग्रेस मधील 10 ते 15 आमदारांना गळाला लावल्याने सत्तेचा सोपान मिळवणे सुकर होईल असे बीजेपीचे गणित आहे. मर्यादा पुरुषोत्तम ‘राम’ विरुद्ध रणचंडिका कालिका   ‘दुर्गा’ असे हे काहीसे लढाईचे स्वरूप बंगाल मध्ये बीजेपीने केले आहे. आतापर्यंत सत्तेसाठी भावाभावात वितुष्ट आणणार्‍या भाजपाला  देवादिकांतही वितुष्ट आणण्यात यश आले आहे. 

नंदीग्राम येथील आमदार व ममताचे सहकारी सुवेंधु बॅनर्जी यांना भाजपात आणून बंगालमध्ये  चेहरा देण्याचा प्रयत्न शहा यांनी केला.  ‘जय श्री राम’ या घोषणेचा ममता बॅनर्जी यांना तिटकारा आहे असा धार्मिक प्रचार करून हिंदुमतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यात बर्‍याच प्रमाणात बीजेपीला यश आल्याचे दिसत आहे. ममता बॅनर्जी ह्या मुसलमानांचे तुष्टीकरण करत असल्याचा आरोप करून हिंदू विरुद्ध मुसलमान असा धार्मिक लढा बंगाल मध्ये बीजेपीने उभा केला. बंगाल मध्ये 73% मतदार हे हिंदू असून 23% मतदार मुसलमान असल्याने यावेळी हि निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर न राहता संपूर्णपणे धर्माच्या मुद्द्यावर लढवली जात आहे. माँ, माटी आणि मानूष हि घोषणा देऊन बंगाल मधील 35 वर्षाच्या कम्युनिस्ट राजवटीला उलटवून टाकणार्‍या दीदींना हि निवडणूक म्हणावी तशी सोपी नाही. पण, ममता बॅनर्जी यांनी सुवेंदुच्या नंदीग्राम मधूनच निवडणूक लढवण्याचा धाडसी निर्णय घेऊन बीजेपीला आश्‍चर्याचा धक्का दिला. यावेळी दीदीच थेट भाजपाला भिडल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जागवण्यास त्या यशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे सुरुवातीला बंगालची  सोपी वाटणारी लढाई बीजेपीला मात्र आता काट्याची टक्कर वाटू लागली आहे. बीजेपीच्या गोदी मीडियाने तर बीजेपीची सत्ता बंगाल मध्ये स्थापन करून फक्त शपथविधी तेवढाच बाकी ठेवला आहे.

बंगालच्या निवडणुकीचे दोन टप्पे पूर्ण झाले असून पहिल्या टप्प्यात 84.3 % तर दुसर्‍या टप्प्यात 80% मतदान झाले आहे. अजून दोन टप्प्यांचे मतदान बाकी असून 2 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. पण प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेले हे मतदान धडकी भरवणारे आहे. खरतर जास्त मतदान हे विद्यमान सरकार विरोधातील मतदान मानले जाते. त्यामुळे आतापर्यंत झालेले विक्रमी मतदान कोणाचे नशीब ठरवणार हे जरी इव्हीएम मध्ये बंद झाले असले तरी दोन्ही पक्ष आपलेच सरकार येणार असा दावा करते आहेत. ममता बॅनर्जी जिवाच्या आकांताने हि अस्तित्वाची लढाई लढत आहेत तर बीजेपी पूर्ण ताकदीनीशी वर्चवाची लढाई लढत आहे. निवडणुकीत मुस्लिम समाजाची मते निर्णायक ठरू नये म्हणून बीजेपीने असुद्दीन ओवेसी हा राजकारणातील हैद्राबादी उंट बंगाल मध्ये उतरवला आहे. त्याच्या तिरक्या चालीने किती तृणमूलचे उमेदवार धाराशायी होतात यावर ममतांचे भवितव्य अवलंबून आहे. हीच चाल बीजेपीने बिहार मध्ये खेळून लालूंच्या कंदिलातील तेजस्वीपणा लोपावला होता. विरोधकांची असुरी महत्वाकांक्षा आणि एकमेकांचे पांग फेडण्याची वृत्ती याला सुरेख खतपाणी मोदी-शहा घालत असून आपला सत्तेचा कल्पतरू भारतभर पसरवत आहेत.

नंदिग्रामचा संग्राम हा भारतातील लोकशाहीचे भविष्य ठरविणारा लढा ठरणार आहे. बीजेपीने बंगाल, पंजाब, दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान दक्षिणेतील केरळ आणि तामिळनाडू सोडले तर बहुतेक सर्व राज्यात सत्ता स्थापन केली आहे. देशाला विकासाची दिशा दाखवणार्‍या दिल्ली सरकारचे पंख कायद्याने नुकतेच छाटले आहेत. राजस्थान आणि महाराष्ट्रातील सत्ता उलटवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मोदींना देशात एककेंद्री सत्ता हवी असून कोणत्याही प्रकारचा विरोध त्यांच्या  पचनी पडत नाही. सत्तेचा आणि सरकारी यंत्रणांचा वापर करून विरोधकांचा आवाज दाबला जात असून उद्या हि वेळ सर्वसामान्यांवर येणार हे निश्चित आहे. देशात महागाई, आकाशाला भिडणार्‍या पेट्रोल-डिझेल दरांबाबत आवाज उठवणारा विरोधी पक्षच शिल्लक नसल्याने मनमानी पद्धतीने जनतेची लूट सरकारकडून सुरु आहे. 70 वर्षात उभ्या राहिलेल्या सरकारी कंपन्या उद्या काही उद्योग घराण्यांच्या घशात जाणार आहेत. त्यामुळे नंदीग्रामच्या संग्रामाला अनन्यसाधारण महत्व आहे. नंदीग्रामचा पराभव भाजपच्या बेलगाम महत्वाकांक्षेला लगाम घालणारा ठरणार आहे. त्यामुळे नंदीग्राम राखणे हे ममतांसह विरोधकांनाही आवश्यक आहे, पण विरोधकच विखुरले असल्याने सध्या तरी ममताजींना  एकट्यानेच ‘सोनार बांगला’ साठी हा लढा लढावाच लागेल. नंदिग्रामच्या संग्रामातून अमृत निघाले तर ठीक आणि हालहाल निघाले तर त्याच्या प्राशनासाठी भारतीयांना पुन्हा निळकंठाचा धावा करावा लागेल हे निश्‍चित.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट