मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

...नाहीतर न्हावा-शिवडी सागरी सेतुचे काम रोखणार

प्रकल्पग्रस्त शेतकरी-मच्छीमारांना न्याय द्या - कामगार नेते महेंद्र घरत

उरण ः न्हावा-शिवडी सागरी महार्मागाचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. या प्रकल्पासाठी 12 वर्षापुर्वी जमीन संपादन करण्यात आली. मात्र त्याचा मोबदला अजून सिडकोने दिलेला नाही. उलट प्रकल्पाच्या मार्गातील शेतकर्‍यांची बांधकामे तोडली जात आहेत. त्युमळे प्रकल्पग्रस त शेतकर्‍यांमध्ये असंतोष पसरला आहे. बाधित शेतकर्‍यांना आणि मच्छमार्‍यांना न्याय मिळाला नाही तर न्हावा-शिवडी सागरी सेतुचे काम रोखणार असल्याचा इशारा सिडको व एमएमआरडीएला कामगार नेते महेंद्र घरत यांनी दिला आहे. 

न्हावा-शिवडी सागरी महार्मागासाठी जमिनीचे भुुसंपादन 12 वर्षापुर्वी करण्यात आले. परंतु त्यापोटी जमिनीचा मोबदला अजुनही सिडकोच्या माध्यमातून देण्यात आलेला नाही. उलट जमिनीचा सातबारा शेतकर्‍यांच्या नावावर असुनही सिडकोचे अतिक्रमण पथक सागरी सेतुच्या मार्गतींल बांधकामे तोडीत आहे. हा प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांवर अन्याय आहे. तसेच सागरी महामार्ग बाधीत मच्छिमारांचे 25000 पुनर्वसनाचे अर्ज एमएमआरडीए प्रधिकरणाकडे पडून आहेत. सातत्याने पाठपुरावा, करून सुद्दा मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भांत एमएमआरडीचे अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी व मच्छिमारांमध्ये प्रचंड असंतोष पसरलेला आहे. यावर मीठ चोळल्याप्रमाणे सातत्याने कारवाईचा बडगा सिडकोचे अधिकारी करीत आहेत. आज जासई, चिर्ले विभागातील कारवाईला विरोध करण्यासाठी कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी जमले होते. यावेळी कामगार नेते महेंद्र घरत यांनी सिडको व एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांना न्याय मागण्या पुर्ण होत नाहीत तो पर्यंत न्हावा-शिवडी सागरी महामार्गाचे काम बंद पाडण्यात येईल व 1984 च्या गौरवशाली शौर्यशाली लढयाची पुनरावृत्ती करण्यात येईल असा इशारा दिला. यावेळी शिवसेना शाखाप्रमुख सनीशेठ ठाकूर, डी.पी. घरत, सुरेश पाटील, माजी सरपंच चिर्ले राजू घरत व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

हुतात्म्यांचे रक्त वाया जात नसतं, वाया जाऊ दयायचं नसतं या शेतकरी प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते माजी खासदार दि.बा.पाटील साहेबांनी दिलेली शिकवण आम्ही विसरणार नाही, पाच हुताम्यांच्या हौताम्याने आणि गौरवशाही-शौर्यशाली लढयाने जे आम्ही मिळविले ते जर कोणी हिराऊन घेणार असेल तर त्यांना या हुताम्यांच्या भुमीत आम्ही पाय ठेऊ देणार नाही.  
-महेंद्र घरत, कामगार नेते 

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट