NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

मनातल्या संवेदना शब्दातून कागदावर उमटते ते खरे साहित्य - प्रवीण ना.दवणे

मनातल्या संवेदना शब्दातून कागदावर उमटते ते खरे साहित्य - प्रवीण ना.दवणे  

मुंबई - आजच्या सोशल मिडीयाच्या युगात आर्टीफिशल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ज्या विषयावरची कविता हवी असते ते फिड केले की हवी तशी कविता आय.ई.उत्पादीत करु शकते,त्यासाठी तो कवी असण्याची आता गरज राहिली नाही.मनातल्या भावना, संवेदना, दुःख, आजूबाजूचा आक्रोश, अन्याय,अनाचार, फसवणूक, अत्याचार याबाबत मनातल्या संवेदना जेव्हा शब्दातून कागदावर उमटते ते खरे साहित्य असते असे प्रतिपादन प्रवीण ना.दवणे यांनी केले.  

दि.22 जून रोजी विरार येथील यंग स्टार ट्रस्ट आयोजित साहित्य चावडीच्या 8 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून कोकण मराठी साहित्य परिषद पालघर जिल्हाध्यक्ष प्रवीण ना.दवणे यांनी विचार व्यक्त करुन साहित्य चावडी या उपक्रमांद्वारे विरार वसई भागातील अनेक नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी लोकनेते हितेंद्र ठाकूर,समन्वयक अजीव पाटील,सुरेखा कुरकुरे, साहित्य चावडीचे सदस्य यांचे मोलाचे योगदान असल्याचे दवणे यांनी शेवटी सांगितले.प्रमुख अतिथी म्हणून लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या भागातील नवोदित साहित्यिकांना चालना व प्रेरणामिळावी म्हणून येथील साहित्यिक मंडळींच्या पाठीशी उभे असल्याचे सांगून उपस्थित साहित्यिकांना व आयोजकांना शुभेच्छा दिल्या.व्यासपीठावर उदघाटक गझलकारा ज्योती बालीगा राव, समन्वयक अजीव पाटील, साहित्यिका डॉ.पल्लवी बनसोडे,संगीता कुरकूरे, रेडिओ जॉकी जगदीश संसारे,कवी संमेलनाचे अध्यक्ष वर्जेश सोलंकी आदी मान्यवर उपस्थित होते.  

प्रारंभी विक्रम केसरकर यांनी प्रास्ताविकेतून साहित्य चावडी साहित्य उपक्रमाचा सुरवातीपासूनचा आढावा घेतला.उदघाटनाच्या पहिल्या सत्राचे सुत्रसचालन प्रा.कविता पाटील यांनी केले.  

दुस्रया सत्रात माधवी पवार हिने अफजलखानाच्या वघाचा पोवाडा, व्यसनमुक्ती आधारित नाटीका, संस्कार आणि जीवनमूल्यावर आधारीत नाटीकाचे विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे सादरीकरण केले.त्यानंतर कवी वर्जेश सोलंकी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवी संमेलनात 55 कवी, कवयित्रीनी आपल्या काव्यरचना सादर केल्या.सुत्रसंचालन कवयित्री शिल्पा परुळेकर पै, शुभम पाटील यांनी केले तर शेवटी आभार सुलेखा कुरकुरे यांनी मानले.डोंबिवली, मुंबई, वसई,विरार परीसरातील साहित्यिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.  


रिपोर्टर

संबंधित पोस्ट