NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

CBSE बोर्डाचा मोठा निर्णय; दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा होणार

CBSE बोर्डाचा मोठा निर्णय; दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा होणार

CBSE Class 10th Exams : 2026 पासून दहावीच्या बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याच्या नियमांना आज सीबीएसईने (CBSE) मान्यता दिली असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज (Sanyam Bhardwaj) यांनी दिली आहे. सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार, दहावीच्या विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील बोर्ड परीक्षेला बसणे अनिवार्य असेल, तर दुसरा टप्पा पर्यायी असणार आहे.

पहिल्या टप्प्यात होणाऱ्या परीक्षेचा निकाल एप्रिलमध्ये आणि दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या परीक्षेचा निकाल जूनमध्ये लागेल, अशी माहिती सीबीएसईकडून देण्यात आली आहे. तसेच अंतर्गत मूल्यमापन केवळ एकदाच घेतले जाणार असल्याचेही सीबीएसईने स्पष्ट केले आहे.

सीबीएसईकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दहावीच्या परीक्षेचा पहिला टप्पा फेब्रुवारी महिन्यात आणि दुसरा टप्पा मे महिन्यात आयोजित केला जाणार आहे. सीबीएसईने घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांमध्ये सुधारणा करण्याची एक उत्तम संधी मिळणार आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याचे पहिल्या टप्प्यात गुण कमी आले, तर तो दुसऱ्या टप्प्यात परीक्षा देऊन चांगली कामगिरी करू शकतो.

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात (NEP) शिफारस करण्यात आलेल्या वर्षातून दोन वेळा दहावीच्या परीक्षा घेण्याच्या नियमांना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आज अधिकृत मान्यता दिली आहे. त्यामुळे या निर्णयाचा थेट फायदा आता विद्यार्थ्यांना मिळणार आहे.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट