NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

पाकिस्तानी विमानांसाठी भारतीय हवाई क्षेत्र बंद

पाकिस्तानी विमानांसाठी भारतीय हवाई क्षेत्र बंद

भारताने ३० एप्रिलपासून २३ मेपर्यंत पाकिस्तानी विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. या हल्ल्यात २६ लोकांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये अनेक पर्यटकांचा समावेश होता. भारताने या निर्णयाद्वारे पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यास मनाई केली आहे. याआधी पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते.

या निर्णयामुळे पाकिस्तानच्या विमान वाहतूक उद्योगावर तुलनेने कमी परिणाम होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानसाठी एअरस्पेस बंद केल्याने त्यांचं मोठं आर्थिक नुकसान होईल. पाकिस्तानची विमान आधी भारतीय एअरस्पेसचा वापर करुन चीन, म्यानमार, थायलँड, मलेशिया आणि श्रीलंकेला जायची. पण आता एअरस्पेस बंद केल्याने त्यांना दूरवरच अंतर कापून या देशात जावं लागणार आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (PIA) भारतीय हवाई क्षेत्राचा वापर करून कुआलालंपूरपर्यंत उड्डाण करते. पाकिस्तानने भारताच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना भारताचे आरोप फेटाळले आहेत आणि निष्पक्ष तपासाची मागणी केली आहे.

तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने सिंधू नदी पाणी करार निलंबित करणे, अटारी सीमा बंद करणे, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करणे, आणि राजनयिक संबंध कमी करणे यासारखे अनेक कठोर निर्णय घेतले आहेत


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट