NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

मुंबई विद्यापीठात स्थापन होणार आदिवासी समुदायावर संशोधन केंद्र

मुंबई विद्यापीठात स्थापन होणार आदिवासी समुदायावर संशोधन केंद्र

मुंबई - मुंबई विद्यापीठात लवकरच ‘सेंटर फॉर एक्सलेन्स इन ट्रायबल स्टडीज अँड डेव्हलपमेंट’ची स्थापना केली जाणार आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर येथे हे केंद्र कार्यान्वित करण्यात येणार असल्याची घोषणा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी केली.

या केंद्राच्या माध्यमातून कौशल्याधारित अभ्यासक्रम, संशोधन, विविध कार्यशाळा आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्यावर भर दिला जाणार आहे. राज्यातील इतर अकृषी विद्यापीठांमध्ये अशी केंद्रे कार्यान्वित केली जात असून पालघर, किनवट, मेळघाट, गडचिरोली या क्षेत्रातील आदिवासी समुदायावर संशोधन करून या प्रवर्गाच्या विकासाच्या योजना आणि धोरण निश्चितीसाठी उपयोगी ठरणार आहे. ट्रायबल रिसर्च अँड नॉलेज सेंटरशी करार करून व्यापक स्वरूपात संशोधन प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.

राज्यातील प्रमुख आदिवासी समुदायांमध्ये गोंड, भील, महादेव कोळी, वारली, कोकणा, ठाकर, हल्बा, आंध, कटकरी, कोलाम आणि कोरकू यांचा समावेश होतो. ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, नांदेड, अमरावती, गडचिरोली आणि चंद्रपूर हे जिल्हे आदिवासी लोकसंख्येची प्रमुख ठिकाणे आहेत. आदिवासी समुदायाला विस्थापन, शिक्षण आणि आरोग्य सेवांच्या कमतरतेसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. मुंबई विद्यापीठातील या संशोधन केंद्रामुळे आदिवासींचे प्रश्न अधिक सखोलपणे जाणून घेण्यास मदत होऊ शकते.


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट