NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

गुढीपाडव्यानिमित्त मुंबईमध्ये शोभायात्रांचा जल्लोष

गुढीपाडव्यानिमित्त विविध शहरांमध्ये शोभायात्रांचा जल्लोष

गुढीपाडव्याच्या पवित्र निमित्ताने आज राज्यभरात विविध शहरांमध्ये शोभायात्रा काढण्यात आल्या. हिंदू नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष शोभायात्रांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला. डोंबिवली, गिरगाव आणि ठाणे यासारख्या ठिकाणी एकच जल्लोष पाहायला मिळाला.

गिरगावमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी शोभायात्रेत उत्साहाने सहभाग घेतला. महिलांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही बाईकस्वार म्हणून गिरगावमध्ये फेरफटका मारला. विशेष म्हणजे, गिरगावच्या शोभायात्रेत महिलांची बुलेटस्वारीने सगळ्यांचे लक्ष वेधले.

गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक आहे. हा दिवस नवीन कार्यांची सुरुवात करण्यासाठी शुभ मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, प्रभू श्रीराम 14 वर्षांचा वनवास संपवून पत्नी सीतासह अयोध्येला परतले होते, आणि तो दिवस चैत्र शुक्ल प्रतिपदा होता, म्हणूनच या दिवशी गुढीपाडवा साजरा करण्याची परंपरा आहे.

गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि उत्साहाचा प्रतीक. या दिवशी घरासमोर गुढी उभारून तिची पूजा करून नैवेद्य अर्पण केला जातो. तसेच, वसंत ऋतूची सुरुवातही याच दिवशी होते. महाराष्ट्रासह अन्य काही प्रदेशांमध्येही गुढीपाडवा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, आणि या दिनी सर्वांनी नवीन वर्षाचे स्वागत केले.


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट