NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

सरकार करणार ब्रिटिशकालीन ‘शकुंतला’ रेल्वेचे अधिग्रहण

सरकार करणार ब्रिटिशकालीन ‘शकुंतला’ रेल्वेचे अधिग्रहण

नागपूर - दिडशे वर्ष आपल्या देशावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी निर्माण केलेल्या वारसा स्थळे आणि वस्तू देशभर विखुरल्या आहेत. त्यातीलच एक ब्रिटीशकालिन वारसा वस्तू म्हणजे विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील शकुंतला रेल्वे. देशातील ब्रिटीश काळातील रेल्वे नेटवर्कची शेवटची खूण इतिहासजमा होणार आहे. भारतीय रेल्वे ब्रिटिश कंपनी क्लिक-निक्सनने बांधलेली शकुंतला रेल्वे विकत घेणार आहे. हा विभाग आता सेंट्रल प्रोव्हिन्सेस रेल्वे कंपनी (सीपीआरसी) च्या मालकीचा आहे. महाराष्ट्रातील यवतमाळ आणि अचलपूर दरम्यान १९१६ मध्ये बांधलेला ट्रॅक १८८ किमी लांबीचा आहे. त्या वेळी कापूस पट्ट्यासाठी या मार्गावरून मालगाड्या आणि प्रवासी गाड्या धावत असत. यापैकी एक शकुंतला एक्सप्रेस देखील होती. म्हणून तिला शकुंतला रेल्वे असे नाव पडले. १९५२ मध्ये रेल्वेचे राष्ट्रीयीकरण झाले, परंतु हा ट्रॅक वेगळा राहिला.

२०१६ मध्ये, १५,००० कोटी रुपये खर्चून हा नॅरोगेज ट्रॅक ताब्यात घेऊन ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्याची योजना आखण्यात आली. त्यामुळे जुलै २०१७ मध्ये यवतमाळ-मूर्तिजापूर विभाग आणि एप्रिल २०१९ मध्ये मूर्तिजापूर-अचलपूर विभागावरील सेवा रद्द करण्यात आली. तेव्हापासून हा ट्रॅक बंद आहे. अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तो ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित केला जाईल.

देशाच्या स्वातंत्र्यानंतरही या ट्रॅकची मालकी अजूनही ब्रिटनच्या एका खाजगी कंपनीकडे आहे. कंपनी स्वतः हा ट्रॅक चालवते. १९४७ मध्ये जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय रेल्वेने या कंपनीसोबत एक करार केला, ज्याअंतर्गत आजही भारतीय रेल्वे दरवर्षी कंपनीला रॉयल्टी देते.


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट