NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गाला केंद्र सरकारची मंजुरी

ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गाला केंद्र सरकारची मंजुरी

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील JNPT बंदरापासून चौकपर्यंत सहा पदरी ग्रीनफिल्ड द्रुतगती राष्ट्रीय महामार्ग बांधण्यास मान्यता दिली आहे. महाराष्ट्रातून जाणारा हा सहा पदरी महामार्ग 29 किमी लांबीचा आहे. हा प्रकल्प BoT या पद्धतीने राबवला जाईल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे 45 शे कोटी रुपये खर्च होणार आहे.

सध्या पळस्पे फाटा, डी-पॉईंट, कळंबोली जंक्शन आणि पनवेल यांसारख्या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होते. यामुळे बंदरातून निघणाऱ्या वाहनांना राष्ट्रीय महामार्ग-48 आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पोहोचण्यास 2 ते 3 तास लागतात. लवकरच नवी मुंबई विमानतळ होणार आहे त्यावेळी वाढत्या गर्दीसाठी हा महामार्ग उपयोगी ठरेल.

या प्रकल्पाद्वारे JNPT बंदर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय मार्गाशी जोडले जाईल. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये 2 बोगदे खणले जातील, ज्यामुळे मोठ्या कंटेनर ट्रकांना घाटातून जाण्याची गरज भासणार नाही. परिणामी, वाहतूक वेगवान आणि सुलभ होईल. हा सहा पदरी मार्ग बंदराची दळणवळण क्षमता वाढवेल, मालवाहतूक सुरक्षित करेल आणि मुंबई, पुणे तसेच आसपासच्या भागात आर्थिक विकास होण्यास मदत होईल.

पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत बंदरांना रस्त्यांनी जोडणे हे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. जेएनपीए बंदरातून होणारी कंटेनर वाहतूक सातत्याने वाढत आहे. शिवाय, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आगामी विकासामुळे या परिसरात रस्ते जोडणी अधिक मजबूत करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट