NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी सहा अर्ज दाखल

विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी सहा अर्ज दाखल

मुंबई – विधानपरिषदेच्या पाच जागांच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आज शेवटच्या दिवशी सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.भाजपाकडून संजय किणीकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी यांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत.तर शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने संजय खोडके यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.सहावा उमेदवार म्हणून उमेश म्हेत्रे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.

विधानपरिषदेतले ५ सदस्य विधानसभेवर निवडून गेल्यानं ही निवडणूक होत आहे. उद्या अर्जांची छाननी होणार असून येत्या २० तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. विधानसभेत विरोधकांकडे पुरेसं संख्याबळ नसल्यानं या निवडणुकीत विरोधकांकडून उमेदवार उतरवला जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे मात्र मतदान झाल्यास येत्या २७ तारखेला मतदानाची प्रक्रिया पार पडेल. येत्या २९ तारखेपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करायची आहे. विधान परिषद सदस्य असणारे आमश्या पाडवी, प्रवीण दटके, राजेश विटेकर , रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या पाच जागा रिक्त झाल्या आहेत.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट