NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

बाजार समिती बाहेर गुळाचा व्यापार, त्यामुळे सौदे पडले बंद….

बाजार समिती बाहेर गुळाचा व्यापार, त्यामुळे सौदे पडले बंद….

सांगली - :व्यापाऱ्यांनी गुळाचा व्यापार बाहेर परस्पर सुरू केल्यामुळे बाजार समितीत गुळाचे सोदे बंद पडले आहेत. त्यामुळे हमाल तोलाईदार तसेच व्यापारी यांचे नुकसान होत आहे. तसेच मार्केट कमिटीच्या उत्पन्नावर मर्यादा आल्या आहेत. म्हणून या प्रश्नाचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीने एक समिती नियुक्त केली आहे.

ही समिती आठ दिवसात आपला अहवाल देणार आहे अशी माहिती समितीचे अध्यक्ष सुजय नाना शिंदे यांनी दिली.

कर्नाटक सीमाभाग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील गुळ विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर येतो. कोल्हापूरच्या बरोबरीने सांगलीत गुळाची आवक होत आहे. या गुळाची विक्री सौदे पद्धतीन केली जाते पण काही व्यापाऱ्यांनी गुळाचा सौदा हा बाजारसमिती आवाराबाहेर परस्पर सुरू केला. त्यामुळे गुळाचे दैनंदिन सौदे काही दिवसापासून बंद पडले आहेत त्यामुळे हमाल तसेच तोलाईदार यांना मिळणारे काम थांबले आहे शिवाय गुळ विक्रीपासून येणारे उत्पन्न थांबले आहे. व्यापारी वर्गाच ही त्यामुळे नुकसान होत आहे. म्हणून अभ्यास समिती नेमून अहवाल मागवण्यात आला आहे. गुळाचे सौदे पूर्ववत सुरू करावेत अन्यथा या प्रश्नावर आंदोलन करावे लागेल असा इशारा हमाल पंचायतीने दिला आहे.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट