NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

मुंबई काँग्रेसच्या उत्तर भारतीय सेलच्या अध्यक्षपदी अवनीश सिंग

मुंबई काँग्रेसच्या उत्तर भारतीय सेलच्या अध्यक्षपदी अवनीश सिंग

मुंबई - मुंबई विभागीय काँग्रेसच्या उत्तर भारतीय सेलच्या अध्यक्षपदी आज अवनीश सिंग यांची नियुक्ती करण्यात आला आहे. मुंबई काँग्रेसचे कार्यालय राजीव गांधी भवन येथे झालेल्या कार्यक्रमात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी अवनीश सिंग यांना नियुक्तीचे पत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड, मुख्य प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, माजी नगरसेवक अशरफ आझमी, मोहसीन हैदर, बब्बू खान, अजंता यादव, राजपती यादव, निजामुद्दीन राईन आदी नेते उपस्थित होते.

“काँग्रेस पक्ष हा सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन काम करणारा पक्ष आहे. उत्तर भारतीय समाज नेहमीच काँग्रेस पक्षाच्या पाठिशी उभे राहिला आहे व काँग्रेस पक्षानेही उत्तर भारतीयांना मुंबईत मान सन्मान दिला आहे. आमदार, खासदार, मंत्रीपदे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपदही दिले पण काही स्वार्थी लोकांनी पदाचा स्वतःच्या लाभासाठी फायदा करून घेतला व समाजाला मात्र लाभापासून वंचित ठेवले. मुंबईत रोजगारासाठी येणाऱ्या उत्तर भारतीयांना काँग्रेस पक्षानेही हात दिला, आधार दिला. हॉकर्स पॉलीसी बनवली, उत्तर भारतीय भवन बनवले, त्यांच्यासाठी काँग्रेस पक्षाचे दरवाजे नेहमीच खुले राहिले आहेत. काही लोकांनी काँग्रेस पक्ष सोडला असला तरी त्यामुळे पक्षावर काहीही परिणाम झालेला नाही. आजही उत्तर भारतीय समाज काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभा आहे”, असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या. 


रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट