NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचे अनावरण

अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचे अनावरण

लंडन - यावर्षीपासून भारत-इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेस अँडरसन-तेंडुलकर असे नाव देण्यात आले आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्या योगदानाबद्दल इंग्लंड क्रिकेट मंडळाने (ईसीबी) हा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला. अखेर काल लॉर्ड्स येथेच तेंडुलकर व अँडरसनच्या उपस्थितीत या करंडकाचे अनावरण करण्यात आले.

ईसीबीने त्यामुळे २००७पासून देण्यात येत असलेले पतौडी हे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. २००७पासून भारत-इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेस मन्सूर अली खान पतौडी यांच्या स्मरणार्थ ‘पतौडी’ असे नाव देण्यात येत होते. पतौडी यांनी वयाच्या २१व्या वर्षी भारताचे कर्णधारपद भूषवले होते. मात्र आता ईसीबीने तेंडुलकर-अँडरसन असे नाव ट्रॉफीला दिले आहे. मात्र पतौडी यांचे नाव मालिकेशी निगडीत असावे असे तेंडुलकरने स्वत: ईसीबीला सुचवले. त्यामुळे आयसीसीशी संवाद साधल्यानंतर ईसीबीने आता या कसोटी मालिकेतील विजेत्या खेळाडूंना पतौडी पदक देऊन गौरविण्यात येईल, असे सांगितले. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि पतौडी यांच्या पत्नी शर्मिला टागोर यांनी ट्रॉफीचे नाव बदलण्याबाबत टीका केली होती.

ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीतील चौथ्या दिवशीच ट्रॉफीचे अनावरण करण्यात येणार होते. तसेच नाव बदलण्याचीही अधिकृत घोषणा होणार होती. मात्र अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेमुळे हे टाळण्यात आले. तसेच मालिका संपल्यावर विजेत्या खेळाडूंना पतौडी पदकाचे वितरण केले जाईल, असे ईसीबीने स्पष्ट केले.

भारतीय संघ या मालिकेत एका नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात खेळणार असला, तरी आपण नक्कीच चमकदार कामगिरी करू. भारतीय संघ ही मालिका ३-१ अशा फरकाने जिंकू शकेल, असे भाकीत तेंडुलकरने वर्तवले आहे. तसेच कर्णधार गिलने कोणी त्याच्याविषयी काय बोलत आहे, याचा विचार न करता स्वत:च्या निर्णयावर ठाम रहावे, असेही तेंडुलकरने सुचवले आहे. गिल या कसोटीत चौथ्या स्थानी फलंदाजी करणार आहे. एकेकाळी सचिनही त्याच स्थानी फलंदाजी करायचा.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट