मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

मोरबे धरणाचा पाणीसाठा 62 टक्क्यांवर

नवी मुंबई ः नवी मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या महापालिकेच्या स्वत:च्या मालकीच्या मोरबे धरण क्षेत्रात एक दिवसात 226 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या तीन दिवसापासून धरण क्षेत्रात पडणार्‍या मुसळधार पावसाने मोरबे धरणाची पाणी पातळी 1.48 मीटरने वाढून ती 80 मीटर इतकी होवून धरणातील पाणीसाठा 62% टक्के झाला आहे. 

गत आठवड्यापर्यंत मोरबे धरणाची पातळी 42 टक्के होती. त्यामुळे यंदा नरी मुंबईगा पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिंता व्यक्त होत होती. मात्र आता दमदार पावसामुळे धरणाची पाणीपातळी वाढली आहे. सध्यस्थितीत धरणात झालेला पाणीसाठा व येत्या काही दिवसांत पाऊस असाच पडत राहिला तर लवकरच धरण भरून वाहू लागेल, असा विश्वास आयुक्त अभिजित बांगर यांनी व्यक्त केला. 19 व 20 जुलै या दोन दिवसांत धरण क्षेत्रात सव्वा दोनशे मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाल्याने धरणाची पाणी पातळी 1.48 मीटरने वाढून ती 80 मीटर इतकी झाली आहे. त्यामुळे धरणात सध्या 62 टक्के इतका पाणीसाठा झाला असून या उपलब्ध साठ्यातून 31 जानेवारी 2020 पर्यंत शहराला पाणीपुरवठा करता येईल, असे असले तरी नागरिकांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा, असे आवाहन आयुक्तांनी केलं आहे.

  • गतवर्षीच्या तुलनेत यावेळी जास्त पाणीसाठा 
  • यावर्षी सुरुवातीला पावसाने दडी मारली होती. मात्र जुलैपासून पावसाने दमदार एन्ट्री केल्यामुळे गतवर्षीच्या जुलै महिन्यातील तुलनेत यावेळी जुलै महिन्यातच मोरबे धरणात पाणीसाठा वाढला असून अजून काही दिवस पाऊस असाच पडत राहिला तर मोरबे धरण लवकरच भरून वाहू लागेल. दरम्यान, यंदाच्या चालु वर्षात मे महिन्यातील पहिल्या आठवड्यापर्यंत मोरबे धरणात 44 टक्के इतका पाणीसाठा होता. त्यात सध्यस्थितीत धरणात जोरदार पर्जन्य झाल्यामुळे हा साठा आता 62 टक्के इतका झाला आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट