मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

नवी मुंबईत तीन आत्महत्या

नवी मुंबई ः घणसोली आणि जुईनगर या भागात शनिवार आणि रविवार या दोन दिवसात तीन व्यक्तींनी वेगवेगळ्या कारणावरुन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे घणसोलीत एकाच इमारतीत राहणार्‍या दोन व्यक्तींचा यात समावेश आहे. 

घणसोलीतील ज्ञानेश्वर अपार्टमेंटमध्ये तिसर्‍या मजल्यावर राहणार्‍या अनिल वसंत बोराडे (38) या व्यक्तीने नोकरी गेल्याने आलेल्या नैराष्येतून शनिवारी दुपारी राहत्या घरातील खिडकीस ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अनिलच्या भावाने दरवाजा तोडून अनिलला वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. या घटनेपाठोपाठ रविवारी दुपारी त्याच इमारतीत चौथ्या मजल्यावर राहणार्‍या उत्तम लक्ष्मण कदम (47) यांनी देखील राहत्या घरात किचनमध्ये फँनच्या हुकला गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी उत्तम कदम यांच्या मुलाने त्यांना तत्काळ महापालिकेच्या रुग्णालायत दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. उत्तम कदम यांच्या आत्महत्येमागचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलीस उपनिरीक्षक सतीश गोरे यांनी सांगितले. या दोन्ही घटनांची रबाळे पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनांचा पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे. 

या घटनेप्रमाणे रविवारी सायंकाळी जुईनगर सेक्टर-23 मध्ये राहणार्‍या वेंकटदास सुदर्शन पेरला (51) या व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकिस आले आहे. वेकंटदास यांनी आतुन दरवाजा बंद केल्याने शेजार्‍यांनी दरवाजा तोडून त्यांना महापालिका रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. वेंकटदास बिपी, शुगर या आजाराने त्रस्त होते. ते एकटे राहण्यास असल्याने ते मानसिक आजाराने व एकटेपणाला कंटाळले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. नेरुळ पोलीस ठाण्यात या घटेनची नोंद करण्यात आली आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट