Breaking News
नवी मुंबई : शनिवारपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणार्या कोसळधारेने अनेकांना फटका बसला असून झालेल्या दुर्घटनांमुळे अनेकांचे जीवही गेले आहेत. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीलाही याचा फटका बसला आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी दिसून येत आहे. नवी मुंबईतही अनेक ठिकाणी वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत तर काही ठिकाणी रस्ते खचल्याच्या घटना घडल्या आहेत. नवी मुंबईत पावसात अडकलेल्या 375 जणांची यशस्वी सुटका करण्यात आली आहे. आर्टिस्ट व्हिलेज धबधब्यात अडकलेले 200 पर्यटक, तर अडवली-भूतवलीच्या ओढ्यापलीकडे शेतकरी अडकले होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya