पोस्टाची प्रीमियम सेवा – २४ तासांत पोहोचणार पार्सल भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह देण्यासाठी कॅनडा सरकारने मागितले 35 लाख मुंबईतील पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग, मुख्य रस्ते व रहदारीचे रस्‍ते समतल करावेत, उप महापौर श्री. संजय घाडी 10 वी भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिकांचा संच चोरीला 10 वी भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिकांचा संच चोरीला 2026 चे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, या मराठी लेखकाचा सन्मान सेवानिवृत्त एस.टी. कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास सिंधू सेवा दलातर्फे शुक्रवारी (ता. २०) ‘चेटीचंड’ महोत्सव सक्तीने धर्मांतर विरोधी विधेयकावर विरोधी पक्षांमध्ये फूट बेकायदेशीर धर्मांतरणाच्या विरोधातील विधेयक सर्व धर्मियांसाठी समान…. Fastag वार्षिक पास १ एप्रिलपासून महागणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेला स्थगिती आणि मनाई आदेश देण्याची मागणी आखाती देशातील युद्धामुळे टरबुज उत्पादक शेतकऱ्यांना फटका… राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर भारतीय चित्रपटांसाठी आता सबटायटल्स आणि ऑडिओ वर्णन अनिवार्य भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना व्हिसा मुदतवाढ LPG गॅसला पर्याय सापडल्याचा पुण्यातील शास्त्रज्ञांचा दावा गॅस पुरवठ्याच्या प्राधान्यक्रमाची नियमावली जारी अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांमुळे पादचारी हैराण पंधरादिवसांत राज्यातील मद्यनिर्मिती बंद करावी लागणार WhatsApp, FB आणि Messenger वर फसवणूक टाळण्यासाठी Meta चे नवे फिचर्स मुंबई मनपाच्या शाळांमध्ये मध्यान्ह भोजनाऐवजी फळे वाटप सक्तीच्या धर्मांतरासाठी ७ वर्षांची कैद, ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानसभेत सादर जागतिक महिला दिन मनाला स्पर्श करणारा उपक्रम ठरला LPG टंचाईमुळे इन्डक्शनच्या मागणीत मोठी वाढ ग्रामीण भागात 45 दिवसांनंतरच बुक होणार LPG सिलेंडर प्रवासी सेवा देणाऱ्या वाहनांना ‘QR कोड’ अनिवार्य देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था महाराष्ट्राचीच…. जप्तीची कारवाई सुरू होताच २ हजार ८८८ मालमत्ताधारकांनी भरला कर महाराष्ट्र केसरी २०२५-२६’ कुस्ती स्पर्धेच्या बोधचिन्हाचे झाले अनावरण मुंबईतल्या घरासाठी गिरणी कामगार एकवटला! मुरबे बंदर प्रकल्पाच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह बहुचर्चित ‘ लाडकी बहीण ‘ योजनेवर येतोय चित्रपट प्रसिद्ध रॅपर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मुंबई येथे आगमन ‘हॉवर्थ इंडिया’तर्फे महिला दिनी कर्तृत्त्ववान महिलांसह प्रमुख शहरांमध्ये ‘गिव्ह टू गेन’ मालिकेचे आयोजन माणिकडोह मधील २० बिबट्यांचे वनतारा केंद्रात स्थलांतर अंबरनाथ शिवमंदिर परिसरात 32 घरांवर बुलडोझर हवामान विभागाकडून उष्णतेचा अलर्ट जारी ६० रुपयांनी वाढले घरगुती Gas सिलिंडरचे दर या शहरांत सुरू होणार BSNL 5G सेवा एकल मातांना पूर्ण पालकत्वाचा अधिकार – न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुंभदूत ॲपचे अनावरण बृहन्‍मुंबई महानगरपालिका स्‍थायी समिती अध्यक्षपदी श्री. प्रभाकर शिंदे यांची बिनविरोध निवड PCM ग्रुप घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मिळेल मेडिकलला प्रवेश शेअर बाजारात भीषण भूकंप! इराण-अमेरिका युद्धाच्या सावटाखाली बाजार ‘रक्तबंबाळ पंतप्रधानांच्या मेन्यूला अस्सल मराठी तडका ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे पोस्टर आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी झाले रिलीज! DGCA कडून विमान प्रवासातील गैरवर्तनाबाबत; ‘झीरो टॉलरन्स पॉलिसी’ लागू अभिनेता प्रसाद ओकच्या कामगिरीचा विश्वविक्रम राज्यसभेच्या ३७ जागांसाठी १६ मार्चला निवडणूक नाशिकमधील द्राक्ष उत्पादक संकटात विमानात एवढं फ्यूएल घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय? जन गण मन आधी ‘वंदे मातरम्’ गाण्याला दल खालसाचा विरोध राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पद भरतीस मान्यता काळाचौकी येथे खोदकामामुळे अपघातात वाढ हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ पुस्तकातून मार्गदर्शन आणि उपाय मस्क यांची AI कंपनी चंद्रावर उभारणार फॅक्टरी भोईवाडा परिसरात वाहतूक विभागाची धडक संयुक्त कारवाई; नगरसेविका श्रद्धा जाधव सोडवणार क्यू आर कोडने नागरी समस्या महाशिवरात्रीसाठी भीमाशंकर मंदिर राहणार बंद भारत लवकरच या देशात UPI लाँन्च करणार RSS च्या कार्यक्रमाला सलमान खानची उपस्थिती लाडक्या बहिणींच्या e-KYC ला मुदतवाढ १२ जिल्हापरिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान देशभर ओला, उबर आणि रॅपिडो चा संप इस्लामाबादमध्ये मशिदीवर आत्मघातकी हल्ला 31 जण मृत्यूमुखी, 169 जखमी भारतातील पहिला AI IPO करी रोड पदपथांवरील हायड्रेलमुळे पादचारी हैराण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना मिळणार Z+ दर्जाची सुरक्षा चेक बाऊन्स प्रकरणी अभिनेता राजपाल यादव विरोधात अटक वॉरंट शक्तिपीठ महामार्गाच्या खर्चात तब्बल १५ हजार कोटींची वाढ अजितदादा पवार यांचे संगमवाडी येथे भव्य स्मारक उभारण्याची मागणी युमनाम खेमचंद सिंह झाले मणिपूरचे 13 वे मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाची शपथ भायखळा येथे दिवंगत कै.शरद (आप्पा) पवार उद्यानाचे झाले लोकार्पण आज निर्मला सीतारमण नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार, मतदार यादीत नाव न सापडल्यास BMC च्या या हेल्पलाईनवर कॉल करा प्रचारतोफा थंडावल्या, उमेदवारांना घरोघरी प्रचारास मुभा राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका 5 फेब्रुवारीला Blinkit, Zepto, Swiggy, Zomato ची 10 मिनिटांची डिलिव्हरी सर्व्हीस बंद नालासोपार्‍यात १० लाखांची रोकड जप्त यामिनी जाधव यांचा मुंबई पालिका निवडणुकीसाठी प्रचाराला वेग राजुलच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे भांडुप मध्ये वेदांता समूहाचे अध्यक्ष दान करणार ७५ टक्के संपत्ती नाना आंबोले यांना शिवडीकरांचा वाढता प्रतिसाद ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा टीझर प्रसिद्ध क्रांतिज्योती विद्यालय ‘ सुपरहीट, पहिल्याच आठवड्यात ३.९१ कोटी कमाई राज्यभरात प्रचारसभांचा धुरळा, फडणवीस ठाणेकरांशी संवाद ... मुंबईत धावणार 18 डब्ब्यांची लोकल राज्यातील २७ लाख वाहनांना अद्यापही HSRP नाही, लवकरच तपासणी होणार बिनविरोध निवडीला मनसेचा हायकोर्टात आव्हान माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचं दीर्घ आजारानं निधन वचन ठाकरेंचं! मुंबईकरांसाठी राज-उद्धव ठाकरेंकडून शिवशक्तीचा वचननामा जाहीर आज होणार फैसला! कर्णधार वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका राजुल संजय पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज संरक्षण क्षेत्रासाठी 79 हजार कोटींच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी ३३ वर्षांनंतर पुन्हा उघडणार जेजे हत्याकांडाची केस प्रशिक्षकपदावरून गौतम गंभीरला बीसीसीआयकडून मिळणार डच्चू? अखेर BCCI ने सोडलं मौन, पुण्यात भाजप, राष्ट्रवादीविरोधात लढणार, मविआचा फॉर्म्युला ठरला; 50-50-50 मनसेलाही सोबत घेणार शिवसेनेची लवकरच पहिली यादी; एकनाथ शिंदेंकडून 60 माजी नगरसेवकांना संधी, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी विशेष टोलमाफी पास पर्यूषण पर्वात दोन दिवस कत्तलखाने राहणार बंद २९ टक्के कोसळला या गेमिंग कंपनीचा शेअर Asia Cup मध्ये भारत-पाक आमने सामने- सरकारने दिली परवानगी 12 आणि 28 टक्क्यांचा GST स्लॅब होणार रद्द, सर्वसामान्यांना फायदा अमेरिकेत छत्रपती शिवरायांच्या कीर्तीरथाची भव्यदिव्य मिरवणूक कानात ईअर फोन असल्याने युवकाचा मृत्यू पोस्ट झाले अत्याधुनिक – अ‍ॅडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म सुरु BSNL ची मान्सून ऑफर – 1 महिना मोफत इंटरनेट गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक सलोख्यासाठी हजरत महंमद पैगंबर जयंती ८ सप्टेंबर रोजी होणार .. आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रवासाला तब्बल बारा तास, मग टोल का द्यावा, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल उपमुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर केले ‘लाडकी सून’ अभियान मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी… कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ… उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच झाले सुरू मतदार यादीबाबतचे आरोप शपथपत्रासह करा अन्यथा माफी मागा… शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल १८ ऑगस्टला जालन्यात मुसळधार पावसाने नदी नाले तुडुंब… मुंबईत पागडीधारकांना आदित्य ठाकरेंकडून पुनर्वसनाची हमी कॅडबरी डेअरी मिल्कच्या रॅपरवर खास मराठीत शब्द पहिल्याच दिवशी FASTag वार्षिक पासला भरभरुन प्रतिसाद, १.४ लाखांहून अधिक नोंदणी राज्यात १६ ते २१ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राचे उद्घाटन लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत सर्व घटकांना सोबत घेऊन विकास करणार ! नारळी पौर्णिमेला वरळीत हुल्लडबाजी करणाऱ्या उबाठा गटावर कारवाई करा BSF मध्ये 1121 जागांसाठी भरती; 10वी-12वी व ITI करु शकतात अर्ज 15 ऑगस्टपासून सुरू होणार FASTag Pass गणेशोत्सव काळात मुंबईत ‘डीजे’ला बंदी दादरमध्ये इमारतीच्या छतावर कबुतरखाना सुरू आधार कार्ड, व्होटर कार्ड,रेशन कार्ड हे नागरिकत्त्वाचे पुरावे नाहीत 15 ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवलीत मांसाहार बंदी इथेनॉल पुरवठ्यात उ.प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसर्‍या स्थानी हेपेटायटीस D पासून कर्करोगाचा धोका असल्याचा WHO चा निर्वाळा दहिहंडी सराव करताना 11 वर्षीय बालकाने गमावला जीव अमेरिकेच्या टॅरिफमुळे दोन अब्ज डॉलरची कोळंबी निर्यात धोक्यात सिंचन तलाव धोक्यात; भिंत खचली, २०० एकर शेतीला धोका…. हुतात्मा स्मारकाच ऐतिहासिक महत्त्व टिकले पाहिजे - आमदार सचिन अहिर रेल्वेकडून इतर प्रवाशांसह मुंबईकरांसाठी सुरक्षेच्या नव्या उपाययोजना राजकीय पक्षाचा चेहरा राहिलेली व्यक्ति न्यायालयाचा चेहरा असणे योग्य आहे का ? सरकारने लोकसभेत सादर केलेले आयकर विधेयक घेतले मागे अमेरिकेच्या टॅरिफचा भारतीय वस्त्रोद्योगाला मोठा फटका ठाणे जिल्ह्यातील या शहरात लवकरच सुरु होणार ‘पॉड टॅक्सी’ सेवा माथेरानची हातरिक्षा बंद करा – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कबुतरांना अन्न-पाणी देण्यावर उच्च न्यायालयाची बंदी कायम एक पडदा सिनेमागृहाबाबत संयुक्त समिती कोल्हापूरकर जिंकले, महादेवी हत्तीण पुन्हा येणार नांदणी मठात उत्तराखंडला गेलेले महाराष्ट्रातील सर्व पर्यटक सुखरूप ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती उत्तरकाशीमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार, ४ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता भाजपाचे पदाधिकारी बनले न्यायाधीश, न्यायपालिकेचा निष्पक्षपणा धोक्यात? सेंचुरी मिलचा भूखंड कोणाच्या घशात घालणार? कामगार नेते गोविंदराव मोहिते‌ भायखळ्यात आमदार चषक 2025 ही भव्य हॉलीबॉल स्पर्धा संपन्न शिवसेना प्रभाग 205 च्या वतीने लाडू वाटप नृत्येश्वर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तैवानमध्ये भारतीय लोकनृत्यांची केली बहारदार सादरीकरण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानकाच्या नामकरणाविरोधात शिवसेनेचे आंदोलन एसटी आता करणार रिटेल (किरकोळ ) इंधन विक्री कबुतरांना खाद्य देणार्‍याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजपामध्ये प्रवेश ‘$1 ट्रिलियन’ अर्थव्यवस्थेकडे महाराष्ट्राची वेगवान वाटचाल! निवडणूक पारदर्शक होण्यासाठी मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडा राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम हाती… स्वामीनाथन यांचा जन्मदिन “शाश्वत शेती दिन” म्हणून साजरा राज्य सरकारने जाहीर केले नवे सोशल मीडिया नियम राज ठाकरे आल्यानं कित्येक पटीनं आनंद- उद्धव ठाकरे खडसेंचा जावई पुण्यात रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडला गेला लाडकी बहीण योजनेसाठी 26.34 लाख महिला अपात्र जन्मतःच या बालकाच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 10 उत्तीर्ण उमेदवारांसाठी IB मध्ये नोकरीची मोठी संधी शाळा, कॉलेज आणि कोचिंग संस्थांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून 15 निर्देश जारी मुंबई रेल्वे साखळी स्फोट प्रकरण : हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी ससून डॉकमधील मच्छीमारांच्या पुनर्वसनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे.. ; राज ठाकरे निशिकांत दुबेवर कडाडले सीमाभागातील निपाणी शहरात कन्नड भाषेची सक्ती महायुती सरकारला सत्तेचा माज -माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई महाराष्ट्राचीच , मुंबईत मराठी माणसाचाच आवाज बुलंद …. ‘जय गुजरात’ म्हणणारे एकनाथ शिंदे गुजरात व अमित शाहांचे गुलाम म्हाडा लॉटरीचा धडाका; ठाण्यात 2000 घरांसाठी सोडत, वाचा कधी येणार जाहिरात पावसाळ्यात केस का गळतात? अशी घरगुती उपाय करून थांबवा केस गळती NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

गिधाडांची नगरी

महाराष्ट्र सरकारने नुकताच पुनर्विकासासाठी म्हाडाला सरसकट तीन तर राज्यातील सर्व सेंट्रल बिजनेस डिस्ट्रिक्टसाठी पाच चटईक्षेत्र बहाल केले. मागील अनेक वर्षांपासून जनतेचे भले करण्याच्या नावाखाली वाढीव चटई निर्देशांक देण्याची ओढ सर्वच राज्य सरकारांमध्ये लागली आहे. खैरात वाटावी तसा वाढीव चटई निर्देशांक वाटला जात आहे.  मग हे वाढीव चटई निर्देशांक कधी पुनर्विकासासाठी, कधी माहिती आणि तंत्रज्ञानाच्या विकासासाठी, कधी मुंबई आणि सभोवतालच्या परिसरात घरांचा स्टोक वाढवण्यासाठी इंटिग्रेटेड टाउनशिपच्या माध्यमातून, तर कधी परवडणारी घरे बनवण्यासाठी हे अतिरिक्त चटई निर्देशांकाची खैरात विकासकांना दिली जात आहे. मात्र हे सर्व करत असताना ज्या उद्देश्याने हे वाढीव चटई क्षेत्र बहाल केले जाते खरंच तो उद्देश साधला जातो का ? हा खरा कळीचा मुद्दा आहे. सर्वसामान्यांच्या भल्याचा आव आणत शहराचा टोलेजंग विकास करीत असलेली गिधाडे पाहिली कि शिसारी येते आणि या शहरी गिधाडांना वेळीच आवरण्याची गरज भासू लागते.

मुंबई शहरावरील गर्दीचा ताण कमी व्हावा या दृष्टीने मुंबई लगतच्या ठाणे खाडी किनारी 324 चौ.किमी क्षेत्रावर नवी मुंबई शहराची निर्मिती करण्यात आली. सुरुवातीला 20 लाख लोकसंख्या विचारात घेऊन या शहराचे नियोजन करण्यात आले. येथील लोकसंख्येच्या प्रमाणात साधनं आणि सोई-सुविधा सिडकोने निर्माण केल्या. चंदीगड नंतर देशातील अतिशय सुटसुटीत शहर म्हणून या शहराची गणना झाली. शहराची निर्मिती करताना बाजूच्या डोंगरातील माती, मुरूमाचा भराव खाडीत टाकून शहर वसवले, पण त्यामुळे नवी मुंबईतील जंगले नष्ट झाली आणि समुद्र किनाराही आकसला गेला. पण समुद्राच्या पाण्याने नवी वाट चोखाळली आणि उरण, अलिबाग, रत्नागिरी मधील कमी उंचीच्या जमिनीला आपल्या कवेत घेतले. बरे निसर्गाची अपरिमित हानी करून नवी मुंबई सारखे जरी संपूर्ण नवीन शहर वसवले तरी मुंबईतील वाढत्या लोकसंख्येला आपण आळा घालू शकलो का ? तर उत्तर नकारार्थीच द्यावे लागेल. मुंबई शहरातील जमिनीचे भाव गगनाला भिडल्यावर गगनचुंबी विकासाची स्वप्ने राजकर्त्यांना पडू लागली आणि हा विकास साधण्यासाठी वाढीव चटई क्षेत्राचे पालुपद दाखवण्यात आले आणि आजतागायत त्याची खिरापत वाटप अव्याहतपणे सुरु आहे. विकासाच्या भन्नाट कल्पनेच्या नावाखाली शहरातील या गिधाडांनी आता शहराचे लचके तोडण्यास सुरुवात केली असून नागरिकांच्या जगण्याच्या हक्कावरच त्यामुळे गदा आणली आहे.

विकासाचे केंद्रीकरण हे वाढत्या शहरीकरणाची मोठी समस्या आहे. मोठ्या प्रमाणावर गाव खेड्यांचे शहरीकरण होत असून शेकडो वर्षांच्या भगीरथ प्रयत्नाने बनलेली सुपीक जमीन आज नागरीकरणाखाली आलेली आहे. वाढत्या नागरीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधनसंपदेची लूट मानवाकडून होत आहे. पाणी आणि वीज हि वाढत्या नागरीकरणाची मोठी गरज असून त्याची पूर्तता कशी करता येईल हेही मोठे आवाहन समाजापुढे आहे. 

पण यातील कोणत्याही समस्यांची चिंता या गिधाडांना नसून फक्त कथित विकासाचे इमले रचून स्वतःची आर्थिक उन्नत्ती त्यांना साधायची आहे. आज आर्थिक उन्नत्ती आणि त्यातून येणारा चंगळवाद हीच आधुनिक विकासाची परिभाषा ठरल्याने निसर्गाचा आणि मानवी मूल्यांचा र्‍हास हेच या विकासाचे अंतिम सत्य ठरत आहे. या अंतिम सत्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाल्याचा प्रत्यय मनुष्य पावलोपावली अनुभवत आहे.

आज सर्वत्र झपाट्याने नागरीकरण सुरु आहे. नुकतेच पुनर्विकासासाठी तीन चटई क्षेत्र सरकारने जाहीर केले आहे. हे चटई क्षेत्र कवडी मोलाने विकासकांना राजकर्ते देत आहेत. हि खैरात वाटताना सर्वसामान्यांचा विकास हे पालुपद लावले जात असले तरी ज्या कामांसाठी हे वाढीव चटई क्षेत्र देण्यात येत आहे तो उद्दिष्ट पूर्ण होताना दिसत नाही. नवी मुंबईत वाशी रेल्वे स्थानकासमोरील मोक्याची जागा माहिती आणि तंत्रज्ञानाच्या विकासासाठी तीन चटई निर्देशांक आधारभूत रक्कमेच्या दहा टक्के दराने विकासकांना देण्यात आला. त्याचबरोबर त्यांना मुद्रांकशुल्कही  निम्मे करण्यात आले. तेथे 24 तास विजेचा अखंडित पुराव्याची अट विकासकावर घालण्यात आली. पण सध्याची परिस्थिती पाहिली तर सरकारच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेल्याचे दिसत आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील म्हणून दिलेल्या सुविधा फक्त विकासकांच चांगभलं करून गेले. या संपूर्ण ठिकाणी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योग सोडून सर्वच उद्योग केले जात आहेत. 24 तास वीजपुरवठ्याच्या नावाने सगळीकडे बोंबाबोंब आहे. या सर्व बेकायदेशीर बाबींवर लक्ष ठेवणारी स्वतंत्र यंत्रणा सरकारने उभारणे गरजेचे असताना सर्वच उद्योग मात्र सरकारच्याच छत्रछायेखाली रामभरोसे सुरू असलेले पाहायला मिळत आहेत. सरकारी अधिकार्‍यांनी  जाणीवपूर्वक आखलेल्या चुकीच्या धोरणांमुळे या आतबट्ट्याचा व्यवहारातून शासनाचे खूप मोठे आर्थिक नुकसान होत असताना ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ या धोरणाने सर्वचजण स्वतःची तुंबडी भरण्यात व्यस्त आहेत. तीच अवस्था आज परवडणारी घरे, इंटिग्रेटेड टाऊनशिप खाली अधिकारी आणि विकासकांमार्फत सुरु असलेल्या लुटीबाबत आहे. 

काँग्रेस सरकारने सुरुवातीला ‘रेंटल हौसिंग’ या गोंडस नावाखाली चटईक्षेत्र खैरातीची योजना सुरु केली. या योजनेत तीन चटईक्षेत्र विकासकाला तर एक चटई क्षेत्र इतकी 180 चौ.मी. ची घरे बांधून म्हाडाला द्यायची होती. जेणेकरून म्हाडामार्फत ती घरे गरजवंतांना वितरित करता येतील. पण फडणवीस सरकारने त्याच्यापुढे एक पाऊल टाकत ‘परवडणारी घरे’ हे गोंडस नाव या योजनेला देऊन संपूर्ण चार चटई क्षेत्र विकासकाला बहाल केला आणि  परवडणार्‍या दरात विकायची मुभा दिली. परवडणार्‍या घरांचे दर नेमके किती ? ते कोणी ठरवायचे याची मुभा विकासकांना देण्यात आली. आज सरकारने मंजूर केलेल्या या योजनांतील घरांचे दर अधिक आहेत. विकासकाला अनेक सुविधा आणि सवलती देऊनही जर घरांच्या दरात फरक पडणारच नसेल तर सरकारला आर्थिक दृष्ट्या खड्ड्यात घालणार्‍या या योजना सरकारी गिधाडांनी कोणासाठी बनवल्या हे वेगळे सांगायला नको.      

आज राज्यात जे अनधिकृत बांधकामांचे पीक आले आहे त्याला सरकारी गिधाडांची धोरणेच जबाबदार आहेत. घरांचे नियोजन करताना गरिबातील गरीब माणसाची क्रयशक्ती बघून घरांची निर्मिती केली जात नाही म्हणून गरिबांना या अनधिकृत बांधकामांचा आसरा घ्यावा लागतो. हे कटू सत्य आहे आणि जोपर्यंत ते स्वीकारले जात नाही तोपर्यंत अनधिकृत वसाहती उभ्याच राहणार. म्हाडा, सिडको महामंडळांची निर्मिती मध्यम वर्गीयांना परवडणार्‍या दरात घरे उपलब्ध व्हावीत म्हणून करण्यात आली होती. सुरुवातीला हा उद्देशही साधला गेला होता. पण आज या दोन्ही मंडळांची कार्यपद्धती खासगी विकासकांना लाजवेल अशीच आहे. आजही सिडको आणि म्हाडाच्या घरांची किंमत खासगी विकासकांएवढी असून बांधकामांचा दर्जा मात्र सुमार आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस आज या शहरातील गिधाडांच्या आर्थिक लुटीचा बळी ठरला आहे. आज प्रशाकीय अधिकारी, राजकर्ते आणि अंडरवर्ल्ड मधील लोकांचा काळा पैसा या क्षेत्रात गुंतवल्याची चर्चा असून त्यांनाच घरांच्या किमती कमी होणे परवडणारे नाही. त्यामुळे गेल्या चार वर्षात देशात बांधकाम क्षेत्रात कमालीची मंदी असतानाही घरांच्या किमती कमी होताना दिसत नाही. विकासकांना लागणारे व्हिटॅमिन-एम (पैसा) या सुधारकांमार्फत पूरवला जात असल्याने विकासक निर्धास्तपणे घरांच्या किमती आटोक्यात ठेवू शकले आहेत. शहरातील घराच्या किमती या अधिक असल्याने आणि हा गोरखधंदा असाच कायम राहावा म्हणून विकासकांना अधिकाधिक घरांची निर्मिती शक्य व्हावी म्हणून वाढीव चटईक्षेत्राचा खेळ राजकर्त्यांकडून खेळाला जात आहे. त्याला साथ मिळत आहे ती प्रशासनातील अधिकार्‍यांची. नुकतेच सीआरझेड, कांदळवन आणि फ्लेमिंगो क्षेत्राचे बंधनही सरकारने कमी केले असून त्यात फक्त जास्तीसजास्त बिल्डरांचे हितसंबंध जपले जात असल्याचा आरोप पर्यावरणवादी करत आहेत.  हे वाढीव चटई क्षेत्र मंजूर करताना लोकसंख्येच्या प्रमाणात सामाजिक सेवा सुविधा, खेळाची मैदाने, उद्याने उपलब्ध आहेत कि नाही याची चिंता नसून फक्त गगनचुंबी विकासातून त्यांना स्वतःचा विकास आणि सात पिढ्या पुरतील एवढी संपत्ती अर्जित करायची आहे. कोरोनाने संपत्ती क्षणभंगुर असल्याची जाणीव मानव जातीला करून दिली आहे पण स्वतःच्या स्वार्थासाठी पर्यावरण आणि मानवी जीवनाचे लचके तोडण्यासाठी एकत्र आलेल्या गिधाडांना त्याचे भान थोडेच आहे. वाढीव चटईक्षेत्राचा खेळ बेमालूमपणे खेळणार्‍या गिधाडांवर वेळीच अंकुश न ठेवल्यास मानवजातीपुढे विनाशाचे भविष्यात मोठे संकट उभे करतील.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट