पोस्टाची प्रीमियम सेवा – २४ तासांत पोहोचणार पार्सल भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह देण्यासाठी कॅनडा सरकारने मागितले 35 लाख मुंबईतील पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग, मुख्य रस्ते व रहदारीचे रस्‍ते समतल करावेत, उप महापौर श्री. संजय घाडी 10 वी भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिकांचा संच चोरीला 10 वी भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिकांचा संच चोरीला 2026 चे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, या मराठी लेखकाचा सन्मान सेवानिवृत्त एस.टी. कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास सिंधू सेवा दलातर्फे शुक्रवारी (ता. २०) ‘चेटीचंड’ महोत्सव सक्तीने धर्मांतर विरोधी विधेयकावर विरोधी पक्षांमध्ये फूट बेकायदेशीर धर्मांतरणाच्या विरोधातील विधेयक सर्व धर्मियांसाठी समान…. Fastag वार्षिक पास १ एप्रिलपासून महागणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेला स्थगिती आणि मनाई आदेश देण्याची मागणी आखाती देशातील युद्धामुळे टरबुज उत्पादक शेतकऱ्यांना फटका… राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर भारतीय चित्रपटांसाठी आता सबटायटल्स आणि ऑडिओ वर्णन अनिवार्य भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना व्हिसा मुदतवाढ LPG गॅसला पर्याय सापडल्याचा पुण्यातील शास्त्रज्ञांचा दावा गॅस पुरवठ्याच्या प्राधान्यक्रमाची नियमावली जारी अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांमुळे पादचारी हैराण पंधरादिवसांत राज्यातील मद्यनिर्मिती बंद करावी लागणार WhatsApp, FB आणि Messenger वर फसवणूक टाळण्यासाठी Meta चे नवे फिचर्स मुंबई मनपाच्या शाळांमध्ये मध्यान्ह भोजनाऐवजी फळे वाटप सक्तीच्या धर्मांतरासाठी ७ वर्षांची कैद, ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानसभेत सादर जागतिक महिला दिन मनाला स्पर्श करणारा उपक्रम ठरला LPG टंचाईमुळे इन्डक्शनच्या मागणीत मोठी वाढ ग्रामीण भागात 45 दिवसांनंतरच बुक होणार LPG सिलेंडर प्रवासी सेवा देणाऱ्या वाहनांना ‘QR कोड’ अनिवार्य देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था महाराष्ट्राचीच…. जप्तीची कारवाई सुरू होताच २ हजार ८८८ मालमत्ताधारकांनी भरला कर महाराष्ट्र केसरी २०२५-२६’ कुस्ती स्पर्धेच्या बोधचिन्हाचे झाले अनावरण मुंबईतल्या घरासाठी गिरणी कामगार एकवटला! मुरबे बंदर प्रकल्पाच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह बहुचर्चित ‘ लाडकी बहीण ‘ योजनेवर येतोय चित्रपट प्रसिद्ध रॅपर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मुंबई येथे आगमन ‘हॉवर्थ इंडिया’तर्फे महिला दिनी कर्तृत्त्ववान महिलांसह प्रमुख शहरांमध्ये ‘गिव्ह टू गेन’ मालिकेचे आयोजन माणिकडोह मधील २० बिबट्यांचे वनतारा केंद्रात स्थलांतर अंबरनाथ शिवमंदिर परिसरात 32 घरांवर बुलडोझर हवामान विभागाकडून उष्णतेचा अलर्ट जारी ६० रुपयांनी वाढले घरगुती Gas सिलिंडरचे दर या शहरांत सुरू होणार BSNL 5G सेवा एकल मातांना पूर्ण पालकत्वाचा अधिकार – न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुंभदूत ॲपचे अनावरण बृहन्‍मुंबई महानगरपालिका स्‍थायी समिती अध्यक्षपदी श्री. प्रभाकर शिंदे यांची बिनविरोध निवड PCM ग्रुप घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मिळेल मेडिकलला प्रवेश शेअर बाजारात भीषण भूकंप! इराण-अमेरिका युद्धाच्या सावटाखाली बाजार ‘रक्तबंबाळ पंतप्रधानांच्या मेन्यूला अस्सल मराठी तडका ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे पोस्टर आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी झाले रिलीज! DGCA कडून विमान प्रवासातील गैरवर्तनाबाबत; ‘झीरो टॉलरन्स पॉलिसी’ लागू अभिनेता प्रसाद ओकच्या कामगिरीचा विश्वविक्रम राज्यसभेच्या ३७ जागांसाठी १६ मार्चला निवडणूक नाशिकमधील द्राक्ष उत्पादक संकटात विमानात एवढं फ्यूएल घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय? जन गण मन आधी ‘वंदे मातरम्’ गाण्याला दल खालसाचा विरोध राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पद भरतीस मान्यता काळाचौकी येथे खोदकामामुळे अपघातात वाढ हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ पुस्तकातून मार्गदर्शन आणि उपाय मस्क यांची AI कंपनी चंद्रावर उभारणार फॅक्टरी भोईवाडा परिसरात वाहतूक विभागाची धडक संयुक्त कारवाई; नगरसेविका श्रद्धा जाधव सोडवणार क्यू आर कोडने नागरी समस्या महाशिवरात्रीसाठी भीमाशंकर मंदिर राहणार बंद भारत लवकरच या देशात UPI लाँन्च करणार RSS च्या कार्यक्रमाला सलमान खानची उपस्थिती लाडक्या बहिणींच्या e-KYC ला मुदतवाढ १२ जिल्हापरिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान देशभर ओला, उबर आणि रॅपिडो चा संप इस्लामाबादमध्ये मशिदीवर आत्मघातकी हल्ला 31 जण मृत्यूमुखी, 169 जखमी भारतातील पहिला AI IPO करी रोड पदपथांवरील हायड्रेलमुळे पादचारी हैराण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना मिळणार Z+ दर्जाची सुरक्षा चेक बाऊन्स प्रकरणी अभिनेता राजपाल यादव विरोधात अटक वॉरंट शक्तिपीठ महामार्गाच्या खर्चात तब्बल १५ हजार कोटींची वाढ अजितदादा पवार यांचे संगमवाडी येथे भव्य स्मारक उभारण्याची मागणी युमनाम खेमचंद सिंह झाले मणिपूरचे 13 वे मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाची शपथ भायखळा येथे दिवंगत कै.शरद (आप्पा) पवार उद्यानाचे झाले लोकार्पण आज निर्मला सीतारमण नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार, मतदार यादीत नाव न सापडल्यास BMC च्या या हेल्पलाईनवर कॉल करा प्रचारतोफा थंडावल्या, उमेदवारांना घरोघरी प्रचारास मुभा राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका 5 फेब्रुवारीला Blinkit, Zepto, Swiggy, Zomato ची 10 मिनिटांची डिलिव्हरी सर्व्हीस बंद नालासोपार्‍यात १० लाखांची रोकड जप्त यामिनी जाधव यांचा मुंबई पालिका निवडणुकीसाठी प्रचाराला वेग राजुलच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे भांडुप मध्ये वेदांता समूहाचे अध्यक्ष दान करणार ७५ टक्के संपत्ती नाना आंबोले यांना शिवडीकरांचा वाढता प्रतिसाद ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा टीझर प्रसिद्ध क्रांतिज्योती विद्यालय ‘ सुपरहीट, पहिल्याच आठवड्यात ३.९१ कोटी कमाई राज्यभरात प्रचारसभांचा धुरळा, फडणवीस ठाणेकरांशी संवाद ... मुंबईत धावणार 18 डब्ब्यांची लोकल राज्यातील २७ लाख वाहनांना अद्यापही HSRP नाही, लवकरच तपासणी होणार बिनविरोध निवडीला मनसेचा हायकोर्टात आव्हान माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचं दीर्घ आजारानं निधन वचन ठाकरेंचं! मुंबईकरांसाठी राज-उद्धव ठाकरेंकडून शिवशक्तीचा वचननामा जाहीर आज होणार फैसला! कर्णधार वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका राजुल संजय पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज संरक्षण क्षेत्रासाठी 79 हजार कोटींच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी ३३ वर्षांनंतर पुन्हा उघडणार जेजे हत्याकांडाची केस प्रशिक्षकपदावरून गौतम गंभीरला बीसीसीआयकडून मिळणार डच्चू? अखेर BCCI ने सोडलं मौन, पुण्यात भाजप, राष्ट्रवादीविरोधात लढणार, मविआचा फॉर्म्युला ठरला; 50-50-50 मनसेलाही सोबत घेणार शिवसेनेची लवकरच पहिली यादी; एकनाथ शिंदेंकडून 60 माजी नगरसेवकांना संधी, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी विशेष टोलमाफी पास पर्यूषण पर्वात दोन दिवस कत्तलखाने राहणार बंद २९ टक्के कोसळला या गेमिंग कंपनीचा शेअर Asia Cup मध्ये भारत-पाक आमने सामने- सरकारने दिली परवानगी 12 आणि 28 टक्क्यांचा GST स्लॅब होणार रद्द, सर्वसामान्यांना फायदा अमेरिकेत छत्रपती शिवरायांच्या कीर्तीरथाची भव्यदिव्य मिरवणूक कानात ईअर फोन असल्याने युवकाचा मृत्यू पोस्ट झाले अत्याधुनिक – अ‍ॅडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म सुरु BSNL ची मान्सून ऑफर – 1 महिना मोफत इंटरनेट गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक सलोख्यासाठी हजरत महंमद पैगंबर जयंती ८ सप्टेंबर रोजी होणार .. आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रवासाला तब्बल बारा तास, मग टोल का द्यावा, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल उपमुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर केले ‘लाडकी सून’ अभियान मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी… कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ… उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच झाले सुरू मतदार यादीबाबतचे आरोप शपथपत्रासह करा अन्यथा माफी मागा… शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल १८ ऑगस्टला जालन्यात मुसळधार पावसाने नदी नाले तुडुंब… मुंबईत पागडीधारकांना आदित्य ठाकरेंकडून पुनर्वसनाची हमी कॅडबरी डेअरी मिल्कच्या रॅपरवर खास मराठीत शब्द पहिल्याच दिवशी FASTag वार्षिक पासला भरभरुन प्रतिसाद, १.४ लाखांहून अधिक नोंदणी राज्यात १६ ते २१ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राचे उद्घाटन लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत सर्व घटकांना सोबत घेऊन विकास करणार ! नारळी पौर्णिमेला वरळीत हुल्लडबाजी करणाऱ्या उबाठा गटावर कारवाई करा BSF मध्ये 1121 जागांसाठी भरती; 10वी-12वी व ITI करु शकतात अर्ज 15 ऑगस्टपासून सुरू होणार FASTag Pass गणेशोत्सव काळात मुंबईत ‘डीजे’ला बंदी दादरमध्ये इमारतीच्या छतावर कबुतरखाना सुरू आधार कार्ड, व्होटर कार्ड,रेशन कार्ड हे नागरिकत्त्वाचे पुरावे नाहीत 15 ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवलीत मांसाहार बंदी इथेनॉल पुरवठ्यात उ.प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसर्‍या स्थानी हेपेटायटीस D पासून कर्करोगाचा धोका असल्याचा WHO चा निर्वाळा दहिहंडी सराव करताना 11 वर्षीय बालकाने गमावला जीव अमेरिकेच्या टॅरिफमुळे दोन अब्ज डॉलरची कोळंबी निर्यात धोक्यात सिंचन तलाव धोक्यात; भिंत खचली, २०० एकर शेतीला धोका…. हुतात्मा स्मारकाच ऐतिहासिक महत्त्व टिकले पाहिजे - आमदार सचिन अहिर रेल्वेकडून इतर प्रवाशांसह मुंबईकरांसाठी सुरक्षेच्या नव्या उपाययोजना राजकीय पक्षाचा चेहरा राहिलेली व्यक्ति न्यायालयाचा चेहरा असणे योग्य आहे का ? सरकारने लोकसभेत सादर केलेले आयकर विधेयक घेतले मागे अमेरिकेच्या टॅरिफचा भारतीय वस्त्रोद्योगाला मोठा फटका ठाणे जिल्ह्यातील या शहरात लवकरच सुरु होणार ‘पॉड टॅक्सी’ सेवा माथेरानची हातरिक्षा बंद करा – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कबुतरांना अन्न-पाणी देण्यावर उच्च न्यायालयाची बंदी कायम एक पडदा सिनेमागृहाबाबत संयुक्त समिती कोल्हापूरकर जिंकले, महादेवी हत्तीण पुन्हा येणार नांदणी मठात उत्तराखंडला गेलेले महाराष्ट्रातील सर्व पर्यटक सुखरूप ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती उत्तरकाशीमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार, ४ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता भाजपाचे पदाधिकारी बनले न्यायाधीश, न्यायपालिकेचा निष्पक्षपणा धोक्यात? सेंचुरी मिलचा भूखंड कोणाच्या घशात घालणार? कामगार नेते गोविंदराव मोहिते‌ भायखळ्यात आमदार चषक 2025 ही भव्य हॉलीबॉल स्पर्धा संपन्न शिवसेना प्रभाग 205 च्या वतीने लाडू वाटप नृत्येश्वर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तैवानमध्ये भारतीय लोकनृत्यांची केली बहारदार सादरीकरण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानकाच्या नामकरणाविरोधात शिवसेनेचे आंदोलन एसटी आता करणार रिटेल (किरकोळ ) इंधन विक्री कबुतरांना खाद्य देणार्‍याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजपामध्ये प्रवेश ‘$1 ट्रिलियन’ अर्थव्यवस्थेकडे महाराष्ट्राची वेगवान वाटचाल! निवडणूक पारदर्शक होण्यासाठी मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडा राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम हाती… स्वामीनाथन यांचा जन्मदिन “शाश्वत शेती दिन” म्हणून साजरा राज्य सरकारने जाहीर केले नवे सोशल मीडिया नियम राज ठाकरे आल्यानं कित्येक पटीनं आनंद- उद्धव ठाकरे खडसेंचा जावई पुण्यात रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडला गेला लाडकी बहीण योजनेसाठी 26.34 लाख महिला अपात्र जन्मतःच या बालकाच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 10 उत्तीर्ण उमेदवारांसाठी IB मध्ये नोकरीची मोठी संधी शाळा, कॉलेज आणि कोचिंग संस्थांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून 15 निर्देश जारी मुंबई रेल्वे साखळी स्फोट प्रकरण : हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी ससून डॉकमधील मच्छीमारांच्या पुनर्वसनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे.. ; राज ठाकरे निशिकांत दुबेवर कडाडले सीमाभागातील निपाणी शहरात कन्नड भाषेची सक्ती महायुती सरकारला सत्तेचा माज -माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई महाराष्ट्राचीच , मुंबईत मराठी माणसाचाच आवाज बुलंद …. ‘जय गुजरात’ म्हणणारे एकनाथ शिंदे गुजरात व अमित शाहांचे गुलाम म्हाडा लॉटरीचा धडाका; ठाण्यात 2000 घरांसाठी सोडत, वाचा कधी येणार जाहिरात पावसाळ्यात केस का गळतात? अशी घरगुती उपाय करून थांबवा केस गळती NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

अनादी मी.. अनंत मी..

सावरकरांना आपण स्वतंत्र लढ्याचा नायक एव्हढ्याच स्वरूपात बंदिस्त केल्याने बहुतांश लोकांना ते एका स्वातंत्र्यवीराच्या रुपात समोर आलेले दिसतात. छोट्याशा भगूर गावापासून इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी तसेच नंतर जपान अशा विविध देशांत केलेले आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटन, ‘अभिनव भारत’ या गुप्त सशस्त्र क्रांतिकारकांच्या संघटनेची उभारणी यातून सावरकर एक कुशल संघटक म्हणून दिसतात. हुतात्मा मदनलाल धिंग्रा तसेच कर्वे, कान्हेरे, देशपांडे हे तात्यांमुळे निर्माण झालेले क्रांतिकारक आपल्याला अवगत आहेत. त्यांनी मार्सेलिसला मारलेली उडी, त्यानंतर झालेली अटक आणि हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात चाललेला अभियोग हा सुपरिचित आहे. दोन जन्मठेपींची शिक्षा भोगण्यासाठी अंदमानला झालेली पाठवणी आणि तेथील यातना देणारे प्रसंग हेदेखील सर्वांना माहीत आहेत. त्यांची काव्य, नाटके, ग्रंथ या सगळ्यांबद्दल जरी समाज सजग असला तरी आजच्या परिस्थितीचा विचार करता सावरकरांकडे  महत्त्वाचे जे पैलू आहेत ते म्हणजे बुद्धिप्रामाण्यवाद आणि त्यांनी केलेली समाजक्रांती ह्याकडे मात्र या देशातील राजकर्त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. या अपयशाचे खापर ज्या काँग्रेस सरकारवर फोडण्याचा प्रयत्न केला जातो त्या अनुयायी संघटनांनी तरी सावरकरांना आणि त्यांच्या विज्ञाननिष्ठ तत्वांना स्वीकारले का ? हा कळीचा मुद्दा ठरतो. आज ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे सरकार देशात असून या देशाला हिंदूराष्ट्र बनवण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. त्यासाठी तथाकथित हिंदु संघटनांनी हिंदुत्वाच्या नावाखाली आज जो काही देशात धुमाकूळ घातला आहे ते पाहून सावरकरांनी आपल्या लेखणीचे आसूड निश्‍चितच या बेगडी हिंदुत्व रक्षकांच्या पाठीवर ओढले असते. 

राष्ट्राची इमारत धर्मग्रंथाच्या पायावर उभी न करता ‘विज्ञानग्रंथाच्या’ प्रबळ पायावर उभी केली पाहिजे, असा आग्रह धरताना सावरकर म्हणतात ‘युरोपीयांना प्रबळ करणारा धर्मग्रंथ बायबल नव्हे, त्यांनी बायबल मिटले आणि त्यांचे डोळे उघडले. रशियाने तर बायबल फाडूनच टाकले. एकच धर्मग्रंथ असणार्‍या लक्षावधी मुसलमानांवर, कोणताही धर्मग्रंथ नसलेला आणि विज्ञानग्रंथ धारण करणारा रशियाच आज राज्य करीत आहे.’ या ठिकाणी आपला विचार पटवून देताना, देव-धर्मावर समाज व राष्ट्र उभे न करणार्‍या रशिया, जपान या राष्ट्रांचे आणि युरोप खंडाचे दाखले ते देतात. सावरकर यांचे विचार-आचार हे धर्मावर आधारित न राहता ते विज्ञानावर आधारित होते. प्रगल्भ बुद्धिमत्ता उच्च शिक्षण आणि संपूर्ण जगाचा प्रवास यामुळे त्यांच्या विचारांची बैठक ठाम होती. धर्मग्रंथांवर समाज उभा करण्याचे दिवस आता गेले, समाज उभा करायचा असेल आणि टिकवायचा असेल तर तो विज्ञाननिष्ठ विचारांनीच, असे आग्रही प्रतिपादन केले. एखाद्या जुन्या धर्मग्रंथाला वा पोथीला, एखाद्या देवतेला वा प्रेषिताला आपला सद्विवेक आणि बुद्धी गहाण ठवून स्वतंत्रपणे विचार करण्याचेच सोडून दिले तर धार्मिक कट्टरता अंगी भिनली जाते. व्यक्ती-समाज या न्यायाने ती वाढत जाते आणि अंती राष्ट्रघातकी ठरते. विनायकरावांनी हेच मर्म जाणले आणि अत्यंत मूलगामी विचार करून आपली खर्‍या अर्थाने पुरोगामी मते मांडली. परंतु सावरकरांच्या याच विचारांना तिलांजली देण्याचे काम हिंदुत्वाचा अजेन्डा घेऊन सत्तेवर असलेले राजकर्ते करत आहेत हे पाहून मन विषण्ण होते. सावरकरांचे विचार आणि व्यक्तिमत्वाचा वापर फक्त स्वार्थी राजकारणासाठी केला गेल्याने हिमालयापेक्षा उत्तुंग व्यक्तिमत्व लाभलेल्या सावरकरांना या हिंदुत्ववादी बडव्यांनी पार खुजे करून टाकले आहे.

सावरकरांनी या मातृभूमीस स्वातंत्र्य मिळवून देण्याचं व्रत हाती घेतले. पण, हे स्वातंत्र्य केवळ परकीय शत्रूंपासून नव्हे, तर स्वकीय सनातनी, धर्माचा दुष्प्रभाव असलेल्या मंडळींकडून जे आपल्याच बंधूंचे सामाजिक शोषण आणि दमन करीत होते, त्यापासून स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी केला. सर्वच धर्मांच्या शिकवणी आणि त्याप्रमाणे त्या-त्या धर्माच्या अनुयायांची वागणूक ही अत्यंत परस्परविरोधी आणि एकूणच माणुसकीला धरून कशी नव्हती, हा अभ्यास त्यांनी केला आणि आपल्या विज्ञाननिष्ठ विचारांचे आसूड त्यांच्या पाठीवर ओढले. बहुतांश हिंदू समाज हा एका विचित्र धार्मिक पगड्याखाली जगत होता, पोथीनिष्ठ काल्पनिक जातीपातींत विभागला गेला होता. माणसासारख्या माणसाला पशूपेक्षा हीन वागणूक देणारा होता, हे त्यांच्या लक्षात आले. रत्नागिरीतील स्थानबद्धता ही एक इष्टापत्ती ठरली आणि तात्यांनी समाजक्रांती आरंभली. तात्याराव हे समाजक्रांतिकारक होते. ‘समाजसुधारक’ आणि ‘समाजक्रांतिकारक’ यांत अंतर आहे. समाजसुधारक हे समाजाचा जो पाया आहे तो तसाच ठेऊन, त्यावर समाजाची सुधारित रचना करतात. पण, समाजक्रांतिकारक मात्र जो समाजाचा रूढ पाया आहे तो मोडून, नवीन पायावर समाजाची निर्मिती करतात. तो रूढ पाया म्हणजे धर्मग्रंथप्रामाण्य, तर नवीन पाया म्हणजे विज्ञानप्रामाण्य.

तात्याराव म्हणतात, जे तत्त्वज्ञान म्हणून धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे ते संपूर्ण सत्य नव्हे तर तो सत्याभास आहे. ते ज्ञान हे व्यक्तिसापेक्ष आहे, जसे की अमुक दिवशी उपवास केल्यास त्याचा लाभ होऊन स्वर्गप्राप्ती होते असे वर्णन जर धर्मग्रंथात असेल तर त्याचा पुरावा काय? पुन्हा एखाद्या व्यक्तीलाच जर उपवास करून स्वर्गप्राप्ती होत असेल, पण दुसर्‍या व्यक्तीला ती होत नसेल, तर ते संपूर्ण सत्य आहे का? याचे सरळ उत्तर नकारार्थी आहे. स्वर्ग, नरक, पाप, पुण्य या संकल्पना अजूनही पूर्णपणे सिद्ध झाल्या नाहीत. ते रान आहे की वैराण आहे, पूर्वेस आहे की उत्तरेस आहे हे अजून सिद्ध व्हायचे आहे. त्यामुळे ‘तत्त्वज्ञान’ या अर्थी ‘धर्म’ म्हणून बाजूला जाते. एकदा तत्त्वज्ञान बाजूला गेले की त्यावर जे धर्मग्रंथ उभे आहेत आणि त्यातील शिकवणी आहेत त्याही आपोआप बाजूला जातात. मग राहता राहिला तो इहलौकीक धर्म! माणसाने माणसाशी कसे वागावे याचे नियम हे माणसाने ठरवायचे आहेत. परस्पर संमतीने ठरवायचे आहेत. ज्यामुळे पृथ्वीवरील जीवन सुसह्य होणार आहे असे नियम हे अर्थातच धार्मिक पायावर नाही, तर विज्ञानाच्या पायावर उभे केले पाहिजेत! म्हणूनच प्रयोगसिद्ध विज्ञान हाच आधुनिक भारताचा वेद झाला पाहिजे, असे ठाम प्रतिपादन सावरकर करतात.

सनातनी विचारांचा प्रभाव प्रचंड असलेल्या त्याकाळी किती चुकीच्या कल्पना होत्या? चार्तुवर्ण संस्थेवर गाढा विश्वास, पोथीजात जातीभेद, त्यातून जन्माला आलेल्या विविध प्रकारच्या बंदी उदा. स्पर्शबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी, इ. एक ना दोन किती किती अंधश्रद्धा! हे पोथीनिष्ठ जुनाट आचार पाहून, सावरकरांची लेखणी परजली. जो माणूस अगदी विज्ञानाच्या आणि इतिहासाच्या उपनेत्रांतून देखील कित्येक दाखले देऊन जन्मजात चातुर्वर्ण्य व जातीभेद कसा निरर्थक आहे हे लिहून ठेवतो आणि त्याच विचारांप्रमाणे अतिशय अचाट असे सुधारणा कार्यही घडवून आणतो. त्या तात्यारावांना उच्चवर्णीय म्हणून, जातीवादी आणि सनातनी म्हणून अपकीर्त करण्यात येते. त्यांचे सर्वार्थाने पुरोगामी, तर्कशुद्ध आणि विज्ञाननिष्ठ विचार समोर येऊच दिले जात नाहीत हा केवळ आपला करंटेपणा होय. आज गोरक्षणाच्या नावाखाली जो काही हैदोस विशिष्ट गोरक्षकांनी मांडून विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचे धोरण अवलंबले आहे त्यातून राष्ट्र विभाजनाचा पाया रोवला जात आहे त्याचे भान कोणालाही नाही.  ज्या गायीला हिंदू धर्मात देव मानले त्या गायीला पशु संबोधून आपल्या व्यावहारिक विचारांची ओळख भारतीयांना करून दिली. परंतु सावरकरांचे उदो-उदो करणारे मात्र त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या स्वार्थी धर्मनिष्ठ राजकारणसाठी हवे तेव्हढेच सावरकरांचे विचार समाजापुढे आणतात आणि त्यांना ठराविक साच्यात बंदिस्त करतात हा सावरकरांवर फार मोठा अन्याय त्यांच्याच अनुयायांनी केला आहे. ज्या सावरकरांनी देशाच्या सीमा कशा सुरक्षित ठेवाव्यात, शत्रूराष्ट्राची कसे आचरण ठेवावे आणि भविष्याचा वेध घेऊन आपले परराष्ट्रीय धोरण कसे आखावे याबाबत केलेल्या सूचना जरी आजच्या सरकारने आचरणात आणल्या तरी भारताचे अहित कोणीही करू शकत नाही. सावरकरांच्या जयंतीनिमित्ताने त्यांचे हे विज्ञाननिष्ठ विचार सर्वांनी अंगीकारावे, जातीभेदाचे वेड आपल्या डोक्यातून काढून टाकावे, आणि बेगडी हिंदुत्वाच्या शृंखला तोडून एक राष्ट्र म्हणून उभे राहावे, हीच खरी आदरांजली स्वतंत्र भारताच्या सुपुत्राला असेल..  

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट