पोस्टाची प्रीमियम सेवा – २४ तासांत पोहोचणार पार्सल भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह देण्यासाठी कॅनडा सरकारने मागितले 35 लाख मुंबईतील पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग, मुख्य रस्ते व रहदारीचे रस्‍ते समतल करावेत, उप महापौर श्री. संजय घाडी 10 वी भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिकांचा संच चोरीला 10 वी भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिकांचा संच चोरीला 2026 चे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, या मराठी लेखकाचा सन्मान सेवानिवृत्त एस.टी. कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास सिंधू सेवा दलातर्फे शुक्रवारी (ता. २०) ‘चेटीचंड’ महोत्सव सक्तीने धर्मांतर विरोधी विधेयकावर विरोधी पक्षांमध्ये फूट बेकायदेशीर धर्मांतरणाच्या विरोधातील विधेयक सर्व धर्मियांसाठी समान…. Fastag वार्षिक पास १ एप्रिलपासून महागणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेला स्थगिती आणि मनाई आदेश देण्याची मागणी आखाती देशातील युद्धामुळे टरबुज उत्पादक शेतकऱ्यांना फटका… राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर भारतीय चित्रपटांसाठी आता सबटायटल्स आणि ऑडिओ वर्णन अनिवार्य भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना व्हिसा मुदतवाढ LPG गॅसला पर्याय सापडल्याचा पुण्यातील शास्त्रज्ञांचा दावा गॅस पुरवठ्याच्या प्राधान्यक्रमाची नियमावली जारी अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांमुळे पादचारी हैराण पंधरादिवसांत राज्यातील मद्यनिर्मिती बंद करावी लागणार WhatsApp, FB आणि Messenger वर फसवणूक टाळण्यासाठी Meta चे नवे फिचर्स मुंबई मनपाच्या शाळांमध्ये मध्यान्ह भोजनाऐवजी फळे वाटप सक्तीच्या धर्मांतरासाठी ७ वर्षांची कैद, ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानसभेत सादर जागतिक महिला दिन मनाला स्पर्श करणारा उपक्रम ठरला LPG टंचाईमुळे इन्डक्शनच्या मागणीत मोठी वाढ ग्रामीण भागात 45 दिवसांनंतरच बुक होणार LPG सिलेंडर प्रवासी सेवा देणाऱ्या वाहनांना ‘QR कोड’ अनिवार्य देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था महाराष्ट्राचीच…. जप्तीची कारवाई सुरू होताच २ हजार ८८८ मालमत्ताधारकांनी भरला कर महाराष्ट्र केसरी २०२५-२६’ कुस्ती स्पर्धेच्या बोधचिन्हाचे झाले अनावरण मुंबईतल्या घरासाठी गिरणी कामगार एकवटला! मुरबे बंदर प्रकल्पाच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह बहुचर्चित ‘ लाडकी बहीण ‘ योजनेवर येतोय चित्रपट प्रसिद्ध रॅपर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मुंबई येथे आगमन ‘हॉवर्थ इंडिया’तर्फे महिला दिनी कर्तृत्त्ववान महिलांसह प्रमुख शहरांमध्ये ‘गिव्ह टू गेन’ मालिकेचे आयोजन माणिकडोह मधील २० बिबट्यांचे वनतारा केंद्रात स्थलांतर अंबरनाथ शिवमंदिर परिसरात 32 घरांवर बुलडोझर हवामान विभागाकडून उष्णतेचा अलर्ट जारी ६० रुपयांनी वाढले घरगुती Gas सिलिंडरचे दर या शहरांत सुरू होणार BSNL 5G सेवा एकल मातांना पूर्ण पालकत्वाचा अधिकार – न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुंभदूत ॲपचे अनावरण बृहन्‍मुंबई महानगरपालिका स्‍थायी समिती अध्यक्षपदी श्री. प्रभाकर शिंदे यांची बिनविरोध निवड PCM ग्रुप घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मिळेल मेडिकलला प्रवेश शेअर बाजारात भीषण भूकंप! इराण-अमेरिका युद्धाच्या सावटाखाली बाजार ‘रक्तबंबाळ पंतप्रधानांच्या मेन्यूला अस्सल मराठी तडका ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे पोस्टर आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी झाले रिलीज! DGCA कडून विमान प्रवासातील गैरवर्तनाबाबत; ‘झीरो टॉलरन्स पॉलिसी’ लागू अभिनेता प्रसाद ओकच्या कामगिरीचा विश्वविक्रम राज्यसभेच्या ३७ जागांसाठी १६ मार्चला निवडणूक नाशिकमधील द्राक्ष उत्पादक संकटात विमानात एवढं फ्यूएल घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय? जन गण मन आधी ‘वंदे मातरम्’ गाण्याला दल खालसाचा विरोध राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पद भरतीस मान्यता काळाचौकी येथे खोदकामामुळे अपघातात वाढ हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ पुस्तकातून मार्गदर्शन आणि उपाय मस्क यांची AI कंपनी चंद्रावर उभारणार फॅक्टरी भोईवाडा परिसरात वाहतूक विभागाची धडक संयुक्त कारवाई; नगरसेविका श्रद्धा जाधव सोडवणार क्यू आर कोडने नागरी समस्या महाशिवरात्रीसाठी भीमाशंकर मंदिर राहणार बंद भारत लवकरच या देशात UPI लाँन्च करणार RSS च्या कार्यक्रमाला सलमान खानची उपस्थिती लाडक्या बहिणींच्या e-KYC ला मुदतवाढ १२ जिल्हापरिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान देशभर ओला, उबर आणि रॅपिडो चा संप इस्लामाबादमध्ये मशिदीवर आत्मघातकी हल्ला 31 जण मृत्यूमुखी, 169 जखमी भारतातील पहिला AI IPO करी रोड पदपथांवरील हायड्रेलमुळे पादचारी हैराण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना मिळणार Z+ दर्जाची सुरक्षा चेक बाऊन्स प्रकरणी अभिनेता राजपाल यादव विरोधात अटक वॉरंट शक्तिपीठ महामार्गाच्या खर्चात तब्बल १५ हजार कोटींची वाढ अजितदादा पवार यांचे संगमवाडी येथे भव्य स्मारक उभारण्याची मागणी युमनाम खेमचंद सिंह झाले मणिपूरचे 13 वे मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाची शपथ भायखळा येथे दिवंगत कै.शरद (आप्पा) पवार उद्यानाचे झाले लोकार्पण आज निर्मला सीतारमण नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार, मतदार यादीत नाव न सापडल्यास BMC च्या या हेल्पलाईनवर कॉल करा प्रचारतोफा थंडावल्या, उमेदवारांना घरोघरी प्रचारास मुभा राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका 5 फेब्रुवारीला Blinkit, Zepto, Swiggy, Zomato ची 10 मिनिटांची डिलिव्हरी सर्व्हीस बंद नालासोपार्‍यात १० लाखांची रोकड जप्त यामिनी जाधव यांचा मुंबई पालिका निवडणुकीसाठी प्रचाराला वेग राजुलच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे भांडुप मध्ये वेदांता समूहाचे अध्यक्ष दान करणार ७५ टक्के संपत्ती नाना आंबोले यांना शिवडीकरांचा वाढता प्रतिसाद ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा टीझर प्रसिद्ध क्रांतिज्योती विद्यालय ‘ सुपरहीट, पहिल्याच आठवड्यात ३.९१ कोटी कमाई राज्यभरात प्रचारसभांचा धुरळा, फडणवीस ठाणेकरांशी संवाद ... मुंबईत धावणार 18 डब्ब्यांची लोकल राज्यातील २७ लाख वाहनांना अद्यापही HSRP नाही, लवकरच तपासणी होणार बिनविरोध निवडीला मनसेचा हायकोर्टात आव्हान माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचं दीर्घ आजारानं निधन वचन ठाकरेंचं! मुंबईकरांसाठी राज-उद्धव ठाकरेंकडून शिवशक्तीचा वचननामा जाहीर आज होणार फैसला! कर्णधार वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका राजुल संजय पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज संरक्षण क्षेत्रासाठी 79 हजार कोटींच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी ३३ वर्षांनंतर पुन्हा उघडणार जेजे हत्याकांडाची केस प्रशिक्षकपदावरून गौतम गंभीरला बीसीसीआयकडून मिळणार डच्चू? अखेर BCCI ने सोडलं मौन, पुण्यात भाजप, राष्ट्रवादीविरोधात लढणार, मविआचा फॉर्म्युला ठरला; 50-50-50 मनसेलाही सोबत घेणार शिवसेनेची लवकरच पहिली यादी; एकनाथ शिंदेंकडून 60 माजी नगरसेवकांना संधी, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी विशेष टोलमाफी पास पर्यूषण पर्वात दोन दिवस कत्तलखाने राहणार बंद २९ टक्के कोसळला या गेमिंग कंपनीचा शेअर Asia Cup मध्ये भारत-पाक आमने सामने- सरकारने दिली परवानगी 12 आणि 28 टक्क्यांचा GST स्लॅब होणार रद्द, सर्वसामान्यांना फायदा अमेरिकेत छत्रपती शिवरायांच्या कीर्तीरथाची भव्यदिव्य मिरवणूक कानात ईअर फोन असल्याने युवकाचा मृत्यू पोस्ट झाले अत्याधुनिक – अ‍ॅडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म सुरु BSNL ची मान्सून ऑफर – 1 महिना मोफत इंटरनेट गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक सलोख्यासाठी हजरत महंमद पैगंबर जयंती ८ सप्टेंबर रोजी होणार .. आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रवासाला तब्बल बारा तास, मग टोल का द्यावा, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल उपमुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर केले ‘लाडकी सून’ अभियान मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी… कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ… उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच झाले सुरू मतदार यादीबाबतचे आरोप शपथपत्रासह करा अन्यथा माफी मागा… शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल १८ ऑगस्टला जालन्यात मुसळधार पावसाने नदी नाले तुडुंब… मुंबईत पागडीधारकांना आदित्य ठाकरेंकडून पुनर्वसनाची हमी कॅडबरी डेअरी मिल्कच्या रॅपरवर खास मराठीत शब्द पहिल्याच दिवशी FASTag वार्षिक पासला भरभरुन प्रतिसाद, १.४ लाखांहून अधिक नोंदणी राज्यात १६ ते २१ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राचे उद्घाटन लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत सर्व घटकांना सोबत घेऊन विकास करणार ! नारळी पौर्णिमेला वरळीत हुल्लडबाजी करणाऱ्या उबाठा गटावर कारवाई करा BSF मध्ये 1121 जागांसाठी भरती; 10वी-12वी व ITI करु शकतात अर्ज 15 ऑगस्टपासून सुरू होणार FASTag Pass गणेशोत्सव काळात मुंबईत ‘डीजे’ला बंदी दादरमध्ये इमारतीच्या छतावर कबुतरखाना सुरू आधार कार्ड, व्होटर कार्ड,रेशन कार्ड हे नागरिकत्त्वाचे पुरावे नाहीत 15 ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवलीत मांसाहार बंदी इथेनॉल पुरवठ्यात उ.प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसर्‍या स्थानी हेपेटायटीस D पासून कर्करोगाचा धोका असल्याचा WHO चा निर्वाळा दहिहंडी सराव करताना 11 वर्षीय बालकाने गमावला जीव अमेरिकेच्या टॅरिफमुळे दोन अब्ज डॉलरची कोळंबी निर्यात धोक्यात सिंचन तलाव धोक्यात; भिंत खचली, २०० एकर शेतीला धोका…. हुतात्मा स्मारकाच ऐतिहासिक महत्त्व टिकले पाहिजे - आमदार सचिन अहिर रेल्वेकडून इतर प्रवाशांसह मुंबईकरांसाठी सुरक्षेच्या नव्या उपाययोजना राजकीय पक्षाचा चेहरा राहिलेली व्यक्ति न्यायालयाचा चेहरा असणे योग्य आहे का ? सरकारने लोकसभेत सादर केलेले आयकर विधेयक घेतले मागे अमेरिकेच्या टॅरिफचा भारतीय वस्त्रोद्योगाला मोठा फटका ठाणे जिल्ह्यातील या शहरात लवकरच सुरु होणार ‘पॉड टॅक्सी’ सेवा माथेरानची हातरिक्षा बंद करा – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कबुतरांना अन्न-पाणी देण्यावर उच्च न्यायालयाची बंदी कायम एक पडदा सिनेमागृहाबाबत संयुक्त समिती कोल्हापूरकर जिंकले, महादेवी हत्तीण पुन्हा येणार नांदणी मठात उत्तराखंडला गेलेले महाराष्ट्रातील सर्व पर्यटक सुखरूप ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती उत्तरकाशीमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार, ४ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता भाजपाचे पदाधिकारी बनले न्यायाधीश, न्यायपालिकेचा निष्पक्षपणा धोक्यात? सेंचुरी मिलचा भूखंड कोणाच्या घशात घालणार? कामगार नेते गोविंदराव मोहिते‌ भायखळ्यात आमदार चषक 2025 ही भव्य हॉलीबॉल स्पर्धा संपन्न शिवसेना प्रभाग 205 च्या वतीने लाडू वाटप नृत्येश्वर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तैवानमध्ये भारतीय लोकनृत्यांची केली बहारदार सादरीकरण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानकाच्या नामकरणाविरोधात शिवसेनेचे आंदोलन एसटी आता करणार रिटेल (किरकोळ ) इंधन विक्री कबुतरांना खाद्य देणार्‍याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजपामध्ये प्रवेश ‘$1 ट्रिलियन’ अर्थव्यवस्थेकडे महाराष्ट्राची वेगवान वाटचाल! निवडणूक पारदर्शक होण्यासाठी मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडा राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम हाती… स्वामीनाथन यांचा जन्मदिन “शाश्वत शेती दिन” म्हणून साजरा राज्य सरकारने जाहीर केले नवे सोशल मीडिया नियम राज ठाकरे आल्यानं कित्येक पटीनं आनंद- उद्धव ठाकरे खडसेंचा जावई पुण्यात रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडला गेला लाडकी बहीण योजनेसाठी 26.34 लाख महिला अपात्र जन्मतःच या बालकाच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 10 उत्तीर्ण उमेदवारांसाठी IB मध्ये नोकरीची मोठी संधी शाळा, कॉलेज आणि कोचिंग संस्थांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून 15 निर्देश जारी मुंबई रेल्वे साखळी स्फोट प्रकरण : हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी ससून डॉकमधील मच्छीमारांच्या पुनर्वसनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे.. ; राज ठाकरे निशिकांत दुबेवर कडाडले सीमाभागातील निपाणी शहरात कन्नड भाषेची सक्ती महायुती सरकारला सत्तेचा माज -माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई महाराष्ट्राचीच , मुंबईत मराठी माणसाचाच आवाज बुलंद …. ‘जय गुजरात’ म्हणणारे एकनाथ शिंदे गुजरात व अमित शाहांचे गुलाम म्हाडा लॉटरीचा धडाका; ठाण्यात 2000 घरांसाठी सोडत, वाचा कधी येणार जाहिरात पावसाळ्यात केस का गळतात? अशी घरगुती उपाय करून थांबवा केस गळती NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

पराधीन आहे जगी...

देशात 2014 पासून निरनिराळे शब्दप्रयोग जन्माला येत असून राष्ट्रीय भाषा समृद्धी बरोबर लोकांची वैचारिक समृद्धीही सरकारच्या नवनिर्माणमुळे वाढीस लागत आहे. तुकडे तुकडे गँग, देशद्रोही, गद्दार हे परवलीचे शब्द गेली 6-7 वर्षे मोदी समर्थकांकडून त्यांच्या विरोधकांना नामोहरम करण्यासाठी सर्रास वापरण्यात येतात. मूळ मुद्द्यांपासून लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी परिणामकारक ठरलेल्या या ठेवणीतल्या शब्दांचा म्हणावा तसा परिणाम शेतकरी आंदोलनाची दिशा भरकटवण्यासाठी साधला जात नाही याची जाणीव झाल्यावर संसदेच्या चालू  अधिवेशनात खुद्ध पंतप्रधान मोदी यांनी ‘आंदोलनजीवी आणि परजीवी’ या दोन शब्दांची त्यात भर घातली. मोदींचे वाक्य म्हणजे ब्रह्मवाक्य आणि उच्चारण म्हणजे ब्रह्मनादच. या ब्रह्मनादावर मान डोलावत दोन शब्दांना लगेचच भक्तांनी आणि गोदी मीडियाने राजमान्यता देऊन टाकली. यापुढे देशात होणार्‍या कोणत्याही आंदोलनांना मोदीभक्त व मीडिया आंदोलनजीवी म्हणून हेटाळण्यास मोकळे झाले. गेले वर्षभर महाराष्ट्रात आंदोलनाचा धुडगूस घालणार्‍या भाजपच्याच आंदोलकांची गोची मात्र या शब्दप्रयोगाने झाली. 

आंदोलन, चळवळ, उपोषण आणि भारतीय समाज याचे खूप जवळचे नाते आहे. कोणतीही मागणी, सामाजिक सुधारणा ह्या  आंदोलन किंवा चवळीच्या  माध्यमातून पूर्णत्वास नेता येतात या विचारातूनच अनेक सामाजिक कारकर्त्यानी, राजकीय नेत्यांनी वेगवेगळ्या आंदोलनाची किंवा चळवळीची मुहूर्तमेढ देशात रोवली. महात्मा गांधी यांनी आफ्रिका व त्यानंतर भारतात उभारलेल्या आंदोलनाची आणि चळवळीची व्याप्ती एवढी मोठी होती कि जगावर राज्य करणार्‍या इंग्रज सत्तेलाही त्यांच्या आंदोलनापुढे नामोहरम व्हावे लागले. गांधीजींनी दाखवलेल्या मार्गावर आफ्रिकेतील नेते नेल्सन मंडेला यांनी मार्गक्रमण करत इतिहास रचला. देश पारतंत्र्यात असताना गांधीजी आंदोलन करणार म्हटले कि ब्रिटिशांची पाचावर धारण बसायची एवढी ताकद आंदोलन या शब्दात आणि ते करणार्‍या नेत्यांत होती. पण त्याचबरोबर सामाजिक भान त्या वेळच्या परसत्तेलाही होते. पण 70 दिवस सुरु असलेले हे आंदोलन चर्चेच्या माध्यमातून संपवावे, दोन पाऊले सरकारने माघारी जावे आणि चार पाऊले आंदोलनकर्त्यांनी माघारी जावे असे काही प्रयत्न सरकारकडून होताना दिसत नाही उलट शेतकरी आंदोलनाला नामोहरम व बदनाम करण्यासाठी जे जे करता येईल तेवढे प्रयत्न सरकारकडून होताना पाहिले कि वाटते या काळ्या सत्ताधार्‍यांपेक्षा गोरे इंग्रजच बरे होते.

देशात सध्या विशिष्ट राजकीय पक्षात आपल्याला कोणीही प्रश्न विचारू नये किंवा आपण घेतलेल्या निर्णयाला कोणीही विरोध करू नये हि मनूवादी विचारसरणी पाहायला मिळत आहे. लोकशाही म्हणजे ‘लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य’ ह्या संकल्पनेचा सध्या विसर मोदीसरकारला झालेला पाहायला मिळत आहे. ‘सबका साथ सबका विकास’ म्हणून सत्तेवर आलेले आता सबका साथ तर विसरलेच आहेत पण  विशिष्ट जणांच्या विकासासाठी धडपडताना दिसत आहेत. 2017-18 मध्ये देशाच्या एकूण संपत्तीत जी वाढ झाली त्यातील 75% वाढ हि फक्त 2 % लोकांचीच आहे, तर हाच आकडा 2018-19 मध्ये 85 % आहे. त्यामुळे मोदी सरकार कोणाची साथ आणि कोणाचा विकास करणार्‍या योजना आणि नीती अमलांत आणत आहे याची कल्पना येते. मोदीजी अशाप्रकारचे कृषी कायदे जन्माला घालणार आहेत याची जाणीव नोटबंदी प्रमाणे काही ठराविक उद्योजकांना होती आणि गेल्या चार वर्षांपासून त्यांच्या स्वागताची तयारी सुरु केली होती. याला संयोग म्हणावे प्रयोग? परंतु सामाजिक आणि आर्थिक गुलामगिरीत शेतकर्‍यांना ढकलणार्‍या या कायद्यांविरोधात आंदोलन करणार्‍यांना मात्र आंदोलनजीवी आणि परजीवी म्हणून खुद्द पंतप्रधानांनी हेटाळले याचे अप्रूप वाटते. काहीही झाले तरी कायदे माघारी घेणार नाही यातून हाच संदेश मोदींनी आंदोलन करणार्‍यांना दिला, त्यासाठी मात्र वापरले ते संसदेचे व्यासपीठ.

आता आंदोलनजीवी आणि परजीवी या शब्दातील मतितार्थ समजून घेणे गरजेचे आहे. समाजात होत असलेली आंदोलने आणि चळवळी हे समाजाच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. त्यातूनच समाजात असलेल्या चुकीच्या चालीरीती, प्रथा, अंधश्रद्धा याला पायबंद बसतो. नवीन-नवीन सुधारणा या आंदोलनाच्या माध्यमातून अमलांत आणता आल्याने समाजाची पर्यायाने माणसाची उन्नत्ती होते. या आंदोलनांच्या माध्यमातून दुर्बल घटकावरील अन्यायाला वाचा फोडता येते. सरकारला नको असलेले पण प्रशासनात पारदर्शकता आणणारे अनेक कायदे पारित करता येतात. याचे सुंदर उदाहरण म्हणजे गांधीजींनी आंदोलन आणि उपोषणाच्या माध्यमातून उभारलेला देशाचा स्वातंत्र्य लढा, आणीबाणी विरुद्ध जयप्रकाश नारायण यांनी उभारलेले आंदोलन, तीन तलाकसाठी मुसलमान बहिणींनी केलेले आंदोलन, राजाराम मोहन रॉय यांचा सतीची प्रथा बंद करण्यासाठीचा लढा, अण्णांचा माहिती अधिकार कायद्यासाठीचा लढा, जनतेच्या निर्भया आंदोलनामुळे महिलांसंदर्भात गुन्हेगारी कायद्यात झालेले आमूलाग्र बदल हे सर्व आंदोलनाचीच फलश्रुती होती. यातील थोड्या आंदोलनात बीजेपी सक्रिय असताना मग आजच अशाप्रकारच्या आंदोलनाला परजीवी या संबोधनाने का हिणवलं जात कारण त्यामागे आहे विद्यमान राजकर्त्यांची मानसिकता. 

देशात गेल्या काही वर्षांपासून निरनिराळ्या विषयांवर आंदोलने सुरु आहेत. शेतकरी आंदोलनांपुर्वी देशात सीएए या कायद्या विरोधात अनेक राज्यात आंदोलने सुरु होती. हि आंदोलने सरकारने सीएए कायद्यात घातलेल्या अनेक जाचक तरतुदींबद्दल होते. सरकारने या कायद्याचा वापर आसाम मध्ये केला आणि सुमारे 19 लाख लोक या कायद्याच्या कचाट्यात येऊन मोठा गहजब होण्याची शक्यता निर्माण झाली. मग त्यातील काही तरतुदींत बदल करत थोडासा पाण्याचा शिडकावा वातावरण थंड करण्यासाठी जरी केला असला तरी भविष्यात याबाबत पुन्हा आंदोलन उभे राहणार नाही याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. त्यापूर्वी मोदीसरकारने आणलेला भूमी अधिग्रहण कायद्याच्या वेळीही आंदोलने झाली आणि कायदा मागे घ्यावा लागला. आता नव्याने आणलेल्या कृषी कायद्यातही अनेक अव्यवहार्य तरतुदींचा समावेश असल्याचा आरोप शेतकर्‍यांचा आहे आणि तो रास्तही आहे. सरकारने सदर कायद्यांच्या अंमलबजावणीची मुदत 16 महिन्यांनी वाढवण्याची अट शेतकर्‍यांना घालून आंदोलन मागे घेण्यास सांगितले. जर सरकार 16 महिने या कायद्यांची अंमलबजावणी टाळत असेल तर मग कोरोना संक्रमणाच्या काळात हे कायदे आणून आवाजी मतदानाने मंजूर करण्याची गरज काय होती. सदर कायदे सिलेक्ट समिती आणि स्टँडिंग समितीकडून काही बदलांसह  सर्वसहमतीसह मंजुरीसाठी आले असते तर काय वावगे झाले असते. पण ज्यांच्या आर्थिक पाठबळामुळे आपण सत्तेत आलो आता त्यांच्या विकासाची चिंता सतावीत असल्याने मोदींनी हे कायदे आणले असावेत. मोदींच्या निर्णयाला विरोध करण्याचे सामर्थ्य आज त्यांच्या मंत्रिमंडळात कोणालाच नाही कारण मोदींच्या करिष्म्यामुळे ते निवडून आल्याने ते ‘परजीवी’ ठरले आहेत. कदाचित त्यांच्या सहकार्‍यांची हि अवस्था बघूनच मोदींना ‘परजीवी’ हा शब्द सुचला असावा. 

परजीवी म्हणजे दुसर्‍यावर अवलंबून आपले जीवन कंठीत करणारा. पण परजीवी अर्थाची व्याप्ती जीवनाशी निगडित न राहता ती सर्वव्यापी आहे. कोणीही या जगात पूर्णत्वाची कवच कुंडले घेऊन जन्मास आला नाही. ज्याप्रकारे राजकीय पक्ष सत्ता मिळवण्यासाठी लोकांच्या मतावर अवलंबून असतात एकाअर्थी तेही परजीवीच, डॉक्टर चरितार्थासाठी रुग्णांवर अवलंबून असतो पण रुग्णही जिवंत राहण्यासाठी डॉक्टरवर अवलंबून असतो. ही परजीवित्वाची साखळी नैसर्गिक आहे, पण मोदींना यातून काय सूचवायचे आहे? फक्त आंदोलन करतेच परजीवी असतात का? मग राम जन्मभूमी आंदोलनातून 2 खासदार असलेला भाजप 83 खासदारापर्यंत मजल मारतो तेव्हा आंदोलन करणारे परजीवीच नाही का ? अण्णा हजारेंच्या परजीवी आंदोलनातून, कथित 2 जी व कोळसा घोटाळ्यावर आंदोलन करुन सत्तेचा सोपान मिळवणारे मोदी स्वतः परजीवी नाहीत काय ? त्यामुळे आपण जेव्हा एक बोट दुसर्‍याकडे करतो तेव्हा 3 बोटे स्वतः कडेच असतात याचे भान मोदी विसरल्याने आंदोलनकर्त्यांना परजीवी संबोधून त्यांची केलेली हेटाळणी निश्चितच वंदनीय नाही. पण हे मोदीभक्त आणि गोदी मीडियाला कोण समजावणार. कोण जीवी आणि कोण परजीवी या फंदात मोदींनी न पडता ‘पराधीन आहे जगी पुत्र मानवाचा’ याचे भान ठेवावे आणि या आंदोलनातून सुवर्णमध्य साधावा एवढ्याच शुभेच्छा.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट