‘जय गुजरात’ म्हणणारे एकनाथ शिंदे गुजरात व अमित शाहांचे गुलाम म्हाडा लॉटरीचा धडाका; ठाण्यात 2000 घरांसाठी सोडत, वाचा कधी येणार जाहिरात पावसाळ्यात केस का गळतात? अशी घरगुती उपाय करून थांबवा केस गळती NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

भारत बंदची घोषणा... 25 कोटी कामगारांचा आज देशव्यापी संप

भारत बंदची घोषणा... 25 कोटी कामगारांचा आज देशव्यापी संप

कामगार, शेतकरी विरोधी तसेच उद्योगपती समर्थक धोरणांचा निषेध करण्यासाठी भारत बंदचे आवाहन  

- बँका, विमा, टपाल, कोळसा खाणी, महामार्ग आणि बांधकाम क्षेत्रातील अंदाजे 25 कोटी कामगार आणि कर्मचारी बुधवारी (9 जुलै ) देशभरात संपावर जाणार आहेत. या संपामुळे अनेक महत्वाच्या सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे.

दहा प्रमुख केंद्रीय कामगार संघटना आणि त्यांच्याशी संलग्न संघटनांनी या संपाची घोषणा केली आहे. सरकारच्या कामगार आणि शेतकरीविरोधी तसेच उद्योजकहिताच्या धोरणांचा विरोध करण्यासाठी 'भारत बंद'ची हाक देण्यात आली असल्याचे या संघटनांनी स्पष्ट केले आहे.

ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या नेत्या अमरजीत कौर यांनी सांगितले की, देशभरातून सुमारे 25 कोटी कामगार या आंदोलनात सहभागी होणार असून, शेतकरी आणि ग्रामीण कामगारही धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आपला सहभाग नोंदवतील.

कोणत्या संघटना या देशव्यापी संपात सहभागी होणार?

  • या भारत बंदमध्ये सहभागी झालेल्या प्रमुख कामगार संघटनांमध्ये पुढील संघटनांचा समावेश आहे
  • इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC)
  • ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (AITUC)
  • हिंद मजदूर सभा (HMS)
  • सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (CITU)
  • ऑल इंडिया युनायटेड ट्रेड युनियन सेंटर (AIUTUC)
  • ट्रेड युनियन कोऑर्डिनेशन सेंटर (TUCC)
  • सेल्फ-एम्प्लॉयड विमेन्स असोसिएशन (SEWA)
  • ऑल इंडिया सेंट्रल कौन्सिल ऑफ ट्रेड युनियन्स (AICCTU)
  • लेबर प्रोग्रेसिव फेडरेशन (LPF)
  • युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेस (UTUC)
  • जेव्हा कोणी तुमचा अपमान करते तेव्हा काय करावे? जया किशोरीने दिला असा सल्ला की...

संपामागची प्रमुख कारणं

  • श्रम कायद्यातील बदलांना विरोध

कामगार संघटनांचं म्हणणं आहे की सरकारने आणलेले 4 नवीन श्रम कोड हे कामगारांचे हक्क कमी करणारे आहेत. यामध्ये युनियनच्या हालचालींवर निर्बंध, कामाचे तास वाढवणे आणि नोकऱ्यांची असुरक्षा यांचा समावेश आहे.

  • खासगीकरण आणि ठेका पद्धतीचा निषेध

सरकारी मालमत्तेच्या खासगीकरणाच्या निर्णयाविरोधात तसेच कंत्राटी पद्धतीने भरती वाढवल्याच्या धोरणांना विरोध केला जात आहे.

  • शेतकऱ्यांचे प्रश्न

संयुक्त किसान मोर्चाही या संपात सहभागी असून, किमान आधारभूत किंमतीच्या (MSP) कायदेशीर हमीची मागणी तसेच जुन्या कृषी कायद्यांविरोधात सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे.

  • महागाई व बेरोजगारी

कामगार संघटनांचा आरोप आहे की सरकारने ना तर किमान वेतन वाढवले, ना जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू केली, तसेच रोजगार निर्मितीच्या मागण्यांकडेही दुर्लक्ष केले आहे.

कामगार संघटनांच्या प्रमुख मागण्या

  • चारही लेबर कोड त्वरित रद्द करावेत
  • सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे खाजगीकरण थांबवावे
  • किमान वेतन दर महिना ₹26,000 निश्चित करावा
  • जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा लागू करावी
  • शहर आणि ग्रामीण भागात रोजगार हमी योजनांचा विस्तार करावा

रिपोर्टर

संबंधित पोस्ट