‘जय गुजरात’ म्हणणारे एकनाथ शिंदे गुजरात व अमित शाहांचे गुलाम म्हाडा लॉटरीचा धडाका; ठाण्यात 2000 घरांसाठी सोडत, वाचा कधी येणार जाहिरात पावसाळ्यात केस का गळतात? अशी घरगुती उपाय करून थांबवा केस गळती NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

मुंबईत सरकारी आणि कॉर्पोरेट कार्यालयांच्या वेळा बदलणार? मध्य रेल्वेचं मोठं पाऊल

मुंबईत सरकारी आणि कॉर्पोरेट कार्यालयांच्या वेळा बदलणार? मध्य रेल्वेचं मोठं पाऊल

लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. सकाळी ऑफिस सुरू होण्याच्या वेळत आणि संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर लोकलला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या गर्दीमुळे अनेकदा दुर्घटना घडतात. ही बाब लक्षात घेऊन आता मध्य रेल्वेने मोठं पाऊल उचललं आहे. मध्य रेल्वेने मुंबईतील जवळपास 800 शासकीय आणि खासगी कार्यालयांना त्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल करण्यासंदर्भात एक पत्र पाठवले आहे.

मुंबईतील सरकारी आणि खासगी कार्यालये, बँका आणि इतर बहुतांश व्यवसायिक केंद्रांमध्ये सकाळी कामकाज सुरू होते आणि संध्याकाळी संपते. या कार्यलयांमध्ये काम करणारे बहुतांश कर्मचारी हे लोकलने प्रवास करतात. सर्वजण ठरलेल्या वेळेत आपल्या कार्यालयात पोहोचतात आणि सांयकाळी घरी परतात. यामुळे सकाळी 7-10 आणि सायंकाळी 5 ते 7 या वेळेत लोकलला मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या गर्दीमुळे ऑफिसच्या वेळा बदलण्याची गरज निर्माण झाली आहे.

मध्य रेल्वेने मुंबईतील जवळपास 800 शासकीय आणि खासगी कार्यालयांना त्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल करण्यासंदर्भात एक पत्र पाठवले आहे. या पत्रातून या सर्व कार्यालयांना आपल्या वेळेत बदल करण्याचे आवाहन करण्यात आली आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या ठराविक वेळेत उपनगरीय लोकलमधील वाढती आणि गंभीर गर्दीची समस्या सोडवण्यासाठी हे विनंतीपर पत्र आहे. या मुद्द्यावर राज्य सरकारनेही हस्तक्षेप करण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेने पाठवलेल्या पत्रातून केंद्र आणि राज्य सरकारी कार्यालये, कॉर्पोरेट कार्यालये, विविध महामंडळे, बँका, महापालिका आणि महाविद्यालये या अस्थापनांना त्यांच्या कार्यालयीन वेळेत टप्प्याटप्प्याने बदल करण्याचा विचार करावा असे आवाहन करण्यात आले आहे. रेल्वेच्या या आवाहनाला या कार्यलयाकंडून प्रतिसाद मिळाला तर मुंबईतील सरकारी आणि कॉर्पोरेट कार्यालयांच्या वेळांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट