NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

‘ऑपरेशन सिंदूर’वर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची विशेष प्रतिक्रिया

‘ऑपरेशन सिंदूर’वर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची विशेष प्रतिक्रिया

“भारतीय सैन्याने अचूकपणा, सतर्कता आणि माणुसकी दाखवली आहे. यामुळे मी आपल्या भारतीय सैन्याचे सर्व अधिकारी आणि सैनिकांना देशाच्यावतीने धन्यवाद देतो. सैन्याला संपूर्ण अधिकार प्रदान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील आभार मानतो. आम्ही हनुमानजींच्या त्या आदर्शांचं पालन केलं आहे, जे त्यांनी अशोकवाटीका उद्ध्वस्त करताना दाखवलं होतं. आम्ही केवळ त्यांनाच मारलं ज्यांनी आमच्या निष्पापांचा जीव घेतला होता”, ऑपरेशन सिंदूर बद्दल अशी विशेष प्रतिक्रीया संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपल्या सैन्याने ऑपरेशन सिंदूर लागू करत दहशतवाद्यांचा बदला घेतला आहे. भारताने दहशतवाद्यांना ट्रेनिंग देणारे कॅम्प उद्ध्वस्त करत सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. आमची ही कारवाई खूप अभ्यास करुन करण्यात आली आहे. मी पुन्हा एकदा आमच्या सैन्य दलाच्या शैर्याला नमन करतो”, अशी भावना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली.

भारतीय सैन्याने आपल्या अद्भूत शौर्य आणि पराक्रम दाखवत एक नवा इतिहास रचला आहे. भारतीय सैन्याने अतिशय सतर्क आणि संवेदनशीलपणे कारवाई केली आहे. आम्ही जे लक्ष्य ठरवले होते त्यांनाच टार्गेट केलं आहे. या हल्ल्यात कोणत्याही नागरिकास नुकसान न पोहोचवण्याची संवेदनशीलता भारतीय सैन्याने दाखवून दिली आहे”, अशी प्रतिक्रिया संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे.


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट