मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये ‘अग्नीवीर’ भरती प्रक्रिया सुरू

राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये ‘अग्नीवीर’ भरती प्रक्रिया सुरू

मुंबईसह आठ जिल्ह्यांमधील सन २०२५साठीच्या पहिल्या तुकडीतील ‘अग्रीवीर’ भरतीला सुरुवात झाली आहे. १० एप्रिलपर्यंत उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. ‘अग्नीवीर’ ही १६व्या वर्षी (Army Agniveer Bharti 2025 age limit) संरक्षण दलांद्वारे देशसेवा करण्याची संधी देणारी योजना आहे. चार वर्षांची सेवा बजाविल्यानंतर नोकरी सोडायची असल्यास संबंधित ‘अग्नीवीर’ सैनिकाला जवळपास १०.४० लाख रुपये मिळतात. त्याखेरीज दरमहा २१ हजार ते २८ हजार रुपये वेतनही मिळते. या माध्यमातून भूदलात सेवा देण्यासाठीची यावर्षीची भरती प्रक्रिया आता सुरू झाली आहे.

मुंबईच्या भूदल भरती अधिकारी (एआरओ) कार्यालयाने जाहिरात काढली आहे. त्यानुसार, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांमधील उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया आहे. जून महिन्यात चाचणी घेतली जाईल. ही चाचणीही ऑनलाइन होणार असल्याने उमेदवारांनी त्यासाठी केंद्रावर येताना पुरेसा चार्ज असलेला व किमान दोन जीबी इंटरनेट डेटा असलेला स्मार्ट मोबाइल फोन सोबत आणणे आवश्यक आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर मिळेल


रिपोर्टर

संबंधित पोस्ट