मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

विमा कवच लागू करण्यास मुदतवाढ

अंतिम तारीख 31 डिसेंबर ; कोव्हिड विषयक कर्तव्यावरील कर्मचार्‍यांच्या मृत्यूप्रकरणी मिळणार सहाय्य

नवी मुंबई : कोविड 19 उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनेत काम करणार्‍या कर्मचार्‍यांना विमा कवच योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत कोव्हिड विषयक कर्तव्यावरील कर्मचार्‍याच्या मृत्यूप्रकरणी सर्व प्रकरणी 50 लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य देण्यात येते. 30 सप्टेंबरला याची मुदत संपणाा होती. मात्र शासन निर्णयानुसार या योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

आरोग्य सेवा संबंधित कर्मचार्‍यांच्या व्यतिरिक्त अन्य कर्मचारीय (जिल्हा प्रशासन, पोलीस, होमगार्ड, अंगणवाडी सेविका, लेखा व कोषागारे, अन्न व नागरी पुरवठा, पाणी पुरवठा व स्वच्छता, घरोघरी सर्वेक्षणासाठी नेमलेले कर्मचारी ) इत्यादी सर्वजण कोव्हिड संबंधित कर्तव्य पार पाडीत आहेत.या कर्मचार्‍यांना पाठबळ देण्याच्या दृष्टीकोनातून अशा कर्मचार्‍यांचा दुदैवी मृत्यू झाला तर त्यांचे कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी शासनाने विमा कवच योजना लागू केली आहे. कोविड संबंधित सर्वेक्षण, शोध, प्रतिबंध, चाचणी, उपचार, मदत कार्य आदी प्रकारांची कामे करणार्‍या कर्मचार्‍यांच्या मृत्युप्रकरणी 50 लाख रुपये विशेष सानुग्रह साहाय्याची योजना सर्व स्थानिक स्वराज्य संस्थानी राबविण्याची सूचना शासनाने 29 मे रोजी दिली होती. या योजनेची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत देण्यात आली होती. राज्यात सद्यस्थितीमध्ये कोविड 19 विषाणूंची साथ सुरू असल्याने, सानुग्रह साहाय्य लागू करण्याबाबतच्या योजनेस पुन्हा मुदतवाढ करण्याची सूचना शासनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यासाठी शासनाने 14 ऑक्टोबर रोजी परिपत्रक जारी केले आहे. यात 29 मे च्या परिपत्रकातील अटी-शर्थी कायम ठेवायच्या असून, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनेत काम करणार्‍या महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांसाठी विमा कवच योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट