मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य वितरीत करणार्‍यांवर कडक कारवाई

मुंबई : मुंबई/ठाणे शिधावाटप यंत्रणेतील अधिकृत शिधावाटप दुकानांतून सर्वसाधारण दर्जाचे अन्नधान्य वितरीत करण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. असे असताना सुद्धा काही अधिकृत शिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण करण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारींची दखल अन्न, नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी घेऊन यासंदर्भात कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने दक्षता पथकामार्फत या दुकानाची अन्नधान्याच्या दर्जाबाबतची तसेच इतर बाबींची संपूर्ण तपासणी केली असता आढळुन आलेल्या त्रुटींसंदर्भात जीवनावश्यक वस्तु कायदा, 1955 अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. अधिकृत शिधावाटप दुकान क्र .27/ग/189 (गोरेगाव) या दुकानाची अनुक्रमे 7 सप्टेंबर व 16 सप्टेंबर रोजी संपूर्ण तपासणी घेतली असता एकुण 54 किलो तांदूळ आणि 61 किलो गहू कमी आढळून आला त्या अनुषंगाने संबंधित दुकानदाराने शिधापत्रिकाधारकांना वितरीत केलेले अन्नधान्य शासनमान्य दर आणि परिमाणानुसार वितरित केले आहे किंवा कसे? याची खातरजमा करण्याकरीता दुकानास संलग्न असलेल्या शिधापत्रिकाधारकाच्या गृहभेटी देऊन पडताळणी केली असता अनुक्रमे 370 किलो तांदूळ, 525 किलो गहू कमी वितरित केल्याचे आढळून आले. अशा प्रकारे अधिकृत शिधावाटप दुकानदाराने एकुण 424 किलो तांदूळ आणि 586 किलो गहू अशा एकुण रु.31,530.72 इतक्या रकमेच्या अन्नधान्याचा अपहार केल्याने अधिकृत शिधावाटप दुकानदाराविरुध्द बांगूरनगर पोलिस ठाणे, गोरेगाव, मुंबई येथे 36/2020 दि.18 सप्टेंबर रोजी गुन्हा नोंद केला असून दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द करण्यात आले आहे तसेच या प्रकरणी जबाबदार असलेल्या अधिकार्‍यावरही नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. कोणीही अधिकृत शिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य वितरीत करण्याचा प्रयत्न करीत असल्यास कार्यालयाच्या हेल्पलाईन क्र.022-22852814 वर संपर्क साधावा जेणेकरून अशा अधिकृत शिधावाटप दुकानदारांविरूध्द कारवाई करणे शक्य होईल, असे नियंत्रक शिधावाटप वसंचालक नागरी पुरवठा, मुंबई यानी कळविले आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट