मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

सुधीर मुनगंटीवार ठरताहेत सभागृहातील जागल्या…

सुधीर मुनगंटीवार ठरताहेत सभागृहातील जागल्या…

महानगर  

मुंबई -महायुतीच्या सरकारच्या काळात सरकारमध्ये ज्येष्ठ असूनही मंत्रिपद न मिळालेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या आठवड्यापासूनच मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात सरकारला धारेवर धरायचं काम सुरू केले असून आपल्याकडे जी वैधानिक आयुधे उपलब्ध आहेत त्या सर्वांचा वापर करून आपण सर्वसामान्यांसाठी सरकारला जाब विचारू असा इशाराच त्यांनी दिला आहे. त्यानंतर ते रोज विविध विषयांवरील चर्चेत भाग घेऊन सरकारला भंडावून सोडत आहेत.

मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून वगळल्या गेल्यानंतर ते चांगलेच नाराज होते. नागपूर मधील अधिवेशनात त्यांची उपस्थिती नगण्यच होती, मात्र तीन तारखेपासून सुरू झालेल्या मुंबईतल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते पहिल्या दिवसापासून सक्रिय असल्याचे दिसून आले असून वारंवार ते सरकारला, मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना जाब विचारत असतानाचे चित्र दिसत आहे.

प्रश्नोत्तराच्या तासात लक्षवेधी सूचनांच्या चर्चेत आणि इतर वेळेला देखील कधी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन तर कधी पॉईंट ऑफ ऑर्डर च्या माध्यमातून सभागृहामध्ये ते अनेक प्रश्न उपस्थित करीत आहेत. सभागृहाच्या कामकाजाबद्दल देखील त्यांनी आक्षेप नोंदवलेले आहेत. सभागृहाच्या कामकाजात पूर्वी असलेली पद्धत दिसून येत नाही याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी विधिमंडळातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी असा आग्रह अध्यक्षांकडे धरला होता. मात्र अध्यक्षांनी त्यांना ठोस उत्तर न देता आपली सूचना स्वागतार्ह आहे असे सांगून त्यांची बोळवण केल्याचे दिसून आले.

रस्ते अपघातात मृत्यू मृत्युमुखी पडलेल्या लोकांना नुकसान भरपाई देताना सरकार भेदभाव करत आहे एसटी अपघातासाठी दहा लाख रुपये तर इतर अपघातांमध्ये केवळ पाच लाख रुपये असा सरकारचा दुजाभाव दिसून येतो अशी टीका त्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात केली. यावर सरकार यासंदर्भामध्ये समन्वय साधून काम करेल असा खुलासा मुख्यमंत्र्यांना करावा लागला होता. लक्षवेधी सूचनेच्या दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागावर टीका करताना दारूतून केवळ पैसेच कमवायचे का, त्यावर हे राज्य चालेल का असा सवाल त्यांनी केला.

दारूची दुकाने बंद करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मतांच्या टक्केवारी वरही त्यांनी भाष्य करून सरकारी नियमात चुकीच्या गोष्टी घालून लोकांना भेटीला आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मुनगंटीवार यांनी केलेली पाहायला मिळाली.

सध्या विधानसभेत विरोधी पक्षनेता अस्तित्वात नाही त्यामुळे मुनगंटीवार हेच जणू या पदाचे काम करत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट