मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

देशातील ५८ वा व्याघ्रप्रकल्प या राज्यात होणार सुरु

देशातील ५८ वा व्याघ्रप्रकल्प या राज्यात होणार सुरु

भोपाळ - मध्य प्रदेशमधील माधव राष्ट्रीय उद्यान हे वाघांसाठी संरक्षित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे देशातील व्याघ्रप्रकल्पांची संख्या आता ५८ झाली आहे. वाघांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने घेतलेला हा महत्वपूर्ण निर्णय आहे. देशात वाघांचे वास्तव्य असलेल्या १८ राज्यांमध्ये वाघांचे संवर्धन करण्यासाठी वने आरक्षित करण्यात आली आहेत. या व्याघ्रप्रकल्पांनी एकूण ८२ हजार ८३६ चौरस किलोमीटरचे क्षेत्र व्यापले आहे.

मध्य प्रदेशमध्ये माधव राष्ट्रीय उद्यान व्याघ्रप्रकल्प जाहीर झाल्यामुळे या राज्यातील व्याघ्रप्रकल्पांची संख्या नऊ झाली आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेश हे राज्य देशातील सर्वाधिक व्याघ्रप्रकल्प असलेले राज्य ठरले आहे.व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांसाठी बफर आणि कोअर क्षेत्र अशी व्यवस्था केली जाते. कोअर क्षेत्रा माणसांना प्रवेश करण्यास मनाई असते. त्यामुळे वाघांचे संरक्षण होते आणि त्यांचा प्रजननाचा दर वाढतो. जगभरातील वाघांच्या एकूण संख्येपैकी तब्बल ७० टक्के वाघ एकट्य़ा भारतात आहेत


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट