मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

प्रयोगशाळेचा अहवाल : तिरुपती प्रसादममध्ये प्राण्यांची चरबी , माशाचे तेल आढळले

प्रयोगशाळेचा अहवाल : तिरुपती प्रसादममध्ये प्राण्यांची चरबी , माशाचे तेल आढळले

नवी दिल्ली: आंध्र प्रदेशातील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराच्या (तिरुपती मंदिर) लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा अंश असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर आता मंदिर प्रशासनाने सुद्धा भेसळ झाल्याचे मान्य केले आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानमने (TTD) आता सीएम नायडू यांच्यानंतर तिरुपती प्रसादमध्ये प्राण्यांच्या चरबीची भेसळ असल्याचे म्हटले आहे. TTD कार्यकारी अधिकारी जे श्यामला राव यांनी शुक्रवार, 20 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेतली. ज्या तुपापासून लाडू बनवले जात होते, त्या तुपाच्या नमुन्यांच्या 4 प्रयोगशाळेच्या अहवालात याची पुष्टी झाली असल्याचा दावा त्यांनी केला. राव म्हणाले की, मंदिर व्यवस्थापनाकडे स्वतःची प्रयोगशाळा नाही. याचा फायदा तूप पुरवठादारांनी घेतला.

आत्तापर्यंत गप्प का बसले?

दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनीही या आरोपांवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की सीएम चंद्राबाबू नायडू यांनी जुलैचा लॅब रिपोर्ट दाखवला आहे. तोपर्यंत ते मुख्यमंत्री झाले होते. आत्तापर्यंत गप्प का बसले? रेड्डी म्हणाले की, नायडू राजकीय फायद्यासाठी देवाचा वापर करत आहेत. जगन रेड्डी म्हणाले की, नायडूंनी वस्तुस्थितीचा विपर्यास केला. ते पंतप्रधान मोदी आणि भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहून नायडू यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहेत.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट