Breaking News
प्रयोगशाळेचा अहवाल : तिरुपती प्रसादममध्ये प्राण्यांची चरबी , माशाचे तेल आढळले
नवी दिल्ली: आंध्र प्रदेशातील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराच्या (तिरुपती मंदिर) लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा अंश असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर आता मंदिर प्रशासनाने सुद्धा भेसळ झाल्याचे मान्य केले आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानमने (TTD) आता सीएम नायडू यांच्यानंतर तिरुपती प्रसादमध्ये प्राण्यांच्या चरबीची भेसळ असल्याचे म्हटले आहे. TTD कार्यकारी अधिकारी जे श्यामला राव यांनी शुक्रवार, 20 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेतली. ज्या तुपापासून लाडू बनवले जात होते, त्या तुपाच्या नमुन्यांच्या 4 प्रयोगशाळेच्या अहवालात याची पुष्टी झाली असल्याचा दावा त्यांनी केला. राव म्हणाले की, मंदिर व्यवस्थापनाकडे स्वतःची प्रयोगशाळा नाही. याचा फायदा तूप पुरवठादारांनी घेतला.
आत्तापर्यंत गप्प का बसले?
दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनीही या आरोपांवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की सीएम चंद्राबाबू नायडू यांनी जुलैचा लॅब रिपोर्ट दाखवला आहे. तोपर्यंत ते मुख्यमंत्री झाले होते. आत्तापर्यंत गप्प का बसले? रेड्डी म्हणाले की, नायडू राजकीय फायद्यासाठी देवाचा वापर करत आहेत. जगन रेड्डी म्हणाले की, नायडूंनी वस्तुस्थितीचा विपर्यास केला. ते पंतप्रधान मोदी आणि भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहून नायडू यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे